शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीची साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 01:36 IST

बारामतीची साखर हा अलीकडे चर्चेचा विषय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे मिष्किली करण्यात आणि भल्याभल्यांना शब्दात पकडण्यात पटाईत आहेत.

बारामतीची साखर हा अलीकडे चर्चेचा विषय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे मिष्किली करण्यात आणि भल्याभल्यांना शब्दात पकडण्यात पटाईत आहेत. राजकारणाचा दांडगा अनुभव आणि देशातील कृषी, संरक्षण अशी मंत्रिपदे शिवाय राज्याचे मुख्यमंत्रिपद संभाळलेले शरद पवार यांनी अलीकडेच हवामान खात्याला साखरेचं पोतं भेट देऊन चर्चेचा विषय केला आहे. त्यापूर्वी त्यांनी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर बारामतीची साखर वाटू अशी पैज लावली होती. योगायोगाने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि पवार यांनी पुण्याच्या हवामान खात्याला माळेगावच्या कारखान्यातून एक साखरेचे पोते पाठवले. शेती आणि हवामान खाते याचा घनिष्ठ संबंध आहे. मेपासून मान्सूनची भाकिते ऐकताना माध्यमे हवामान खात्याच्या भाकितांना ठळक प्रसिध्दी देतात. वैशाख वणव्यातच आषाढ श्रावणामध्ये येणाºया पावसाची भाकिते ऐकून बळीराजा सुखावतो. या अंदाजावर शंभर टक्के कुणाचाच विश्वास नसतो तरीही भारतीय हवामान खात्याचे अंदाज हे जगाच्या तुलनेत सरस आहेत हे मान्य करावे लागते. वाºयाची दिशा, वाºयाचा वेग , तापमान यावरून हे अंदाज बांधले जातात. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या ही जगाला भेडसावत असून त्यामुळे हवामानात कधी बदल होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे अंदाज बांधणे शास्त्रज्ञांनाही कठीण जाऊ लागले आहे. हवामानाचे अंदाज यावर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेनेही अविश्वास दाखवत हवामान खात्याला लिंबू मिरची बांधून वैज्ञानिकांची दृष्ट काढली होती. हवामान खात्याचे अंदाज चुकण्यात ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे आणि ते वाढवण्यास आपणच कारणीभूत आहोत हे मात्र सोयीस्कर विसरतो. मे-जूनमध्ये हवामान खात्याच्या अंदाजाला महत्त्व देणारी माध्यमे आणि हवामानाच्या अंदाजावर अभ्यास करणारे वैज्ञानिक यांच्या परिश्रमाला मातीमोल केल्यासारखे आहे. कृषी आणि हवामान खात्याची सांगड असताना केंद्रात कृषी मंत्री असलेल्या शरद पवार यांना हवामान खात्याच्या अंदाजावर विनोद करणे ठीक आहे पण साखर वाटणे कसे काय सुचले हेच कळत नाही. हवामान खात्याचे अंदाज हे अंदाजच असतात. फार तर त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते किंवा ते तंतोतंत करण्यासाठी हवामान खात्याचे अधुनिकीकरण करण्यासाठी उपाय सुचवले जाऊ शकतात. त्यांनी त्याची सुरुवात कृषी मंत्री असताना केली असती तर त्याची फळे आज शेतकºयांना मिळाली असती.