शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

बा देवेंद्रा... वैष्णवांची काळजी वाहा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 00:09 IST

आपल्या इंद्रलोकांच्या स्टार रिपोर्टर यमकेने यावर्षीची वारी स्वत: करायचा निर्धार केला.

- राजा मानेआपल्या इंद्रलोकांच्या स्टार रिपोर्टर यमकेने यावर्षीची वारी स्वत: करायचा निर्धार केला. त्यामुळे आळंदीहूनच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर निघायचे ठरविले आणि तयारीला लागलाच होता, एवढ्यात महागुरू नारदांचा फोन आलाच ! ‘नारायणऽऽ नारायणऽऽ’ यमकेने नाराजीनेच फोन घेतला आणि संवाद सुरू झाला.यमके- प्रणाम गुरुवर्य ! काय आज्ञा?नारद- तू नागपूरला जाण्याऐवजी आळंदीत काय करतोय? तिकडे हवा तापलेली असताना असे इकडेच भटकणे बरे नव्हे.यमके- क्षमा करा गुरुवर्य! पण तिकडे नेहमीचेच चाललेले असते. मला यावेळी पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी व्हायचे आहे. वैष्णवांच्या संगतीने विठोबाचे दर्शन घ्यायचे आहे...नारद- मुंबापुरीत पावसाने उडविलेली दाणादाण तसेच खड्डे आणि पावसात अडकलेल्या लोकल्स्नी मुंबईकरांची केलेली तारांबळ याविषयी तू एक शब्दही कळविला नाहीस. यावरूनच तुझे काही वेगळेच चालले असल्याचा संशय मला आलाच होता.यमके- अफवा बहाद्दरांनी जन्मी घातलेल्या संकटांपासून ते ‘लोकमत’ने विधिमंडळातील चांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीवर टाकलेल्या कौतुकाच्या थापेपर्यंतची सगळी माहिती मी इंद्रलोकी पोहोच केली असताना तुम्ही असा संशय घेताच कसा? तुमचा मेलबॉक्स ओव्हरफुल्ल झाल्याने तुम्हाला पाठविलेले सर्व ई-मेल्स बाऊन्स तर झाले नाहीत ना?नारद- मला तुझे सगळे रिपोर्ट्स मिळाले. पण अंतर्ज्ञानाने तू वैष्णवमेळ्यात सहभागी होतो आहेस हे उमजल्याने तुला शुभेच्छा देण्यासाठीच फोन केला...यमके- अंतर्ज्ञानाने मी वैष्णव मेळ्याला निघालो हे जसे तुम्हाला उमजले तसे पंढरीत सुनील उंबरे नामक व इतर नारदपंथीयांनी चंद्रभागेच्या मलिनतेबद्दल उठविलेला आवाजही तुम्हाला उमजलाच असेल.नारद- हो, चंद्रभागा नदीवरील घाणीच्या साम्राज्याबद्दल गेली २५ वर्षे आम्ही ऐकत आलो आहोत. चंद्रभागेवर पंढरीनगरीतील सांडपाण्याने सदैव आक्रमण केले आहेच, मांस विक्रीच्या व्यापाºयांनीही बिच्चारी चंद्रभागा वेढली गेली आहे. आषाढी वारीच्या वेळी लाखो वैष्णवांना तशाच पाण्यात दुर्दैवी स्नान घालण्याचे काम नियती करते आहे...यमके- हे तुम्ही म्हणता गुरुवर्य ! ‘आप कुछ करते क्यों नही?’ इंद्रदेवांना सांगून एक तर सगळ्यांची बुद्धी पालटा नाहीतर त्यांच्या खुर्च्या तरी काढून घ्या, म्हणजे त्यांंना चंद्रभागा, वारकरी आणि पंढरपूरवासींच्या वेदनांची जाणीव होईल.नारद- इंद्रदेवांकडे तक्रार केली तर गहजब होईल यमके ! त्यापेक्षा जनतेच्या दरबाराची भीती आपण खुर्च्यांवर नटलेल्या महानुभवांना देऊ !यमके- त्याच मार्गाने नीलमताई गोºहे या कन्येने नागपूरच्या विधिमंडळ मेळ्यात नारदपंथी सुनीलच्या दाखल्याने चंद्रभागेतील मैलामिश्रित खड्ड्यांवर आवाज उठविला होता...नारद- असे आवाज काही पहिल्यांदाच उठविले गेलेले नाहीत. पण देवेंद्रभाऊंनी २०४९ सालापर्यंतच्या कोटी-कोटीच्या स्वप्नांची उधळण करून गप्प केले.यमके- म्हणूनच आता, ‘बा देवेंद्रा... २०४९ पर्यंत चंद्रभागेच्या शुद्धीकरणासाठी जे भले-बुरे होईल ते होवो ! पण आषाढीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वैष्णवांची या वारीत चंद्रभागा स्वच्छ ठेवून काळजी वाहा... एवढेच आर्जव !’

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस