शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधनाची लढाई सुरूच राहील

By admin | Updated: May 23, 2017 06:52 IST

प्रबोधनकार सत्यपाल महाराजांवर मुंबईत झालेल्या प्राणघातक हल्ल्याने चळवळीतील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सत्यपाल महाराज चार दशकांपासून प्रबोधनाचे कार्य अव्याहतपणे करीत आहेत.

प्रबोधनकार सत्यपाल महाराजांवर मुंबईत झालेल्या प्राणघातक हल्ल्याने चळवळीतील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सत्यपाल महाराज चार दशकांपासून प्रबोधनाचे कार्य अव्याहतपणे करीत आहेत. ते धर्मविरोधी नाहीत, ईश्वरावर टीका करीत नाहीत. धर्मात मागाहून शिरलेल्या अनिष्ट प्रथांवर महाराज हल्ला करतात आणि कीर्तनाला जमलेल्या बायाबापड्यांच्या डोळ्यात अंजन घालतात. त्यांच्या कृती आणि उक्तीत विसंगती नसते, त्यामुळे खेड्यापाड्यातील माणसे त्यांना आत्मसात करतात. महाराजांच्या प्रवचनातून प्रेरणा घेऊन गावखेड्यातील तरुण आंतरजातीय विवाह करतात. आपल्या घरातील अंधश्रद्धेला मूठमाती देतात. लातूरनजीकच्या गावात सत्यपाल महाराजांच्या कीर्तनात बंदोबस्तावर असलेला पोलीस त्यांचे प्रबोधन ऐकून एका क्षणात दारू सोडतो. लग्न, तेरवीत अवाजवी खर्च न करण्याचा संकल्प हजारो माणसे घेतात. हे अद्भुत कीर्तनातून घडविणाऱ्या या प्रबोधनकारावर हल्ला करणाऱ्या त्या माथेफिरूचा नेमका हेतू काय, हा प्रश्न कार्यकर्त्यांसारखाच महाराजांनाही म्हणूनच अस्वस्थ करीत आहे.महाराजांवरील हल्ल्यामागे धर्मांध हिंदुत्ववादी संघटना असल्याचे काही अतिउत्साही पुरोगाम्यांना वाटते. तसा निषेधाचा स्वर तातडीने आळवल्याही गेला. खरे तर या हल्ल्यामागील मनसुबे उघड झाल्याशिवाय अशा प्रतिक्रिया व्यक्त करणे पुरोगामी चळवळीसाठीच मारक ठरत असते. महाराजांवर हल्ला करणारा धर्मांध किंवा हिंदुत्ववादी असेल तर त्याचा निषेध व्हायलाच हवा. पण, तो तसा नसेल तर मग कुणाचा निषेध करायचा, या प्रश्नाचे उत्तर पुरोगामी मंडळींकडे नाही. या हल्ल्यामागे आणखी एक कारण असू शकते, महाराजांच्या व्यसनमुक्तीच्या प्रवचनामुळे हा माथेफिरू, दारूड्या दुखावला व त्यातून त्याने महाराजांवर हल्ला केला. एखाद्या दारूविक्रेत्याने त्याला तशी सुपारी दिली असावी. अहमदनगरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भापकर गुरुजींवर अलीकडे दारूविक्रेत्यांनी केलेला हल्ला इथे दुर्लक्षित करता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर बिथरलेल्या दारूविके्रत्यांनी आंदोलनातील कार्यकर्त्यांवर हल्ले केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महामार्गावरील दारूची दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे दारूविक्रेते या आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या जिवावर उठले आहेत. सत्यपाल महाराजांवरील हल्ल्यामागे ही माणसे तर नाहीत ना, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. या घटनेमागे धर्मांध शक्तींचा हात नसल्याचे उद्या स्पष्ट झाले तर आज निषेध व्यक्त करणारे पुरोगामी उद्या महाराजांच्या सोबत राहतील का? अकोल्यात भजन सत्याग्रह करीत असलेले गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते महाराजांसोबत नक्कीच राहतील. मात्र नागपुरातील विचारवंतांचा या प्रकरणातील रस नंतर संपून जाईल. सत्यपाल महाराजांचे प्रबोधन त्या कार्यकर्त्यांसाठी ‘साध्य’ आहे पण या विचारवंतांसाठी ते ‘साधन’ आहे. महाराज सिरसोलीत गरिबांचे लग्न लावून देतात, अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत करतात त्यावेळी तिथे हे विचारवंत कधीच दिसत नाहीत. कार्यकर्ते आणि विचारवंतांमध्ये हाच मूलभूत फरक असतो. महाराज कीर्तनातून उपेक्षित समाजाचे प्राक्तन मांडतात. शेवटच्या माणसाचे दु:ख समजून घेतात आणि त्याच्या निराकरणाचा मार्ग समाजाच्या अज्ञानात शोधतात. ते कधी थकत नाहीत, कंटाळत नाहीत. त्यांना निवृत्ती घ्यावीशीही वाटत नाही. त्यामुळे परवा झालेला हल्ला त्यांना विचलित करू शकत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचे विचार त्यांच्या जीवनधर्माच्या मुळाशी आहेत. पोथ्यांची पारायणे करण्यापेक्षा राज्यघटनेचे पारायण करा, असे पोटतिडकीने सांगणाऱ्या महाराजांवर किशोर जाधव या माथेफिरूने केलेला हल्ला समाज म्हणून आपण साऱ्यांनाच अस्वस्थ करणारा आहे. महाराजांच्या कीर्तनाने दलित-बहुजनांना जागवले आहे. मग त्यातीलच एक असलेल्या किशोर जाधवला त्यांना संपवावे का वाटते? समाजाला आपलेच कल्याण जाचक का वाटत असते? प्रबोधनाची लढाई कधीही संपत नाही. ती सदैव सुरूच राहिलेली आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेनंतर सत्यपाल महाराजांची जबाबदारी आणखी वाढलेली आहे.- गजानन जानभोर