शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब, बुद्ध धम्माचा मूल्यविचार आणि राज्यघटनेचे रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2024 07:59 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ धर्म बदलला नाही, तर नवा मूल्यविचार दिला. तो अधिक बळकट करण्याची जबाबदारी सर्वच संविधानप्रेमी लोकांची आहे.

बी. व्ही. जोंधळे, ज्येष्ठ विचारवंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मुक्कामी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मांतराची घोषणा केली आणि  १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. याचा अर्थ २१ वर्षे  विविध धर्मांचा अभ्यास करून बाबासाहेब बौद्ध धम्म स्वीकारण्याच्या निर्णयावर आले असे मानण्यात येते. 

तसे पाहता, बाबासाहेब जेव्हा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांचा रावबहादूर सी. के. बोले यांच्या उपस्थितीत  सत्कार करण्यात आला होता. त्या सत्कार समारंभात गुरुवर्य अर्जुनराव केळुसकरांनी लिहिलेले बुद्ध चरित्र त्यांना भेट देण्यात आले होते. ते बुद्ध चरित्र वाचून विद्यार्थीदशेतच बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारायचा निर्णय घेतला होता. मग, १९३५ साली धर्मांतराची घोषणा करून १९५६ साली धर्मांतर करण्यासाठी त्यांनी २१ वर्षे का घेतली? तर त्यांना फक्त एकट्याला धर्मांतर करायचे नव्हते तर आपल्या समाज बांधवांचीही धर्मांतरासाठी मानसिक जडणघडण  करावयाची होती. ती जेव्हा झाली तेव्हा त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली धम्मदीक्षा घेतली.

बाबासाहेबांच्या मनावर बुद्ध धम्माचा प्रभाव फार पूर्वीच पडला होता. म्हणूनच १९४५ साली स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील महाविद्यालयाचे नाव त्यांनी ‘सिद्धार्थ महाविद्यालय’ असे ठेवले. धम्म विचारांची पाठराखण करण्यासाठी त्यांनी संस्थेचे ब्रीदवाक्य ठरवले- ‘प्रज्ञा - शील - करुणा’. छत्रपती संभाजीनगरच्या महाविद्यालयाचे नाव त्यांनी ‘मिलिंद महाविद्यालय’ ठेवले तर परिसराला ‘नागसेनवन’ असे नाव दिले. शिवाय पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी बोधचिन्ह स्वीकारले ते सम्राट अशोकाने अनुप्रवर्तीत केलेल्या ‘धम्मचक्रा’चे.

बाबासाहेबांनी विकत घेतलेल्या ‘मेनकावा’ या इमारतीचे नाव त्यांनी ‘बुद्ध भवन’ तर ‘अल्बर्ट बिल्डिंग’चे’ नामांतर  ‘आनंद भवन’ केले. त्यांनी स्वतःच्या मुद्रणालयास ‘बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस’ हे नाव दिले होते. १९५४ साली बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा म्हणजेच ‘दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ची नोंदणी केली होती.  या साऱ्या घटना म्हणजे आपण बौद्ध धम्म स्वीकारणार आहोत याचे बाबासाहेबांनी दिलेले संकेतच होते.

१५ ऑगस्ट १९४७ ला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे नाव ‘हिंदुस्थान’ ठेवावे, अशी एक मागणी पुढे आली होती. तसे झाले असते तर देशातील अन्य धर्मियांना दुय्यम स्थानी राहावे लागले असते. देशात अलगतावाद प्रबळ झाला असता.  घटनेच्या कलम क्रमांक १ अन्वये देशास ‘भारत’ हे नाव दिले गेले. भारताच्या राष्ट्रध्वजावरील ‘अशोकचक्र’, कमळ हे ‘राष्ट्रीय फुल’, राजमुद्रेसाठी ‘अशोकाचे चार सिंह’, लोकसभेच्या सभागृहाला दिलेले ‘अशोका हॉल’ हे नाव, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या बैठकीच्या स्थानामागे कोरलेल्या ‘धम्मपदातील गाथा’ ही सारी प्रतीके  बुद्ध धम्मातून घेतली गेली आहेत.

बुद्ध धम्माच्या मानवतावादी तत्त्वज्ञानावर आधारित संविधानाच्या अस्तित्वासमोर आज धोके निर्माण झालेले दिसतात. हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या आड संविधान येते म्हणून संविधान बदलण्याचे कधी उघड तर कधी छुपे प्रयत्न सुरूच असतात. धर्मनिरपेक्ष भारताला देववादी नि दैववादी बनवायचे खेळ करावयाचे असे प्रकार घडत आहेत. धर्मांधता, असहिष्णुता वाढीस लागली आहे. भारतीय राज्यघटनेने जी मूल्ये स्वीकारली आहेत आणि सामाजिक पुनर्रचनेसाठी लोकशाही मूल्यांचा, धर्मनिरपेक्षतेचा जो विचार मांडला आहे, त्या प्रकारचा भारतीय समाज बाबासाहेबांना अपेक्षित  होता. बाबासाहेबांनी केवळ धर्म बदलला नाही तर नवा मूल्यविचार दिला. तो अधिक सक्षम, बळकट करण्याची जबाबदारी सर्वच संविधानप्रेमी लोकांची आहे.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर