शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

अयोध्या : सांस्कृतिक सौहार्दाचा इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 00:51 IST

अयोध्येत आता राम मंदिराच्या निर्माणाची सुरुवात झाली आहे. अयोध्या ऊर्फ साकेत हे स्थान रामपूर्व काळापासून भारताच्या सांस्कृतिक/ राजकीय इतिहासात महत्त्वाचे राहिलेले आहे. येथेच वेदपूर्व समन संस्कृती बहराला आली.

संजय सोनवणी

अयोध्येत आता राम मंदिराच्या निर्माणाची सुरुवात झाली आहे. अयोध्या ऊर्फ साकेत हे स्थान रामपूर्व काळापासून भारताच्या सांस्कृतिक/ राजकीय इतिहासात महत्त्वाचे राहिलेले आहे. येथेच वेदपूर्व समन संस्कृती बहराला आली. नाभी व जैनांचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथांनी येथूनच राज्य चालविले. भारताचे नाव भारतवर्ष होण्यापूर्वी नाभीवर्ष होते. भारताचा सांस्कृतिक इतिहास पाहिला तर रामकथेच्या पूर्वीच हे स्थळ समन संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे बनले होते. जैन धर्माचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथ ?व अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ व अनंतनाथ यांचा जन्म अयोध्येत झाला. इक्ष्वाकु वंशातील श्रीरामाचा काळ पौराणिकदृष्ट्या त्यानंतरचा. ऋषभनाथ व अजितनाथ या वेदपूर्व ऐतिहासिक व्यक्ती होत्या, असे मत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व अनेक विद्वानांनी सिद्धही केले. बौद्ध साहित्यानुसार गौतम बुद्धांनी आठ वर्षे अयोध्येत वास्तव्य केले होते. जैनांचे रामायणही प्रसिद्ध असून, त्यांनी रामासही आपले मानले होते असे दिसते. वैदिक धर्माच्या आगमनानंतर रामाचेही वैदिकीकरण झाल्याचे दिसते. हिंदू, जैन, बौद्ध धर्मांच्या दृष्टीने अयोध्या महत्त्वाची राहिली व सर्वांनीच या ना त्या रूपात रामाचा स्वीकार केला.

राम मंदिराचे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत की नाहीत, यावर वाद आहेत. असे असले तरी हे स्थळ रामजन्मभूमीच अशीही श्रद्धा आहे. मुळात मंदिरे बांधण्याची संस्कृती फार उशिराची. पहिल्या शिवमंदिराचा नाणकीय पुरावा कुनिंद नाण्यावर मिळतो तो इ.स.पू. दीडशेमधील. तत्पूर्वी बौद्ध व जैन विहार, स्तूप, लेण्यांचे अस्तित्व मिळते. हिंदू देवतांची प्रतीके व प्रतिमाही सर्वत्र मिळतात; पण मंदिरे नाहीत. वैदिक धर्मात प्राचीन काळी मूर्तिपूजा निषिद्ध असल्याने इंद्र-वरुणादींची मंदिरे असण्याचा प्रश्नच नव्हता. अयोध्येत वादग्रस्त जागेवरील १९७६ मध्ये केलेल्या उत्खननांत पुरातत्वविद बी. बी. लाल यांना मृण्मयी जैन प्रतिमा मिळाली होती. या प्रतिमेचा इतिहास इ.स.पू. चवथे शतक निघाला. तेथे नाणी, प्रतिमा मिळाल्या, त्यांचा संबंध राम, सीता वा दशरथाशी असल्याचे सूचन मिळत नाही, असा त्यांचा निर्वाळा आहे. असे असले तरी यावरून रामजन्मही अयोध्येला झाला नाही असा निष्कर्ष काढता येत नाही. हिंदू श्रीरामाला भारतातील वैदिकांसह सर्व धर्मसंस्कृतींनी आपलेसे केले. अयोध्येचा इतिहास अपवाद वगळता सांस्कृतिक सौहार्दाचा राहिला आहे.अहिल्यादेवी होळकरांनी अयोध्येत राम मंदिरासह चार मंदिरे बांधली, तेव्हा अयोध्येवर आसिफौद्दुला अमानी याचे राज्य होते. १७३६मध्ये अयोध्येच्या मुस्लिम सुभेदाराचा दिवान केसरी सिंगने अयोध्येत जन्मलेल्या पाच तीर्थंकरांची पाच मंदिरे उभारली. अयोध्या नावाचा अर्थच आहे ‘जेथे युद्ध केले जात नाही अशी भूमी’. नगरी फक्त आमचीच असा कोणी दावा करणे सांस्कृतिक सहजीवनाच्या इतिहासावर अन्याय करणारे आहे. जैनांनी आपली तत्त्वधारा पाळत वादग्रस्त जागेवर दावा केलेला नाही. बौद्धांनीही दाव्यात कडवेपणा येऊ दिला नाही. याचे भान ठेवत सांस्कृतिक सौहार्दाच्या इतिहासाचे नव्याने पुनरुज्जीवन केले पाहिजे.(लेखक इतिहास संशोधक आहेत, पुणे)

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर