शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

आधारचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 02:33 IST

आधारकार्ड हे आज प्रत्येक भारतीयाचे जीव की प्राण झाले आहे. या आधाराशिवाय तुम्ही या देशात जगूच शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

आधारकार्ड हे आज प्रत्येक भारतीयाचे जीव की प्राण झाले आहे. या आधाराशिवाय तुम्ही या देशात जगूच शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक गोष्ट आधारला जोडण्याचा, प्रत्येक कामासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्याचा जणू चंगच केंद्र सरकारने बांधला आहे. त्यात गैर काहीच नाही. देशातील प्रत्येक नागरिकाकडे एकसमान ओळखपत्र असले पाहिजे. परंतु या योजनेसोबत सुरू झालेल्या भारंभार गोंधळामुळे मात्र नको तो ‘आधार’ असे म्हणायची वेळ लोकांवर आली आहे. आधार कार्डच्या वापरावरून सर्वोच्च न्यायालयानेही अनेकदा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. आधार कार्डचा वापर आणि यामुळे लोकांच्या खासगीपणाच्या अधिकारावर येणारी गदा यावर वादविवाद असतानाच त्यातील वाढत्या त्रुटी हे सुद्धा डोकेदुखीचे कारण ठरत आहे. आतापर्यंत असे ४१ लाख आधारकार्ड निष्क्रिय करण्यात आले असल्याची माहिती केंद्र शासनातर्फे नुकतीच देण्यात आली. यामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झाली नसली तरी आधार कार्ड बनविण्याच्या प्रक्रियेत फार मोठ्या प्रमाणात त्रुटी झाल्या हे निश्चित आहे. यातील सर्वाधिक आश्चर्याची गोष्ट ही की अनेक लोकांनी सुरुवातीला आधार कार्ड काढताना जो बायोमेट्रिक डेटा (बुबुळ आणि अंगठ्याचे ठसे) दिला होता तो आता मेळच खात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना आवश्यक दस्तावेजांसह पुन्हा हा डेटा द्यावा लागणार आहे. माणसाचे बुबुळ अथवा बोटांचे ठसे असे बदलत नसतात. ते घेतानाच चुकीच्या पद्धतीने घेतले गेले हे स्पष्ट आहे. याशिवाय नाव, गाव, पत्ता आणि इतर माहिती नोंदवितानाही प्रचंड चुका झाल्या असून त्यात दुरुस्तीसाठी लोकांना नाहक आधार केंद्रांमध्ये खेटे घालावे लागत आहेत. यासंदर्भातील तरतुदींनुसार कुणा व्यक्तीस एकापेक्षा अधिक आधार कार्ड जारी केल्यास अथवा त्याच्या बायोमेट्रिक दस्तावेजात काही त्रुटी आढळल्यास आधार कार्ड निष्क्रिय केले जाते. हे कमी झाले की काय तर आधार योजनेतील माहितीच्या सुरक्षेचेही किती धिंडवडे निघाले हे सर्वांनीच बघितले आहे. २००९ साली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात आधार कार्ड तयार करण्याची योजना आखण्यात आली त्यावेळी देशात फोफावलेल्या भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यत पोहोचविणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे भारतवंशातील सोशिक नागरिकांनी त्याला साथ दिली. पण याचा अर्थ नागरिकांना असे वेठीस धरणे योग्य नव्हे, हे सरकारने ध्यानात ठेवले पाहिजे.