शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
4
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
5
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
6
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
7
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
8
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
9
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
10
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
11
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
12
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
13
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
14
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
15
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
16
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
17
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
18
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
19
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
20
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

नात्यांना नख लावणाऱ्यांना सुबुद्धी दे बाप्पा!

By किरण अग्रवाल | Updated: September 4, 2022 11:25 IST

Bappa give wisdom to those who are trying to nail the relationship : अलीकडे स्वार्थांधता वाढल्याने या घटनाही वाढल्या असून, नात्यांच्या जपणुकीसाठी बाप्पा गणरायालाच साकडे घालण्याची वेळ आली आहे.

-  किरण अग्रवाल

अलीकडील काळात कौटुंबिक कलहांचे प्रमाण वाढले असून, नातेसंबंधांमधील वाद विकोपाला जाताना दिसत आहेत. याच कारणातून होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाणही मोठे आहे, म्हणूनच माणुसकीच्या व नात्यांच्या जपणुकीची बुद्धी द्यावी, अशी विनवणी बाप्पा गणरायाकडे करू या.

नातेसंबंधांना जपणं हे आजकाल खूप जिकिरीचं झालं आहे, कारण प्रत्येकाचंच मी व माझ्यातलं अडकलेपण वाढलं आहे. स्वार्थात नाती तोलली जाऊ लागल्यानं ती तुटण्याचं किंवा डागाळली जाण्याचंही भान बाळगलं जात नाही. परिणामी, समाजमनाला सुन्न करून जाणाऱ्या काही अप्रिय घटना रक्ताच्या नातेसंबंधात घडून येताना दिसतात. अलीकडे स्वार्थांधता वाढल्याने या घटनाही वाढल्या असून, नात्यांच्या जपणुकीसाठी बाप्पा गणरायालाच साकडे घालण्याची वेळ आली आहे.

 नातेसंबंधांबाबत प्रश्न उपस्थित व्हावेत अशा घटना अलीकडे वाढल्या आहेत. शेती नावावर करून देण्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी मुलानेच आईला विष पाजल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात घडला. अवघ्या साडेतीन वर्षांच्या पोटच्या मुलीवर तिच्याच पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची लज्जास्पद घटना नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदली गेली. अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या पोटच्या गोळ्याला कचराकुंडीत फेकून देण्याच्या घटनाही अधूनमधून समोर येत असतात. अशा अन्यही अनेक घटनांची यादी वाढवता येईल, ज्यातून नातेसंबंधातील आदर, विश्वास व मर्यादांचाही गळाच घोटलेला दिसून येईल. का होत चालले आहे हे अधःपतन, असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होतो.

 सोशल मीडियाच्या वाढत्या वापरातून माणूस सोशल होतो आहे, असे मारे उच्चरवाने सांगितले जाते. पण, तसे होताना संस्काराचे घडे का पालथे होताना दिसतात? माणसाने माणसाशी माणुसकीनेच वागायला हवे. मात्र, कधी कधी तो कुटुंबातच नातेसंबंधातील आप्तांशीही पशुत्वाने वागताना दिसतो; त्यामुळेच ‘नरेची केला किती हीन नर’ असा प्रश्न उपस्थित होऊन जातो. म्हणायला अशी उदाहरणे ही अपवादात्मकच घडतात, परंतु संपूर्ण समाज मनाला ती अस्वस्थ करून सोडतात आणि तितकेच नव्हेतर, परस्परातील नात्यांना नख लावणारीही ठरतात.

 दुसऱ्यांकडून होणारी अवहेलना किंवा छळवणूक एकवेळ सहन केली जाऊ शकते; पण स्वकीयांकडून तसे घडले तर तो घाव अधिक वेदना देऊन जातो. दुर्दैवाने अशा वेदना जेव्हा वाट्यास येतात तेव्हा व्यक्ती कोलमडून पडल्याखेरीज राहत नाही. हे कोलमडलेपण व्यक्तीला निराशेच्या गर्तेत तर ढकलतेच; शिवाय आत्महत्येच्या अविवेकी विचारापर्यंतही पोहोचविते. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने देशातील आत्महत्यांची जी आकडेवारी व त्याची कारणे दिली आहेत त्यात सर्वाधिक म्हणजे ३३.२ टक्के आत्महत्या कौटुंबिक समस्येतून घडून आल्याचे म्हटले आहे, यावरूनही नातेसंबंधातील नाराजी व दुराव्याचे वाढते प्रमाण किती भयग्रस्त होत चालले आहे हे लक्षात यावे.

 गणरायाच्या आगमनाने सध्या सारे वातावरण भारावले आहे. चैतन्याचा व मांगल्याचा उत्सव सुरू आहे. बुद्धिदाता देवता म्हणून गणरायांना पूजले जाते. संकट, विघ्न, दुःखाचे हरण करून सुख-समृद्धीची प्रार्थना विनायकाकडे केली जात आहे. ती करतानाच माणुसकीची परीक्षा पाहणाऱ्या व नात्यांना नख लावणाऱ्यांना सुबुद्धी दे बाप्पा, अशीही प्रार्थना करू या; इतकेच यानिमित्ताने.