शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बा देवेंद्रा... वैष्णवांची काळजी वाहा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 00:09 IST

आपल्या इंद्रलोकांच्या स्टार रिपोर्टर यमकेने यावर्षीची वारी स्वत: करायचा निर्धार केला.

- राजा मानेआपल्या इंद्रलोकांच्या स्टार रिपोर्टर यमकेने यावर्षीची वारी स्वत: करायचा निर्धार केला. त्यामुळे आळंदीहूनच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर निघायचे ठरविले आणि तयारीला लागलाच होता, एवढ्यात महागुरू नारदांचा फोन आलाच ! ‘नारायणऽऽ नारायणऽऽ’ यमकेने नाराजीनेच फोन घेतला आणि संवाद सुरू झाला.यमके- प्रणाम गुरुवर्य ! काय आज्ञा?नारद- तू नागपूरला जाण्याऐवजी आळंदीत काय करतोय? तिकडे हवा तापलेली असताना असे इकडेच भटकणे बरे नव्हे.यमके- क्षमा करा गुरुवर्य! पण तिकडे नेहमीचेच चाललेले असते. मला यावेळी पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी व्हायचे आहे. वैष्णवांच्या संगतीने विठोबाचे दर्शन घ्यायचे आहे...नारद- मुंबापुरीत पावसाने उडविलेली दाणादाण तसेच खड्डे आणि पावसात अडकलेल्या लोकल्स्नी मुंबईकरांची केलेली तारांबळ याविषयी तू एक शब्दही कळविला नाहीस. यावरूनच तुझे काही वेगळेच चालले असल्याचा संशय मला आलाच होता.यमके- अफवा बहाद्दरांनी जन्मी घातलेल्या संकटांपासून ते ‘लोकमत’ने विधिमंडळातील चांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीवर टाकलेल्या कौतुकाच्या थापेपर्यंतची सगळी माहिती मी इंद्रलोकी पोहोच केली असताना तुम्ही असा संशय घेताच कसा? तुमचा मेलबॉक्स ओव्हरफुल्ल झाल्याने तुम्हाला पाठविलेले सर्व ई-मेल्स बाऊन्स तर झाले नाहीत ना?नारद- मला तुझे सगळे रिपोर्ट्स मिळाले. पण अंतर्ज्ञानाने तू वैष्णवमेळ्यात सहभागी होतो आहेस हे उमजल्याने तुला शुभेच्छा देण्यासाठीच फोन केला...यमके- अंतर्ज्ञानाने मी वैष्णव मेळ्याला निघालो हे जसे तुम्हाला उमजले तसे पंढरीत सुनील उंबरे नामक व इतर नारदपंथीयांनी चंद्रभागेच्या मलिनतेबद्दल उठविलेला आवाजही तुम्हाला उमजलाच असेल.नारद- हो, चंद्रभागा नदीवरील घाणीच्या साम्राज्याबद्दल गेली २५ वर्षे आम्ही ऐकत आलो आहोत. चंद्रभागेवर पंढरीनगरीतील सांडपाण्याने सदैव आक्रमण केले आहेच, मांस विक्रीच्या व्यापाºयांनीही बिच्चारी चंद्रभागा वेढली गेली आहे. आषाढी वारीच्या वेळी लाखो वैष्णवांना तशाच पाण्यात दुर्दैवी स्नान घालण्याचे काम नियती करते आहे...यमके- हे तुम्ही म्हणता गुरुवर्य ! ‘आप कुछ करते क्यों नही?’ इंद्रदेवांना सांगून एक तर सगळ्यांची बुद्धी पालटा नाहीतर त्यांच्या खुर्च्या तरी काढून घ्या, म्हणजे त्यांंना चंद्रभागा, वारकरी आणि पंढरपूरवासींच्या वेदनांची जाणीव होईल.नारद- इंद्रदेवांकडे तक्रार केली तर गहजब होईल यमके ! त्यापेक्षा जनतेच्या दरबाराची भीती आपण खुर्च्यांवर नटलेल्या महानुभवांना देऊ !यमके- त्याच मार्गाने नीलमताई गोºहे या कन्येने नागपूरच्या विधिमंडळ मेळ्यात नारदपंथी सुनीलच्या दाखल्याने चंद्रभागेतील मैलामिश्रित खड्ड्यांवर आवाज उठविला होता...नारद- असे आवाज काही पहिल्यांदाच उठविले गेलेले नाहीत. पण देवेंद्रभाऊंनी २०४९ सालापर्यंतच्या कोटी-कोटीच्या स्वप्नांची उधळण करून गप्प केले.यमके- म्हणूनच आता, ‘बा देवेंद्रा... २०४९ पर्यंत चंद्रभागेच्या शुद्धीकरणासाठी जे भले-बुरे होईल ते होवो ! पण आषाढीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वैष्णवांची या वारीत चंद्रभागा स्वच्छ ठेवून काळजी वाहा... एवढेच आर्जव !’

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस