शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

बारामतीची साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 01:36 IST

बारामतीची साखर हा अलीकडे चर्चेचा विषय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे मिष्किली करण्यात आणि भल्याभल्यांना शब्दात पकडण्यात पटाईत आहेत.

बारामतीची साखर हा अलीकडे चर्चेचा विषय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे मिष्किली करण्यात आणि भल्याभल्यांना शब्दात पकडण्यात पटाईत आहेत. राजकारणाचा दांडगा अनुभव आणि देशातील कृषी, संरक्षण अशी मंत्रिपदे शिवाय राज्याचे मुख्यमंत्रिपद संभाळलेले शरद पवार यांनी अलीकडेच हवामान खात्याला साखरेचं पोतं भेट देऊन चर्चेचा विषय केला आहे. त्यापूर्वी त्यांनी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर बारामतीची साखर वाटू अशी पैज लावली होती. योगायोगाने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि पवार यांनी पुण्याच्या हवामान खात्याला माळेगावच्या कारखान्यातून एक साखरेचे पोते पाठवले. शेती आणि हवामान खाते याचा घनिष्ठ संबंध आहे. मेपासून मान्सूनची भाकिते ऐकताना माध्यमे हवामान खात्याच्या भाकितांना ठळक प्रसिध्दी देतात. वैशाख वणव्यातच आषाढ श्रावणामध्ये येणाºया पावसाची भाकिते ऐकून बळीराजा सुखावतो. या अंदाजावर शंभर टक्के कुणाचाच विश्वास नसतो तरीही भारतीय हवामान खात्याचे अंदाज हे जगाच्या तुलनेत सरस आहेत हे मान्य करावे लागते. वाºयाची दिशा, वाºयाचा वेग , तापमान यावरून हे अंदाज बांधले जातात. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या ही जगाला भेडसावत असून त्यामुळे हवामानात कधी बदल होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे अंदाज बांधणे शास्त्रज्ञांनाही कठीण जाऊ लागले आहे. हवामानाचे अंदाज यावर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेनेही अविश्वास दाखवत हवामान खात्याला लिंबू मिरची बांधून वैज्ञानिकांची दृष्ट काढली होती. हवामान खात्याचे अंदाज चुकण्यात ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे आणि ते वाढवण्यास आपणच कारणीभूत आहोत हे मात्र सोयीस्कर विसरतो. मे-जूनमध्ये हवामान खात्याच्या अंदाजाला महत्त्व देणारी माध्यमे आणि हवामानाच्या अंदाजावर अभ्यास करणारे वैज्ञानिक यांच्या परिश्रमाला मातीमोल केल्यासारखे आहे. कृषी आणि हवामान खात्याची सांगड असताना केंद्रात कृषी मंत्री असलेल्या शरद पवार यांना हवामान खात्याच्या अंदाजावर विनोद करणे ठीक आहे पण साखर वाटणे कसे काय सुचले हेच कळत नाही. हवामान खात्याचे अंदाज हे अंदाजच असतात. फार तर त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते किंवा ते तंतोतंत करण्यासाठी हवामान खात्याचे अधुनिकीकरण करण्यासाठी उपाय सुचवले जाऊ शकतात. त्यांनी त्याची सुरुवात कृषी मंत्री असताना केली असती तर त्याची फळे आज शेतकºयांना मिळाली असती.