शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आधारचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 02:33 IST

आधारकार्ड हे आज प्रत्येक भारतीयाचे जीव की प्राण झाले आहे. या आधाराशिवाय तुम्ही या देशात जगूच शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

आधारकार्ड हे आज प्रत्येक भारतीयाचे जीव की प्राण झाले आहे. या आधाराशिवाय तुम्ही या देशात जगूच शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक गोष्ट आधारला जोडण्याचा, प्रत्येक कामासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्याचा जणू चंगच केंद्र सरकारने बांधला आहे. त्यात गैर काहीच नाही. देशातील प्रत्येक नागरिकाकडे एकसमान ओळखपत्र असले पाहिजे. परंतु या योजनेसोबत सुरू झालेल्या भारंभार गोंधळामुळे मात्र नको तो ‘आधार’ असे म्हणायची वेळ लोकांवर आली आहे. आधार कार्डच्या वापरावरून सर्वोच्च न्यायालयानेही अनेकदा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. आधार कार्डचा वापर आणि यामुळे लोकांच्या खासगीपणाच्या अधिकारावर येणारी गदा यावर वादविवाद असतानाच त्यातील वाढत्या त्रुटी हे सुद्धा डोकेदुखीचे कारण ठरत आहे. आतापर्यंत असे ४१ लाख आधारकार्ड निष्क्रिय करण्यात आले असल्याची माहिती केंद्र शासनातर्फे नुकतीच देण्यात आली. यामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झाली नसली तरी आधार कार्ड बनविण्याच्या प्रक्रियेत फार मोठ्या प्रमाणात त्रुटी झाल्या हे निश्चित आहे. यातील सर्वाधिक आश्चर्याची गोष्ट ही की अनेक लोकांनी सुरुवातीला आधार कार्ड काढताना जो बायोमेट्रिक डेटा (बुबुळ आणि अंगठ्याचे ठसे) दिला होता तो आता मेळच खात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना आवश्यक दस्तावेजांसह पुन्हा हा डेटा द्यावा लागणार आहे. माणसाचे बुबुळ अथवा बोटांचे ठसे असे बदलत नसतात. ते घेतानाच चुकीच्या पद्धतीने घेतले गेले हे स्पष्ट आहे. याशिवाय नाव, गाव, पत्ता आणि इतर माहिती नोंदवितानाही प्रचंड चुका झाल्या असून त्यात दुरुस्तीसाठी लोकांना नाहक आधार केंद्रांमध्ये खेटे घालावे लागत आहेत. यासंदर्भातील तरतुदींनुसार कुणा व्यक्तीस एकापेक्षा अधिक आधार कार्ड जारी केल्यास अथवा त्याच्या बायोमेट्रिक दस्तावेजात काही त्रुटी आढळल्यास आधार कार्ड निष्क्रिय केले जाते. हे कमी झाले की काय तर आधार योजनेतील माहितीच्या सुरक्षेचेही किती धिंडवडे निघाले हे सर्वांनीच बघितले आहे. २००९ साली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात आधार कार्ड तयार करण्याची योजना आखण्यात आली त्यावेळी देशात फोफावलेल्या भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यत पोहोचविणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे भारतवंशातील सोशिक नागरिकांनी त्याला साथ दिली. पण याचा अर्थ नागरिकांना असे वेठीस धरणे योग्य नव्हे, हे सरकारने ध्यानात ठेवले पाहिजे.