शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सत्प्रवृत्तींचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 01:06 IST

आपल्या अंगाखांद्यावर असंख्य सत्प्रवृत्तींना, संघटनांना, व्यक्तींना आणि विचारवाहकांना सहजपणे आश्रय देऊन त्यांच्या वाटचालीची काळजी करणारा व असंख्य निराधारांना आश्रय देणारा सार्वजनिक आयुष्यांचा एक समर्थ आधारवड न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे.

आपल्या अंगाखांद्यावर असंख्य सत्प्रवृत्तींना, संघटनांना, व्यक्तींना आणि विचारवाहकांना सहजपणे आश्रय देऊन त्यांच्या वाटचालीची काळजी करणारा व असंख्य निराधारांना आश्रय देणारा सार्वजनिक आयुष्यांचा एक समर्थ आधारवड न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. आचार्य दादा धर्माधिकारी या थोर विचारवंताचे लाभलेले पितृत्व, लहानपणी प्रत्यक्ष बापू आणि बा यांचा मिळालेला सहवास, वकिलीतले अमाप यश व न्यायमूर्ती म्हणून मिळालेली अपार कीर्ती या गोष्टी जशा त्यांच्या वाट्याला आल्या होत्या तसेच असंख्य मुलामुलींचे पालकत्व त्यांनी व त्यांच्या दिवंगत पत्नी ताराबाई यांनी सांभाळले होते. बाबा आमटे, नरहर कुरुंदकर, पु.ल. ही माणसे आपल्या परिवारातली मानणारे न्यायमूर्ती वर्षानुवर्षे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. बजाज या उद्योगसमूहाचे गांधीवादी सल्लागार होते. सेवाग्राम, परंधाम आणि गांधी, विनोबांच्या विचारांना वाहून घेतलेल्या अनेक संस्थांचे मूक पालक होते. एवढी पदे व सन्मान वाट्याला आल्यानंतरही त्यांच्या स्वभावात एक मृदू पितृत्व होते. त्यांच्या घरातील मुले, सुना व नातवंडांसह ते इतरही अनेकांच्या वाट्याला आले. धर्माधिकारी असूनही सेक्युलर विचार करणारे, जातधर्म यांच्या पलीकडचाच नव्हे तर त्याहूनही उंचीचा विचार करणारे, जनतेत ईश्वर पाहणारे न्यायमूर्ती व्यक्तिगत जीवनात कमालीचे शिस्तप्रिय, कलाप्रिय व सेवाधर्मी होते. गांधीवादी असूनही त्यांनी अहिंसेचे स्तोम माजविले नाही. देशात सुरू असलेला धार्मिक उन्माद व सामाजिक दुहीकरण याविरुद्ध सगळ्या गांधीवादी संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठविला पाहिजे, असे त्यांचे मत होते. या संघटनांमध्ये ते बळ राहिले नसल्याची खंतही ते नेहमी व्यक्त करीत. देशात आणीबाणी असताना ते तिच्याविरोधात उभे राहिले. त्यासाठी त्यांनी आपल्या तेव्हाच्या न्यायमूर्तीपदाचीही पर्वा केली नाही. ऐन आणीबाणीत जयप्रकाश नारायण नागपुरात आले. तेव्हा त्यांचा मुक्काम न्यायमूर्तींकडेच होता. त्यांचे असे करणे त्यांना त्यांच्या पदावरून घालवू शकेल असे तेव्हा अनेकांनी म्हटले. त्यावर ‘माझ्या घरी जयप्रकाश येऊ शकत नसतील तर माझ्या जगण्या-बोलण्याला अर्थ तरी कोणता उरेल’ असे ते तेव्हा म्हणाले. आणीबाणीवरून सर्वसेवा संघात, रा.कृ. पाटील व दादा धर्माधिकारी असे दोन गट पडले. त्या वेळी आणीबाणीला विरोध करणाऱ्यांत दादांच्या गटासोबत ते राहिले. आणीबाणीत भूमिगत असणाºया अनेकांना त्यांच्या घराचा आश्रय होता. न्यायमूर्ती असामान्य वक्ते होते. विषय व त्यातील प्रत्येक तपशील यावर त्यांची पकड होती. त्यामुळे नांदेडात झालेल्या घटनेवरील त्यांच्या तीनही भाषणांची पुस्तके नरहर कुरुंदकरांनी तत्काळ काढली व ती भाषणाच्याच स्वरूपात लोकांच्या हाती दिली. गांधी, विनोबा, सर्वोदय, स्वातंत्र्यलढा आणि आचार्य दादा यांच्यासारखेच त्यांनी आपल्या पत्नीवर ‘तारासुक्त’ हे अतिशय संवेदनशील पुस्तक लिहिले. त्या पुस्तकालाही एक विलक्षण दर्जा असून पत्नीविषयीचा विचार कसा केला जावा याचे अतिशय सूचक मार्गदर्शन त्यात आहे. ताराबाई कॅन्सरने अस्वस्थ असताना त्यांची भेट घेतली. तेव्हा एका क्षणी त्या म्हणाल्या, ‘अरे, परवा मी जवळपास गेलेच होते.’ त्यावर त्यांची गंमत करायची म्हणून म्हटले, ‘गेलाच होता तर आलात कशाला?’ असे विचारता त्याला उत्तर देताना त्या तत्काळ म्हणाल्या, ‘अरे तेथे तुझा हा काका कुठे दिसला नाही म्हणून...’ एक कुटुंबवत्सल समाजयोगी, अध्ययनशील कार्यकर्ता आणि विचारांना आचाराची जोड देणारा संयमी व विवेकी माणूस ही त्यांची खरी ओळख. तीच त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनात आज आहे. त्यातील अनेकांना एक अनाथपणही जाणवत आहे. त्यांच्यावर टीका करणारा वा त्यांच्यापासून दूर राहू इच्छिणारा माणूस अद्याप भेटायचा आहे. काही माणसे केवळ मूल्ये घेऊन जन्माला येतात. त्यांना अमंगळसे काही चिकटले नसते. सर्वांचे आपलेपण घेऊन या समाजाला जोडून ठेवणारी अशी माणसेही आता दुर्मीळ होत चालली आहेत. अशा काळात साºयांना आपलेसे वाटावे असे न्यायमूर्तींचे सर्वांप्रति स्रेहभाव जपणारेव्यक्तिमत्त्व आपल्यातून जावे याएवढे दुर्दैव दुसरे नाही. त्यांच्या स्मृतींना अभिवादन.

टॅग्स :nagpurनागपूर