शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

भेसळीविरुद्ध देशव्यापी महाअभियान व्हावे

By विजय दर्डा | Updated: November 26, 2018 07:14 IST

येथे ‘शुद्ध तूप मिळेल’, ‘शुद्ध तेल मिळेल’ किंवा ‘शुद्ध दूध मिळेल’ किंवा ‘शुद्ध मसाले मिळतील’, असे दुकानांमध्ये मोठ्या अक्षरांत ...

येथे ‘शुद्ध तूप मिळेल’, ‘शुद्ध तेल मिळेल’ किंवा ‘शुद्ध दूध मिळेल’ किंवा ‘शुद्ध मसाले मिळतील’, असे दुकानांमध्ये मोठ्या अक्षरांत दर्शनी भागात लावलेले फलक आपणही पाहिले असतील. पदार्थांच्या जाहिरातींमध्येही त्याच्या शुद्धतेचे वारेमाप दावे केले जातात. आपल्या दैनंदिन जीवनात भेसळ एवढी एकरूपतेने भिनली आहे, खरेदी करत असलेली वस्तू कशी आहे याविषयी ग्राहकांच्या मनात सदैव साशंकता आहे, म्हणून तर एखादी वस्तू शुद्ध असल्याचा एवढा डंका पिटावा लागतो!

भेसळीचा हा बाजार अगदी लहान गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत संपूर्ण देशात पसरलेला आहे. शहरांमध्ये ‘रेडी टू इट’ म्हणजे डबाबंद खाद्यपदार्थांना जास्त पसंती असल्याने तेथे ही समस्या अधिक प्रमाणात आहे. गावांमध्ये अजूनही घरोघरी हळद-तिखट स्वत: दळून आणून साठविले जाते. पण शहरांमध्ये हा रिवाज बंद होत चालला आहे. हळदीमध्ये पिवळी माती मिसळण्याची शेकडो प्रकरणे उघड झाल्याची आपल्याला कल्पना आहे? आपण काळी मिरी खरेदी केल्यावर त्यात पपईच्या वाळविलेल्या बिया तर मिसळलेल्या नाहीत ना, हे किती जण पाहतात? आपण जागरूक ग्राहक म्हणून हे करत नाही म्हणूनच भेसळ करणाऱ्यांचे फावते. बरं, खाद्यपदार्थांमधील ही भेसळ एवढी बेमालूमपणे केली जाते की, नजर व जीभ सराईत असेल तरच ती लक्षात येते.

अन्नपदार्थांमधील भेसळ पकडून गुन्हेगारांना दंडित करण्यासाठी सरकारने मोठी यंत्रणा उभारलेली असते. अठरापगड कायदेही त्यासाठी केले गेले आहेत. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आताही असे नवनवे कायदे केले जात आहेत. पहिला अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा सन १९५४ मध्ये केला गेला. त्याच्या पुढच्या वर्षापासून तो लागू करण्यात आला. पण त्याने अन्नपदार्थांच्या भेसळीस प्रभावीपणे आळा काही बसू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पदार्थांच्या शुद्धतेची सुनिश्चिती करावी, असा आग्रह मी संसदीय समित्यांच्या बैठकींमध्ये अनेक वेळा धरला. त्यानंतर कायद्यांत दुरुस्त्या करून काही नव्या तरतुदी करण्यात आल्या, पण मूळ समस्या मात्र जशीच्या तशीच राहिली. कायदा राबविणारी यंत्रणा मनापासून सक्रिय असल्याचे दिसत नाही. आता महाराष्ट्र विधानसभेने कायद्यात नवी दुरुस्ती करून भेसळ करणाºयांना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा ठोठावण्याची तरतूद केली आहे.

परंतु भेसळ करणाºया सर्वांना वेळीच जेरबंद करून तुरुंगात पाठविणे खरंच शक्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. कायदा राबविणारी यंत्रणा सशक्त व पारदर्शी केल्याशिवाय गुन्हेगारांना कायद्याची जरब बसणार नाही, हे अगदी उघड आहे. ज्या खाद्य निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रात भेसळीचे प्रकरण आढळेल त्यांनाही भेसळखोरांसोबत जबाबदार धरले जाईल, असे ठरविल्याशिवाय चक्रे फिरणार नाहीत. विडंबना अशी की गाईचे दूध व तूप आरोग्यास चांगले असते हे पटल्याने परदेशांतही ते लोकप्रिय होत आहे. पण आपल्याकडे या वस्तू शुद्ध मिळतील याची खात्री देता येईल? आपल्या घरी येणारे दूध ठरलेल्या दर्जाचे नसते हे आपल्याही जाणवत असेल. आपण दूधवाल्याला चार शब्द ऐकवून गप्प बसतो. पण तुन्हाला माहीत आहे का, गाईच्या दुधात किमान ३.५ टक्के स्निग्धांश असायला हवा? म्हशीच्या प्रमाणित दुधात स्निग्धांशाचे प्रमाण किमान ५.५ टक्के असावे लागते. एवढ्या स्निग्धांशाचे दूध किती घरी मिळते? सणासुदीला शुद्ध मावा न मिळणे हे आपल्या जणू आता पाचवीला पुजलेले आहे. पनीर, दही हेदेखील अभावानेच शुद्ध मिळते.

भाज्या हिरव्यागार आणि टवटवीत दिसाव्यात यासाठी त्यांना आरोग्यास हानिकारक असा रंग दिला जातो, हे आपल्याला कदाचित माहीतही नसेल. फळे तजेलदार, रसरशीत दिसावीत म्हणून त्यांना वॅक्स पॉलिश केले जाते. म्हणजे आरोग्यासाठी चांगली म्हणून खाल्ली जाणारी फळे प्रत्यक्षात आपल्या पोटात विष घालतात. या सर्व भेसळीचा आपल्या आरोग्यावर साहजिकच दुष्परिणाम होतो. आजारपण येते व त्यावर उपचार करण्यासाठी आणखी खर्च करावा लागतो. हे भेसळखोर हल्ली एवढे निर्ढावले आहेत की, औषधांमध्येही ते भेसळ करतात. सरकारी इस्पितळांसाठी केली जाणारी औषधखरेदी नेहमीच शंकेच्या घेºयात असते. परिसीमा म्हणजे आपले रस्तेही या भेसळीच्या तावडीतून सुटलेले नाहीत!

भेसळखोरांना कायद्याची कसलीही भीती राहिलेली नाही, हेच खरे. प्रशासकीय बेपर्वाईमुळे ते कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत सुटतात. मला असे ठामपणे वाटते की, भेसळखोरांविरुद्ध संपूर्ण देशात एक महाअभियान चालवायला हवे. त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. यादृष्टीने एक दमदार पाऊल उचलल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करीन. आजन्म कारावासाच्या धाकाने निदान महाराष्ट्रात तरी कोणी भेसळ करायला धजावणार नाही, अशी आशा करू या!