शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीची साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 01:36 IST

बारामतीची साखर हा अलीकडे चर्चेचा विषय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे मिष्किली करण्यात आणि भल्याभल्यांना शब्दात पकडण्यात पटाईत आहेत.

बारामतीची साखर हा अलीकडे चर्चेचा विषय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे मिष्किली करण्यात आणि भल्याभल्यांना शब्दात पकडण्यात पटाईत आहेत. राजकारणाचा दांडगा अनुभव आणि देशातील कृषी, संरक्षण अशी मंत्रिपदे शिवाय राज्याचे मुख्यमंत्रिपद संभाळलेले शरद पवार यांनी अलीकडेच हवामान खात्याला साखरेचं पोतं भेट देऊन चर्चेचा विषय केला आहे. त्यापूर्वी त्यांनी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर बारामतीची साखर वाटू अशी पैज लावली होती. योगायोगाने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि पवार यांनी पुण्याच्या हवामान खात्याला माळेगावच्या कारखान्यातून एक साखरेचे पोते पाठवले. शेती आणि हवामान खाते याचा घनिष्ठ संबंध आहे. मेपासून मान्सूनची भाकिते ऐकताना माध्यमे हवामान खात्याच्या भाकितांना ठळक प्रसिध्दी देतात. वैशाख वणव्यातच आषाढ श्रावणामध्ये येणाºया पावसाची भाकिते ऐकून बळीराजा सुखावतो. या अंदाजावर शंभर टक्के कुणाचाच विश्वास नसतो तरीही भारतीय हवामान खात्याचे अंदाज हे जगाच्या तुलनेत सरस आहेत हे मान्य करावे लागते. वाºयाची दिशा, वाºयाचा वेग , तापमान यावरून हे अंदाज बांधले जातात. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या ही जगाला भेडसावत असून त्यामुळे हवामानात कधी बदल होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे अंदाज बांधणे शास्त्रज्ञांनाही कठीण जाऊ लागले आहे. हवामानाचे अंदाज यावर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेनेही अविश्वास दाखवत हवामान खात्याला लिंबू मिरची बांधून वैज्ञानिकांची दृष्ट काढली होती. हवामान खात्याचे अंदाज चुकण्यात ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे आणि ते वाढवण्यास आपणच कारणीभूत आहोत हे मात्र सोयीस्कर विसरतो. मे-जूनमध्ये हवामान खात्याच्या अंदाजाला महत्त्व देणारी माध्यमे आणि हवामानाच्या अंदाजावर अभ्यास करणारे वैज्ञानिक यांच्या परिश्रमाला मातीमोल केल्यासारखे आहे. कृषी आणि हवामान खात्याची सांगड असताना केंद्रात कृषी मंत्री असलेल्या शरद पवार यांना हवामान खात्याच्या अंदाजावर विनोद करणे ठीक आहे पण साखर वाटणे कसे काय सुचले हेच कळत नाही. हवामान खात्याचे अंदाज हे अंदाजच असतात. फार तर त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते किंवा ते तंतोतंत करण्यासाठी हवामान खात्याचे अधुनिकीकरण करण्यासाठी उपाय सुचवले जाऊ शकतात. त्यांनी त्याची सुरुवात कृषी मंत्री असताना केली असती तर त्याची फळे आज शेतकºयांना मिळाली असती.