शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आधारचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 02:33 IST

आधारकार्ड हे आज प्रत्येक भारतीयाचे जीव की प्राण झाले आहे. या आधाराशिवाय तुम्ही या देशात जगूच शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

आधारकार्ड हे आज प्रत्येक भारतीयाचे जीव की प्राण झाले आहे. या आधाराशिवाय तुम्ही या देशात जगूच शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक गोष्ट आधारला जोडण्याचा, प्रत्येक कामासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्याचा जणू चंगच केंद्र सरकारने बांधला आहे. त्यात गैर काहीच नाही. देशातील प्रत्येक नागरिकाकडे एकसमान ओळखपत्र असले पाहिजे. परंतु या योजनेसोबत सुरू झालेल्या भारंभार गोंधळामुळे मात्र नको तो ‘आधार’ असे म्हणायची वेळ लोकांवर आली आहे. आधार कार्डच्या वापरावरून सर्वोच्च न्यायालयानेही अनेकदा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. आधार कार्डचा वापर आणि यामुळे लोकांच्या खासगीपणाच्या अधिकारावर येणारी गदा यावर वादविवाद असतानाच त्यातील वाढत्या त्रुटी हे सुद्धा डोकेदुखीचे कारण ठरत आहे. आतापर्यंत असे ४१ लाख आधारकार्ड निष्क्रिय करण्यात आले असल्याची माहिती केंद्र शासनातर्फे नुकतीच देण्यात आली. यामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झाली नसली तरी आधार कार्ड बनविण्याच्या प्रक्रियेत फार मोठ्या प्रमाणात त्रुटी झाल्या हे निश्चित आहे. यातील सर्वाधिक आश्चर्याची गोष्ट ही की अनेक लोकांनी सुरुवातीला आधार कार्ड काढताना जो बायोमेट्रिक डेटा (बुबुळ आणि अंगठ्याचे ठसे) दिला होता तो आता मेळच खात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना आवश्यक दस्तावेजांसह पुन्हा हा डेटा द्यावा लागणार आहे. माणसाचे बुबुळ अथवा बोटांचे ठसे असे बदलत नसतात. ते घेतानाच चुकीच्या पद्धतीने घेतले गेले हे स्पष्ट आहे. याशिवाय नाव, गाव, पत्ता आणि इतर माहिती नोंदवितानाही प्रचंड चुका झाल्या असून त्यात दुरुस्तीसाठी लोकांना नाहक आधार केंद्रांमध्ये खेटे घालावे लागत आहेत. यासंदर्भातील तरतुदींनुसार कुणा व्यक्तीस एकापेक्षा अधिक आधार कार्ड जारी केल्यास अथवा त्याच्या बायोमेट्रिक दस्तावेजात काही त्रुटी आढळल्यास आधार कार्ड निष्क्रिय केले जाते. हे कमी झाले की काय तर आधार योजनेतील माहितीच्या सुरक्षेचेही किती धिंडवडे निघाले हे सर्वांनीच बघितले आहे. २००९ साली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात आधार कार्ड तयार करण्याची योजना आखण्यात आली त्यावेळी देशात फोफावलेल्या भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यत पोहोचविणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे भारतवंशातील सोशिक नागरिकांनी त्याला साथ दिली. पण याचा अर्थ नागरिकांना असे वेठीस धरणे योग्य नव्हे, हे सरकारने ध्यानात ठेवले पाहिजे.