शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

बीडीडी विकासाच्या प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 23:58 IST

वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी टाटा कंपनीची केलेली निवड योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आणि पुन्हा एकदा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या आशा पल्लवित झाल्या.

वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी टाटा कंपनीची केलेली निवड योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आणि पुन्हा एकदा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या आशा पल्लवित झाल्या़ राज्यातील सत्ता हाती घेतल्यानंतर भाजपाने इंदू मिल येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि बीडीडी चाळींचा पुनर्विकास या दोन महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या़बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, तर बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवला़ हे दोन्ही प्रकल्प कधी होणार याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे़ कारण बीडीडी चाळींचा पुनर्विकास जाहीर झाला तेव्हा तरुण असलेल्यांची तिसरी पिढी तेथे नांदत आहे़ पुनर्विकास होईल, अशी स्वप्ने बीडीडी चाळीतील भाडेकरूंना गेली तीन दशके दाखवली जात आहेत़ मात्र फडणवीस सरकारने बीडीडीच्या पुनर्विकासाची सूत्रे तातडीने हलवली आणि तेवढ्याच जोमाने याला विरोधही सुरू झाला़ गेल्या वर्षभरात वेगाने घडामोडी घडल्याने बीडीडी चाळींतील रहिवाशांना पुनर्विकास लगेचच होईल, अशी आशा निर्माण झाली होती़ सॅम्पल फ्लॅटही तयार झाला. तो रहिवाशांना मोहात पाडणारा होता़ मात्र हे घडत असताना वरळी येथील बीडीडी चाळींच्या कंत्राटासाठी न्यायालयात वाद सुरू झाला़ शिवडी येथील बीडीडी चाळींचा भूखंड केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने त्याचा वेगळा मुद्दा समोर आला़ नायगाव येथेही पुनर्विकासाला विरोध झाला़ परिणामी, रहिवाशांमध्ये सुरू झालेली बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची चर्चा हळूहळू निवळली़ आता तर पुनर्विकास होईल का, असा प्रश्न रहिवाशांसमोर आहे़ कारण सरकार दरबारी असलेली पुनर्विकासाची फाईल, याला होणारा विरोध हे सर्व पुनर्विकासाला खीळ घालणार हे रहिवाशांना कळले आहे़ त्यांची मूळ मागणी सरकारने रीतसर करार करावा, अशी आहे़ त्यावर रहिवाशांचे समाधान केले जात नाही़ सध्या रहिवासी राहत असलेले घर, दोन चाळींमधील अंतर, विकासकाला मिळणारा एफएसआय हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर रहिवाशांच्या मागण्यांचा विचार सरकारने करायला हवा़ यातील काही इमारती लवकरच १०० वर्षांच्या होतील़ येथील राहणीमान उंचावले असले तरी सुविधांचा अभाव, मोठे कुटुंब यामुळे रहिवाशांना पुनर्विकास हवाच आहे़ नायगाव, वरळी, शिवडी ही तिन्ही मुंबईतील मोक्याची ठिकाणे आहेत़ तेथे खासगी बिल्डरांच्या उत्तुंग इमारतींतील घरांना मागणी आहे़ असे असताना सरकारने बीडीडी चाळींचा पुनर्विकास करून उर्वरित भूखंडावर खासगी इमारती उभी केल्यास निश्चित कोट्यवधींचा नफा होऊ शकेल़ तेव्हा अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाला फडणवीस सरकारने तरी रहिवाशांच्या मागण्या पूर्ण करून अस्तित्वात उतरवावे एवढीच अपेक्षा़

टॅग्स :Mumbaiमुंबई