शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मनाचिये गुंथी - वाळूचे घर

By admin | Updated: December 26, 2016 00:29 IST

लोक ह्या दिवसात चला पुढल्या वर्षी भेटू म्हणत राहतात. नव्या वर्षाचे संकल्प करतात, जे मोडण्यासाठीच असतात.

आपण सगळेच वाळूच्या घरात राहतो. हळूहळू वाळू ढळत राहते. आपण मोठे होत राहतो वयाने. मग क्षणांची आठवण येत राहते. आठवण ही गोष्ट अशीच की ती तुम्हाला सुखाने जगू देत नाही. म्हणजे दु:खद असेल तर त्रास आणि सुखद असेल तर हुरहूर म्हणजे पुन्हा हळवा त्रासच. पण त्यावरही दैवी उपाय आहेच. विस्मृती... ती आहे म्हणून आपण आहोत. ती नसती तर आठवणींच्या माऱ्यानेच आपण मरून गेलो असतो. लोक ह्या दिवसात चला पुढल्या वर्षी भेटू म्हणत राहतात. नव्या वर्षाचे संकल्प करतात, जे मोडण्यासाठीच असतात. काही ठरवू नका हेच ठरवा. बघा १ जानेवारीची सकाळ किती प्रसन्न असेल. काही दिवसांपुरता आपण हिशेब करतो. गतवर्षी काय कमावले, काय गमावले. दोघांचे आकडे बघून खट्टू होतो. क्षणभर एवढं आठवलं की, आपण पैशांचे किती झालो आणि माणसांचे किती झालो तरी पुरे! बाहेरच्यांचे जाऊ द्या आपण घरच्यांचे किती झालो? लहान मुला बाळांवर यथेच्छ प्रेम करा. त्यांच्यावर माया करा. लाड नाही. लाडांनी पोरं नासतात. तरुणाईला समजून घ्या. समजून म्हणजे पॉकेटमनी, हॉटेलिंग करणे नाही. त्यांना वयात येतानाचे शारीरिक, मानसिक बदल समजावून सांगा. आपल्या वागणुकीतून दुर्दैवाने संस्कारांचे अर्थ बदललेत. ‘लिव्ह इन’ ने मनं दूरच राहिली. आयुष्यातील शृंगार प्रणय ह्यांचे अर्थ सपक यांत्रिक करून टाकले. पहिल्या स्पर्शाची थरथर, आवेगाच्या चुंबनाची चव गेली. ह्याचा परिणाम तरुणांना कोणत्याच गोष्टीची नवलाई राहिली नाही. फार कमी वयात प्रचंड अनुभव घेत पिढी नि:सत्त्व होत चाललीय. त्यांचा जगण्यातला इंटरेस्ट कोमेजून जातोय.सांताक्लॉज येतो. गुपचूप एक वस्तू देतो. स्वत:मधला सांताक्लॉज शोधा. वस्तू आपल्यातच दडून आहे. प्रसन्न सकाळ अनुभवण्यापासून ते रात्री शांत झोप मिळेपर्यंत प्रत्येक क्षण भेटवस्तू असतो. मातेचा जिव्हाळा मातृभाषेतच व्यक्त करा. आई म्हणा बाबा म्हणा. मॉम डॅडी नको. हे फ्लार्इंग किस देतात तर आई बाबा कुशीत घेऊन कुरवाळतात. आपल्या मिठीचा घेर विस्तारतो. कॅशलेस व्हा, होऊ नका पण कुशीलेस होऊ नका. एक मायेची जागा सातत्याने काळजात ठेवा. मग काळजीलेस होता येईल.नव्या वर्षाला हस्तांदोलन करताना सगळ्या चिंता, विकार ओंजळीतून गळून जायला हवेत. मोकळा श्वास घेण्यासाठी वेळ आणि जागा ठेवा. तुम्ही म्हणाल वेळच नाही इतकं यांत्रिक झालंय जगणं! कुणी केलं हे यांत्रिक? आपणच ना! जगणं फार मागत नाही, आपला हव्यास मागतं. हव्यास सुटत नाही म्हणूनच वाळूचं घर लौकर रितं होतं. आपला देह हेच वाळूचे घर आहे. माती गळते आहे. एक दिवस घर रिकामं होणार. तेव्हा आनंदाने म्हणता यायला हवं उड जायेगा... हंस अकेला. नववर्षात नवे घर बांधू या... एकमेकांच्या मनात! मग वाळू सरकणार नाही पायाखालची! आणि हृदयाच्या तळघरात होकाराचा तळ स्वच्छ दिसू लागेल. - किशोर पाठक