शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बीडीडी विकासाच्या प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 23:58 IST

वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी टाटा कंपनीची केलेली निवड योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आणि पुन्हा एकदा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या आशा पल्लवित झाल्या.

वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी टाटा कंपनीची केलेली निवड योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आणि पुन्हा एकदा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या आशा पल्लवित झाल्या़ राज्यातील सत्ता हाती घेतल्यानंतर भाजपाने इंदू मिल येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि बीडीडी चाळींचा पुनर्विकास या दोन महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या़बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, तर बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवला़ हे दोन्ही प्रकल्प कधी होणार याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे़ कारण बीडीडी चाळींचा पुनर्विकास जाहीर झाला तेव्हा तरुण असलेल्यांची तिसरी पिढी तेथे नांदत आहे़ पुनर्विकास होईल, अशी स्वप्ने बीडीडी चाळीतील भाडेकरूंना गेली तीन दशके दाखवली जात आहेत़ मात्र फडणवीस सरकारने बीडीडीच्या पुनर्विकासाची सूत्रे तातडीने हलवली आणि तेवढ्याच जोमाने याला विरोधही सुरू झाला़ गेल्या वर्षभरात वेगाने घडामोडी घडल्याने बीडीडी चाळींतील रहिवाशांना पुनर्विकास लगेचच होईल, अशी आशा निर्माण झाली होती़ सॅम्पल फ्लॅटही तयार झाला. तो रहिवाशांना मोहात पाडणारा होता़ मात्र हे घडत असताना वरळी येथील बीडीडी चाळींच्या कंत्राटासाठी न्यायालयात वाद सुरू झाला़ शिवडी येथील बीडीडी चाळींचा भूखंड केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने त्याचा वेगळा मुद्दा समोर आला़ नायगाव येथेही पुनर्विकासाला विरोध झाला़ परिणामी, रहिवाशांमध्ये सुरू झालेली बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची चर्चा हळूहळू निवळली़ आता तर पुनर्विकास होईल का, असा प्रश्न रहिवाशांसमोर आहे़ कारण सरकार दरबारी असलेली पुनर्विकासाची फाईल, याला होणारा विरोध हे सर्व पुनर्विकासाला खीळ घालणार हे रहिवाशांना कळले आहे़ त्यांची मूळ मागणी सरकारने रीतसर करार करावा, अशी आहे़ त्यावर रहिवाशांचे समाधान केले जात नाही़ सध्या रहिवासी राहत असलेले घर, दोन चाळींमधील अंतर, विकासकाला मिळणारा एफएसआय हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर रहिवाशांच्या मागण्यांचा विचार सरकारने करायला हवा़ यातील काही इमारती लवकरच १०० वर्षांच्या होतील़ येथील राहणीमान उंचावले असले तरी सुविधांचा अभाव, मोठे कुटुंब यामुळे रहिवाशांना पुनर्विकास हवाच आहे़ नायगाव, वरळी, शिवडी ही तिन्ही मुंबईतील मोक्याची ठिकाणे आहेत़ तेथे खासगी बिल्डरांच्या उत्तुंग इमारतींतील घरांना मागणी आहे़ असे असताना सरकारने बीडीडी चाळींचा पुनर्विकास करून उर्वरित भूखंडावर खासगी इमारती उभी केल्यास निश्चित कोट्यवधींचा नफा होऊ शकेल़ तेव्हा अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाला फडणवीस सरकारने तरी रहिवाशांच्या मागण्या पूर्ण करून अस्तित्वात उतरवावे एवढीच अपेक्षा़

टॅग्स :Mumbaiमुंबई