शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

गरीब देशाचे ‘श्रीमंत’ थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:19 IST

मार्क्सला जाऊन आता शंभरावर वर्षे झाली. त्याच्या विचारांपासून त्याच्याच अनुयायांनी फारकतही घेतली. मात्र त्याच्या विचारांचा गाभा अद्याप तेवढाच खरा आहे. जगाच्या एकूण संपत्तीपैकी ७० टक्के संपत्ती फक्त ४२ कुटुंबांच्या मालकीची आहे हे जागतिक पाहणीतले एक वास्तव जेवढे बोलके तेवढीच भारताच्या एकूण संपत्तीपैकी ७९ टक्के संपत्ती केवळ एक टक्का लोकांच्या ताब्यात असल्याचे सत्यही अतिशय जळजळीत आहे.

मार्क्सला जाऊन आता शंभरावर वर्षे झाली. त्याच्या विचारांपासून त्याच्याच अनुयायांनी फारकतही घेतली. मात्र त्याच्या विचारांचा गाभा अद्याप तेवढाच खरा आहे. जगाच्या एकूण संपत्तीपैकी ७० टक्के संपत्ती फक्त ४२ कुटुंबांच्या मालकीची आहे हे जागतिक पाहणीतले एक वास्तव जेवढे बोलके तेवढीच भारताच्या एकूण संपत्तीपैकी ७९ टक्के संपत्ती केवळ एक टक्का लोकांच्या ताब्यात असल्याचे सत्यही अतिशय जळजळीत आहे. कारण, हा देश गरिबांचा असला तरी त्यावर मालकी श्रीमंतांची आहे हे उघड करणारे हे वास्तव आहे. सारीच संपत्ती, मार्क्स म्हणतो तशी या धनवंतांनी चोरीच्या वा लुटीच्या मार्गाने मिळविली नसेल. पण त्या वर्गाची स्वार्थी व लबाड वृत्ती मात्र पूर्वीएवढीच आजही कायम राहिली आहे. भारतातील सगळ्या राष्टÑीयीकृत बँका येथील बड्या उद्योगपतींनी लुबाडल्या आहेत आणि त्यातले अनेकजण ती लूट घेऊन देशाबाहेर पळूनही गेले आहेत. विजय मल्ल्या, ललित आणि नीरव हे दोन मोदी, कैलास अग्रवाल, नीलेश पारस, किरण मेहता, बलराम गर्ग अशी या बड्या व पळालेल्या चोरांची नावे आहेत. आज ते देशाबाहेर आहेत आणि या पार्श्वभूमीवर ज्या आणखीही काही बड्या धनवंतांकडे बँकांच्या कर्जाची प्रचंड रक्कम थकलेली आहे त्यांची यादी खा. संजय सिंह या राज्यसभा सदस्याने नुकतीच जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या कोळसा, पोलाद व कृषी या महत्त्वाच्या समित्यांचे सिंह हे सदस्य आहेत आणि त्यांनी ‘आता हे लोक तरी पळून जाणार नाहीत याची खबरदारी घ्या’ असे सीबीआयला सुचविले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या या यादीत सर्वात वरचे नाव अनिल अंबानीचे असून त्याच्याकडील बँकांची थकबाकी १ लक्ष २५ हजार कोटी एवढी प्रचंड आहे. (तरी त्याच्यावरील २६ हजार कोटींचा एक कर्जभार त्यांचे थोरले बंधू मुकेश अंबानी यांनी नुकताच उचलला आहे.) अनिल अग्रवाल याची थकबाकी १ लक्ष ३ हजार कोटींची, रूईया बंधूंची १ लक्ष १ हजार कोटींची, गौतम अदानींची ९६ हजार ३१ कोटींची, मनोज गौरची ७५ हजार १६३ कोटींची, सज्जन जिंदालची ५८ हजार १७१ कोटींची, सी.एन. रावची ४७ हजार ९७६ कोटींची, एल. मधुसूदन रावची ४७ हजार १७२ कोटींची, वेणुगोपाल धूतची ४५ हजार ४०५ कोटींची, ब्रिजभूषण जिंदालची ३७ हजार २४८ कोटींची, पीव्हीके रेड्डीची ३३ हजार ९३३ कोटींची, सुरिंदरकुमार मोन याची २२ हजार ७५ कोटींची, अरविंद धामची १४ हजार ७४ कोटींची, संदीप जाजोरियाची १२ हजार ११५ कोटींची, उमंग केजरीवालची १० हजार २७३ कोटींची, एच.एस. भरानाची १० हजार ६५ कोटींची, ऋषी अग्रवालची ६ हजार ९५३ कोटींची तर सदाशिव क्षीरसागर या गरीब माणसाची थकबाकी ५ हजार १६९ कोटी एवढी मोठी आहे. सामान्य माणसाचे डोळे नुसते विस्फारणार नाही तर ते फोडू शकणारी ही कोट्यवधींची आकडेवारी आहे. मल्ल्या, मोदी, चोकसी आणि अगरवाल हे या तुलनेत सामान्य म्हणावे असे अपराधी वा थकबाकीदार आहेत. संजय सिंह यांचे म्हणणे असे की मल्ल्या आणि मोदीसारखे पळतात तसे हेही पळू शकतील की नाही आणि मोदींचे सरकार पुन: त्यांच्या पळून जाण्याची फसवी कारणेच देशाला सांगत राहील की नाही? साधा शेतकरी त्याच्यावरील काही हजारांच्या कर्जापायी आत्महत्या करतो. कारण त्याची मानसिकता प्रामाणिक व नाळ जमिनीशी जुळली असते. मार्क्स म्हणतो तसा कामगारांसारखाच उद्योगपतींनाही देश नसतो. ही माणसे आत्महत्येसारखे भित्रे मार्ग पत्करत नाहीत. सगळी लूट घेऊन ती विदेशाचा रस्ता धरतात. अशा माणसांवर पाळत राखून त्यांच्या हालचाली टिपणे त्याचमुळे आवश्यकही असते.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाbankबँक