शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गरीब देशाचे ‘श्रीमंत’ थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:19 IST

मार्क्सला जाऊन आता शंभरावर वर्षे झाली. त्याच्या विचारांपासून त्याच्याच अनुयायांनी फारकतही घेतली. मात्र त्याच्या विचारांचा गाभा अद्याप तेवढाच खरा आहे. जगाच्या एकूण संपत्तीपैकी ७० टक्के संपत्ती फक्त ४२ कुटुंबांच्या मालकीची आहे हे जागतिक पाहणीतले एक वास्तव जेवढे बोलके तेवढीच भारताच्या एकूण संपत्तीपैकी ७९ टक्के संपत्ती केवळ एक टक्का लोकांच्या ताब्यात असल्याचे सत्यही अतिशय जळजळीत आहे.

मार्क्सला जाऊन आता शंभरावर वर्षे झाली. त्याच्या विचारांपासून त्याच्याच अनुयायांनी फारकतही घेतली. मात्र त्याच्या विचारांचा गाभा अद्याप तेवढाच खरा आहे. जगाच्या एकूण संपत्तीपैकी ७० टक्के संपत्ती फक्त ४२ कुटुंबांच्या मालकीची आहे हे जागतिक पाहणीतले एक वास्तव जेवढे बोलके तेवढीच भारताच्या एकूण संपत्तीपैकी ७९ टक्के संपत्ती केवळ एक टक्का लोकांच्या ताब्यात असल्याचे सत्यही अतिशय जळजळीत आहे. कारण, हा देश गरिबांचा असला तरी त्यावर मालकी श्रीमंतांची आहे हे उघड करणारे हे वास्तव आहे. सारीच संपत्ती, मार्क्स म्हणतो तशी या धनवंतांनी चोरीच्या वा लुटीच्या मार्गाने मिळविली नसेल. पण त्या वर्गाची स्वार्थी व लबाड वृत्ती मात्र पूर्वीएवढीच आजही कायम राहिली आहे. भारतातील सगळ्या राष्टÑीयीकृत बँका येथील बड्या उद्योगपतींनी लुबाडल्या आहेत आणि त्यातले अनेकजण ती लूट घेऊन देशाबाहेर पळूनही गेले आहेत. विजय मल्ल्या, ललित आणि नीरव हे दोन मोदी, कैलास अग्रवाल, नीलेश पारस, किरण मेहता, बलराम गर्ग अशी या बड्या व पळालेल्या चोरांची नावे आहेत. आज ते देशाबाहेर आहेत आणि या पार्श्वभूमीवर ज्या आणखीही काही बड्या धनवंतांकडे बँकांच्या कर्जाची प्रचंड रक्कम थकलेली आहे त्यांची यादी खा. संजय सिंह या राज्यसभा सदस्याने नुकतीच जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या कोळसा, पोलाद व कृषी या महत्त्वाच्या समित्यांचे सिंह हे सदस्य आहेत आणि त्यांनी ‘आता हे लोक तरी पळून जाणार नाहीत याची खबरदारी घ्या’ असे सीबीआयला सुचविले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या या यादीत सर्वात वरचे नाव अनिल अंबानीचे असून त्याच्याकडील बँकांची थकबाकी १ लक्ष २५ हजार कोटी एवढी प्रचंड आहे. (तरी त्याच्यावरील २६ हजार कोटींचा एक कर्जभार त्यांचे थोरले बंधू मुकेश अंबानी यांनी नुकताच उचलला आहे.) अनिल अग्रवाल याची थकबाकी १ लक्ष ३ हजार कोटींची, रूईया बंधूंची १ लक्ष १ हजार कोटींची, गौतम अदानींची ९६ हजार ३१ कोटींची, मनोज गौरची ७५ हजार १६३ कोटींची, सज्जन जिंदालची ५८ हजार १७१ कोटींची, सी.एन. रावची ४७ हजार ९७६ कोटींची, एल. मधुसूदन रावची ४७ हजार १७२ कोटींची, वेणुगोपाल धूतची ४५ हजार ४०५ कोटींची, ब्रिजभूषण जिंदालची ३७ हजार २४८ कोटींची, पीव्हीके रेड्डीची ३३ हजार ९३३ कोटींची, सुरिंदरकुमार मोन याची २२ हजार ७५ कोटींची, अरविंद धामची १४ हजार ७४ कोटींची, संदीप जाजोरियाची १२ हजार ११५ कोटींची, उमंग केजरीवालची १० हजार २७३ कोटींची, एच.एस. भरानाची १० हजार ६५ कोटींची, ऋषी अग्रवालची ६ हजार ९५३ कोटींची तर सदाशिव क्षीरसागर या गरीब माणसाची थकबाकी ५ हजार १६९ कोटी एवढी मोठी आहे. सामान्य माणसाचे डोळे नुसते विस्फारणार नाही तर ते फोडू शकणारी ही कोट्यवधींची आकडेवारी आहे. मल्ल्या, मोदी, चोकसी आणि अगरवाल हे या तुलनेत सामान्य म्हणावे असे अपराधी वा थकबाकीदार आहेत. संजय सिंह यांचे म्हणणे असे की मल्ल्या आणि मोदीसारखे पळतात तसे हेही पळू शकतील की नाही आणि मोदींचे सरकार पुन: त्यांच्या पळून जाण्याची फसवी कारणेच देशाला सांगत राहील की नाही? साधा शेतकरी त्याच्यावरील काही हजारांच्या कर्जापायी आत्महत्या करतो. कारण त्याची मानसिकता प्रामाणिक व नाळ जमिनीशी जुळली असते. मार्क्स म्हणतो तसा कामगारांसारखाच उद्योगपतींनाही देश नसतो. ही माणसे आत्महत्येसारखे भित्रे मार्ग पत्करत नाहीत. सगळी लूट घेऊन ती विदेशाचा रस्ता धरतात. अशा माणसांवर पाळत राखून त्यांच्या हालचाली टिपणे त्याचमुळे आवश्यकही असते.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाbankबँक