शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

बा देवेंद्रा... वैष्णवांची काळजी वाहा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 00:09 IST

आपल्या इंद्रलोकांच्या स्टार रिपोर्टर यमकेने यावर्षीची वारी स्वत: करायचा निर्धार केला.

- राजा मानेआपल्या इंद्रलोकांच्या स्टार रिपोर्टर यमकेने यावर्षीची वारी स्वत: करायचा निर्धार केला. त्यामुळे आळंदीहूनच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर निघायचे ठरविले आणि तयारीला लागलाच होता, एवढ्यात महागुरू नारदांचा फोन आलाच ! ‘नारायणऽऽ नारायणऽऽ’ यमकेने नाराजीनेच फोन घेतला आणि संवाद सुरू झाला.यमके- प्रणाम गुरुवर्य ! काय आज्ञा?नारद- तू नागपूरला जाण्याऐवजी आळंदीत काय करतोय? तिकडे हवा तापलेली असताना असे इकडेच भटकणे बरे नव्हे.यमके- क्षमा करा गुरुवर्य! पण तिकडे नेहमीचेच चाललेले असते. मला यावेळी पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी व्हायचे आहे. वैष्णवांच्या संगतीने विठोबाचे दर्शन घ्यायचे आहे...नारद- मुंबापुरीत पावसाने उडविलेली दाणादाण तसेच खड्डे आणि पावसात अडकलेल्या लोकल्स्नी मुंबईकरांची केलेली तारांबळ याविषयी तू एक शब्दही कळविला नाहीस. यावरूनच तुझे काही वेगळेच चालले असल्याचा संशय मला आलाच होता.यमके- अफवा बहाद्दरांनी जन्मी घातलेल्या संकटांपासून ते ‘लोकमत’ने विधिमंडळातील चांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीवर टाकलेल्या कौतुकाच्या थापेपर्यंतची सगळी माहिती मी इंद्रलोकी पोहोच केली असताना तुम्ही असा संशय घेताच कसा? तुमचा मेलबॉक्स ओव्हरफुल्ल झाल्याने तुम्हाला पाठविलेले सर्व ई-मेल्स बाऊन्स तर झाले नाहीत ना?नारद- मला तुझे सगळे रिपोर्ट्स मिळाले. पण अंतर्ज्ञानाने तू वैष्णवमेळ्यात सहभागी होतो आहेस हे उमजल्याने तुला शुभेच्छा देण्यासाठीच फोन केला...यमके- अंतर्ज्ञानाने मी वैष्णव मेळ्याला निघालो हे जसे तुम्हाला उमजले तसे पंढरीत सुनील उंबरे नामक व इतर नारदपंथीयांनी चंद्रभागेच्या मलिनतेबद्दल उठविलेला आवाजही तुम्हाला उमजलाच असेल.नारद- हो, चंद्रभागा नदीवरील घाणीच्या साम्राज्याबद्दल गेली २५ वर्षे आम्ही ऐकत आलो आहोत. चंद्रभागेवर पंढरीनगरीतील सांडपाण्याने सदैव आक्रमण केले आहेच, मांस विक्रीच्या व्यापाºयांनीही बिच्चारी चंद्रभागा वेढली गेली आहे. आषाढी वारीच्या वेळी लाखो वैष्णवांना तशाच पाण्यात दुर्दैवी स्नान घालण्याचे काम नियती करते आहे...यमके- हे तुम्ही म्हणता गुरुवर्य ! ‘आप कुछ करते क्यों नही?’ इंद्रदेवांना सांगून एक तर सगळ्यांची बुद्धी पालटा नाहीतर त्यांच्या खुर्च्या तरी काढून घ्या, म्हणजे त्यांंना चंद्रभागा, वारकरी आणि पंढरपूरवासींच्या वेदनांची जाणीव होईल.नारद- इंद्रदेवांकडे तक्रार केली तर गहजब होईल यमके ! त्यापेक्षा जनतेच्या दरबाराची भीती आपण खुर्च्यांवर नटलेल्या महानुभवांना देऊ !यमके- त्याच मार्गाने नीलमताई गोºहे या कन्येने नागपूरच्या विधिमंडळ मेळ्यात नारदपंथी सुनीलच्या दाखल्याने चंद्रभागेतील मैलामिश्रित खड्ड्यांवर आवाज उठविला होता...नारद- असे आवाज काही पहिल्यांदाच उठविले गेलेले नाहीत. पण देवेंद्रभाऊंनी २०४९ सालापर्यंतच्या कोटी-कोटीच्या स्वप्नांची उधळण करून गप्प केले.यमके- म्हणूनच आता, ‘बा देवेंद्रा... २०४९ पर्यंत चंद्रभागेच्या शुद्धीकरणासाठी जे भले-बुरे होईल ते होवो ! पण आषाढीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वैष्णवांची या वारीत चंद्रभागा स्वच्छ ठेवून काळजी वाहा... एवढेच आर्जव !’

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस