शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दोन बॅरिस्टर मुख्यमंत्र्यांना ‘भिडणारा’ विरोधी पक्षनेता!

By सुधीर लंके | Published: October 28, 2023 8:02 AM

माजी केंद्रीय मंत्री व ‘पुलोद’ सरकारच्या काळात जनता पक्षाचे नेतृत्व करणारे पुरोगामी नेते बबनराव ढाकणे यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणी सांगणारा लेख..

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

दोन बॅरिस्टर मुख्यमंत्री व त्यांना भिडणारे आठवी पास विरोधी पक्षनेते, हा संघर्ष राज्यातील नवीन पिढीने पाहिलेला नाही; पण राज्याच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीचे हे ठळक उदाहरण आहे. चळवळीतून साकारलेले नेतृत्व किती कसदार असते हे यातून दिसते. हा इतिहास बबनराव ढाकणे यांच्या निधनामुळे आज राज्याला पुन्हा एकदा आठवला असेल.

अहमदनगर जिल्ह्यातील ढाकणे हे १९८१-८२ मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. या काळात अ. र. अंतुले व बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होऊन गेले. दोघेही बॅरिस्टर. त्यांच्याशी ढाकणे संसदीय आयुधे वापरून वैचारिक संघर्ष करत. ढाकणे यांचा पिंडच लढाऊ दिसतो. पाथर्डी येथे शिक्षण घेताना वसतिगृह अधीक्षक रागावले म्हणून वयाच्या चौदाव्या वर्षी ते एसटीने मुंबईला गेले. तेथून विनातिकीट दिल्लीला जात थेट पंडित नेहरूंना भेटले. ही दंतकथा वाटावी; पण हाच मुलगा मोठेपणी खासदार, मंत्री म्हणून दिल्लीत पोहोचला.

तालुक्यातील प्रश्न सुटत नाहीत म्हणून १९६८ साली विधानसभेच्या गॅलरीतून त्यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांवर पत्रके भिरकावली होती. हा विधानसभेचा मानभंग होता. त्यांनी सभागृहाची माफी मागावी, असा प्रस्ताव आला. मात्र, माफी न मागितल्याने त्यांची रवानगी आठ दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये झाली. लगोलग नाईकांनी पाथर्डीच्या समस्याही जाणून घेतल्या. १९७२ च्या दुष्काळात ढाकणे पंचायत समितीचे सभापती होते. लोकांच्या हाताला काम नव्हते. 

पुन्हा मुंबई गाठत नाईकांसमोर वस्तुस्थिती मांडली. त्यातून पाझर तलाव, नालाबंडिंग, रस्ते ही कामे सुरू होऊन सत्तर हजार लोकांना रोजगार मिळाला. इंजिनिअरची कमी होती म्हणून दहावी पास मुलांना तलाव व बंडिंगची आखणी कशी करायची हे शिकविले गेले. दुष्काळाशी लढाई करणारा हा पॅटर्न पाहण्यासाठी इंदिरा गांधी त्यावेळी पाथर्डीत आल्या होत्या. नाईकांवर विधानसभेत पत्रके भिरकावली; पण त्यांनीच प्रश्न सोडविले म्हणून त्यांचा पाथर्डीत पुतळा उभारण्याचा निर्णय ढाकणेंनी घेतला. विशेष म्हणजे, नाईकांनीच पुतळ्याचे अनावरण करावे, असा प्रस्ताव ठेवला. स्वत:च पुतळ्याचे अनावरण करणे ही नाईकांची परीक्षाच होती. म्हणून मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण अनावरणाला आले. 

ज्या विधानसभेने ढाकणेंना शिक्षा दिली त्याच सभागृहात ‘पुलोद’ सरकारच्या काळात १९७८ ला ते आमदार म्हणून पोहोचले. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. पुढे विरोधी पक्षनेता झाले. जनता पक्षाच्या स्थापनेपासून ढाकणे त्या पक्षात होते. प्रदेशाध्यक्षही झाले. वीस वर्षांचा कालखंड त्यांनी विधिमंडळात काढला. जनता पक्ष विभागल्यानंतर बीड लोकसभेची जागा जनता दलाकडे गेली. त्यावेळी १९८९ साली ते बीडमधून केशरकाकू क्षीरसागर यांच्याविरुद्ध लढले व जिंकले. चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात ते कोळसा व ऊर्जा राज्यमंत्री झाले. 

मंडल आयोगाच्या मागणीसाठी त्यांनी १९८३ साली विधानसभेत राजदंड पळविला होता. १९७७ साली बेरोजगार तरुणांचा मोर्चा काढला. पुढे मंत्री झाल्यावर त्यांच्यासाठी शंभर रुपये बेकारभत्ता मंजूर करण्याचा आग्रह धरला. शेती, सिंचन, ऊसतोड कामगार, सहकार, शिक्षण, ऊर्जा असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. अपक्ष, काँग्रेस, जनता पक्ष, पुन्हा काँग्रेस व शेतकरी विचारदल असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. १९९४ साली ते दुग्धविकासमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी गुजरातच्या आनंद डेअरीच्या धर्तीवर महिलांचे सहकारी दूध संघ सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

‘लोकमत’च्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘आमची पिढी फारशी शिकली नव्हती; पण आम्ही सतत लोकांमध्ये राहून शिकलो. समाजाचाही आमच्यावर धाक होता. आता असा धाक कमी होतोय. सत्ताधारी लोकशाहीची दमकोंडी करताहेत तर विरोधक त्यांच्याशी जुळवून घेताहेत’...

 

टॅग्स :Babanrao Dhakaneबबनराव ढाकणे