शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गरीब ‘आयुष्यमान’ होवो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:49 IST

आर्थिक दुर्बल घटकांवर माफक दरात उपचार करणारी आयुष्यमान योजना केंद्र सरकारने जाहीर केली़

आर्थिक दुर्बल घटकांवर माफक दरात उपचार करणारी आयुष्यमान योजना केंद्र सरकारने जाहीर केली़ या योजनेंतर्गत दुर्बल घटकांवर गंभीर शस्त्रक्रिया १२ ते १८ टक्क्यांनी कमी दरात होणार आहेत़ गरिबांसाठी ही योजना लाभदायी आहे़ मात्र याची अंमलबजावणी कशाप्रकारे होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे़ कारण राज्यघटनेत या देशातील प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्यात आले आहेत. पुरेसे अन्न मिळणे, मूलभूत शिक्षण, जगण्याचा अधिकार हे सर्वसामान्यांचे हित जपणारे अधिकार राज्यघटनेने बहाल केले आहेत़ त्याची अंमलबजावणी करण्याची नैतिक जबाबदारी सरकारची असते़ मात्र शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात पाच दशकांचा काळ जावा लागला़ त्यातही मोफत व सक्तीचे शिक्षण देताना सरकारने पुरेसा अभ्यास केला नाही़ आठवीपर्यंत नापास न करण्याची संकल्पना योग्य नसून त्यावर पुनर्विचारही सुरु झालेला आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टी हटवण्याचे धोरण दोन दशकांपूर्वी आखण्यात आले़ या योजनेची अंमलबजावणीही केवळ कागदावरच राहिली, या काळात झोपडपट्टी वाढली़ त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनत गेला़ ‘गरिबी हटाव’ योजनेअंतर्गत सरकारच्या अनेक योजना गरिबांपर्यंत पोहोचत नाहीत, हे वास्तव आहे़ त्यात भ्रष्टाचार होतो़ हे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे बँक खाते उघडण्याचे सरकारने ठरवले़ ही योजनादेखील पुरेशी प्रभावी ठरली नाही़आज अनेक बँक खाती बंद आहेत़ कित्येक बँक खात्यांतून व्यवहार होत नाहीत़ आम्हाला गरिबांची काळजी आहे, असे प्रत्येक सरकार सांगते़ गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या़ मात्र त्यातून आजवर गरिबी कमी झाली नाही किंवा गरीबही होते तसेच आहेत. गरिबांना सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचार देणे ही सरकारची मुलभूत जबाबदारी आहे़ अनेक देशांमध्ये गरिबांवर मोफत उपचार केले जातात, पण अशा योजना सरसकटपणे आपल्याकडे राबवणे तूर्तास तरी शक्य होईल असे दिसत नाही. दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्र एवढे महाग झालेले आहे, की आता दैनंदिन आजारावरील औषधेही परवडण्यासारखी राहिलेली नाहीत़ शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या उपकरणांचे दर वाढले आहेत़ त्यामुळे शस्त्रक्रिया महाग झाल्या आहेत़ अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नवीन योजना जाहीर केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न उपस्थित होतो़ तेव्हा एकंदरीत विचार करता गरिबांसाठी आखलेल्या या नवीन योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी एवढीच या निमित्ताने अपेक्षा़़़