शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

बाबासाहेब, बुद्ध धम्माचा मूल्यविचार आणि राज्यघटनेचे रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2024 07:59 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ धर्म बदलला नाही, तर नवा मूल्यविचार दिला. तो अधिक बळकट करण्याची जबाबदारी सर्वच संविधानप्रेमी लोकांची आहे.

बी. व्ही. जोंधळे, ज्येष्ठ विचारवंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मुक्कामी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मांतराची घोषणा केली आणि  १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. याचा अर्थ २१ वर्षे  विविध धर्मांचा अभ्यास करून बाबासाहेब बौद्ध धम्म स्वीकारण्याच्या निर्णयावर आले असे मानण्यात येते. 

तसे पाहता, बाबासाहेब जेव्हा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांचा रावबहादूर सी. के. बोले यांच्या उपस्थितीत  सत्कार करण्यात आला होता. त्या सत्कार समारंभात गुरुवर्य अर्जुनराव केळुसकरांनी लिहिलेले बुद्ध चरित्र त्यांना भेट देण्यात आले होते. ते बुद्ध चरित्र वाचून विद्यार्थीदशेतच बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारायचा निर्णय घेतला होता. मग, १९३५ साली धर्मांतराची घोषणा करून १९५६ साली धर्मांतर करण्यासाठी त्यांनी २१ वर्षे का घेतली? तर त्यांना फक्त एकट्याला धर्मांतर करायचे नव्हते तर आपल्या समाज बांधवांचीही धर्मांतरासाठी मानसिक जडणघडण  करावयाची होती. ती जेव्हा झाली तेव्हा त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली धम्मदीक्षा घेतली.

बाबासाहेबांच्या मनावर बुद्ध धम्माचा प्रभाव फार पूर्वीच पडला होता. म्हणूनच १९४५ साली स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील महाविद्यालयाचे नाव त्यांनी ‘सिद्धार्थ महाविद्यालय’ असे ठेवले. धम्म विचारांची पाठराखण करण्यासाठी त्यांनी संस्थेचे ब्रीदवाक्य ठरवले- ‘प्रज्ञा - शील - करुणा’. छत्रपती संभाजीनगरच्या महाविद्यालयाचे नाव त्यांनी ‘मिलिंद महाविद्यालय’ ठेवले तर परिसराला ‘नागसेनवन’ असे नाव दिले. शिवाय पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी बोधचिन्ह स्वीकारले ते सम्राट अशोकाने अनुप्रवर्तीत केलेल्या ‘धम्मचक्रा’चे.

बाबासाहेबांनी विकत घेतलेल्या ‘मेनकावा’ या इमारतीचे नाव त्यांनी ‘बुद्ध भवन’ तर ‘अल्बर्ट बिल्डिंग’चे’ नामांतर  ‘आनंद भवन’ केले. त्यांनी स्वतःच्या मुद्रणालयास ‘बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस’ हे नाव दिले होते. १९५४ साली बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा म्हणजेच ‘दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ची नोंदणी केली होती.  या साऱ्या घटना म्हणजे आपण बौद्ध धम्म स्वीकारणार आहोत याचे बाबासाहेबांनी दिलेले संकेतच होते.

१५ ऑगस्ट १९४७ ला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे नाव ‘हिंदुस्थान’ ठेवावे, अशी एक मागणी पुढे आली होती. तसे झाले असते तर देशातील अन्य धर्मियांना दुय्यम स्थानी राहावे लागले असते. देशात अलगतावाद प्रबळ झाला असता.  घटनेच्या कलम क्रमांक १ अन्वये देशास ‘भारत’ हे नाव दिले गेले. भारताच्या राष्ट्रध्वजावरील ‘अशोकचक्र’, कमळ हे ‘राष्ट्रीय फुल’, राजमुद्रेसाठी ‘अशोकाचे चार सिंह’, लोकसभेच्या सभागृहाला दिलेले ‘अशोका हॉल’ हे नाव, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या बैठकीच्या स्थानामागे कोरलेल्या ‘धम्मपदातील गाथा’ ही सारी प्रतीके  बुद्ध धम्मातून घेतली गेली आहेत.

बुद्ध धम्माच्या मानवतावादी तत्त्वज्ञानावर आधारित संविधानाच्या अस्तित्वासमोर आज धोके निर्माण झालेले दिसतात. हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या आड संविधान येते म्हणून संविधान बदलण्याचे कधी उघड तर कधी छुपे प्रयत्न सुरूच असतात. धर्मनिरपेक्ष भारताला देववादी नि दैववादी बनवायचे खेळ करावयाचे असे प्रकार घडत आहेत. धर्मांधता, असहिष्णुता वाढीस लागली आहे. भारतीय राज्यघटनेने जी मूल्ये स्वीकारली आहेत आणि सामाजिक पुनर्रचनेसाठी लोकशाही मूल्यांचा, धर्मनिरपेक्षतेचा जो विचार मांडला आहे, त्या प्रकारचा भारतीय समाज बाबासाहेबांना अपेक्षित  होता. बाबासाहेबांनी केवळ धर्म बदलला नाही तर नवा मूल्यविचार दिला. तो अधिक सक्षम, बळकट करण्याची जबाबदारी सर्वच संविधानप्रेमी लोकांची आहे.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर