शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सतरा मजलीतील संग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 15:29 IST

जळगाव महापालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीवर कुणाचा झेंडा रोवला जाणार आहे, याचा निर्णय जळगावकर १ आॅगस्ट रोजी घेणार आहेत.

जळगाव महापालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीवर कुणाचा झेंडा रोवला जाणार आहे, याचा निर्णय जळगावकर १ आॅगस्ट रोजी घेणार आहेत. ३३ वर्षे जळगाववर अनभिषिक्त राज्य करणारे सुरेशदादा जैन आणि जिल्हा परिषद, जामनेर पालिका निवडणुकीतील घवघवीत यशाचे शिल्पकार असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात खरा सामना होत आहे. २००१ मधील लोकनियुक्तनगराध्यक्ष निवडणुकीत सुरेशदादा जैन यांच्या उमेदवाराचा झालेला पराभव वगळता सलग ३१ वर्षे पालिकेवर त्यांची सत्ता आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत सुरेशदादा जैन हे घरकूल प्रकरणामुळे जळगावबाहेर असतानाही जळगावकरांनी त्यांच्या खान्देश विकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून दिले होते. बहुमत थोडक्यात हुकले असले तरी राष्टÑवादी काँग्रेस आणि मनसेच्या पाठिंब्याने पाच वर्षे जैन यांची सत्ता राहिली. मात्र २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जैन यांचा पराभव झाला होता. १९८० पासून जळगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जैन यांचा हा पहिलाच पराभव होता. जामीनावर सुटका झाल्यानंतर दीड वर्षांपासून जैन हे पुन्हा एकदा जळगावच्या राजकीय व सामाजिक कार्यात सक्रीय झाले. २००१ मध्ये भाजपाचे नगराध्यक्ष तर पालिका सभागृहात जैन यांच्या आघाडीचे बहुमत असे चित्र होते. भाजपाच्या १७ महिन्यांच्या कार्यकाळात महापालिकेचे आर्थिक गणित बिघडल्याचा जैन गटाचा आरोप आहे. घरकुलांसाठी घेतलेले हुडको आणि जिल्हा बँकेचे कर्ज थकित आहे. २०१२ पासून महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे भाडे थकित आहे. आर्थिक कोंडीमुळे महापालिकेच्या विकास कार्याला मर्यादा आल्या आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य मिळविण्यासाठी सुरेशदादा जैन यांनी प्रयत्न केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यासाठी सहकार्य केले. या परिस्थितीत जैन यांनी भाजपापुढे युतीचा प्रस्ताव दिला होता. मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे यांचा युतीला उघडपणे विरोध होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही युतीच्या पारड्यात वजन न टाकल्याने महाजन हे एकाकी पडल्याचे चित्र आहे. अखेर जागावाटपावरुन युती बारगळली. ‘शतप्रतिशत’चा नारा देत भाजपाने राष्टÑवादी, मनसे आणि खाविआचे मातब्बर नगरसेवक ओढले. भाजपामध्ये प्रवेशासाठी ३० लाखांची आॅफर; अन्यथा हद्दपारीची कारवाई करण्याची धमकी राष्टÑवादीच्या नगरसेविकेला मिळाल्याचा आरोप राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी थेट विधानसभेत केल्याने भाजपा सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊ शकते, याचा संदेश राज्यभर गेला. साम, दाम, दंड, भेदाची चर्चा पालघरपाठोपाठ जळगावात सुरु झाली.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक