शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

अयोध्या : सांस्कृतिक सौहार्दाचा इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 00:51 IST

अयोध्येत आता राम मंदिराच्या निर्माणाची सुरुवात झाली आहे. अयोध्या ऊर्फ साकेत हे स्थान रामपूर्व काळापासून भारताच्या सांस्कृतिक/ राजकीय इतिहासात महत्त्वाचे राहिलेले आहे. येथेच वेदपूर्व समन संस्कृती बहराला आली.

संजय सोनवणी

अयोध्येत आता राम मंदिराच्या निर्माणाची सुरुवात झाली आहे. अयोध्या ऊर्फ साकेत हे स्थान रामपूर्व काळापासून भारताच्या सांस्कृतिक/ राजकीय इतिहासात महत्त्वाचे राहिलेले आहे. येथेच वेदपूर्व समन संस्कृती बहराला आली. नाभी व जैनांचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथांनी येथूनच राज्य चालविले. भारताचे नाव भारतवर्ष होण्यापूर्वी नाभीवर्ष होते. भारताचा सांस्कृतिक इतिहास पाहिला तर रामकथेच्या पूर्वीच हे स्थळ समन संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे बनले होते. जैन धर्माचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथ ?व अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ व अनंतनाथ यांचा जन्म अयोध्येत झाला. इक्ष्वाकु वंशातील श्रीरामाचा काळ पौराणिकदृष्ट्या त्यानंतरचा. ऋषभनाथ व अजितनाथ या वेदपूर्व ऐतिहासिक व्यक्ती होत्या, असे मत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व अनेक विद्वानांनी सिद्धही केले. बौद्ध साहित्यानुसार गौतम बुद्धांनी आठ वर्षे अयोध्येत वास्तव्य केले होते. जैनांचे रामायणही प्रसिद्ध असून, त्यांनी रामासही आपले मानले होते असे दिसते. वैदिक धर्माच्या आगमनानंतर रामाचेही वैदिकीकरण झाल्याचे दिसते. हिंदू, जैन, बौद्ध धर्मांच्या दृष्टीने अयोध्या महत्त्वाची राहिली व सर्वांनीच या ना त्या रूपात रामाचा स्वीकार केला.

राम मंदिराचे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत की नाहीत, यावर वाद आहेत. असे असले तरी हे स्थळ रामजन्मभूमीच अशीही श्रद्धा आहे. मुळात मंदिरे बांधण्याची संस्कृती फार उशिराची. पहिल्या शिवमंदिराचा नाणकीय पुरावा कुनिंद नाण्यावर मिळतो तो इ.स.पू. दीडशेमधील. तत्पूर्वी बौद्ध व जैन विहार, स्तूप, लेण्यांचे अस्तित्व मिळते. हिंदू देवतांची प्रतीके व प्रतिमाही सर्वत्र मिळतात; पण मंदिरे नाहीत. वैदिक धर्मात प्राचीन काळी मूर्तिपूजा निषिद्ध असल्याने इंद्र-वरुणादींची मंदिरे असण्याचा प्रश्नच नव्हता. अयोध्येत वादग्रस्त जागेवरील १९७६ मध्ये केलेल्या उत्खननांत पुरातत्वविद बी. बी. लाल यांना मृण्मयी जैन प्रतिमा मिळाली होती. या प्रतिमेचा इतिहास इ.स.पू. चवथे शतक निघाला. तेथे नाणी, प्रतिमा मिळाल्या, त्यांचा संबंध राम, सीता वा दशरथाशी असल्याचे सूचन मिळत नाही, असा त्यांचा निर्वाळा आहे. असे असले तरी यावरून रामजन्मही अयोध्येला झाला नाही असा निष्कर्ष काढता येत नाही. हिंदू श्रीरामाला भारतातील वैदिकांसह सर्व धर्मसंस्कृतींनी आपलेसे केले. अयोध्येचा इतिहास अपवाद वगळता सांस्कृतिक सौहार्दाचा राहिला आहे.अहिल्यादेवी होळकरांनी अयोध्येत राम मंदिरासह चार मंदिरे बांधली, तेव्हा अयोध्येवर आसिफौद्दुला अमानी याचे राज्य होते. १७३६मध्ये अयोध्येच्या मुस्लिम सुभेदाराचा दिवान केसरी सिंगने अयोध्येत जन्मलेल्या पाच तीर्थंकरांची पाच मंदिरे उभारली. अयोध्या नावाचा अर्थच आहे ‘जेथे युद्ध केले जात नाही अशी भूमी’. नगरी फक्त आमचीच असा कोणी दावा करणे सांस्कृतिक सहजीवनाच्या इतिहासावर अन्याय करणारे आहे. जैनांनी आपली तत्त्वधारा पाळत वादग्रस्त जागेवर दावा केलेला नाही. बौद्धांनीही दाव्यात कडवेपणा येऊ दिला नाही. याचे भान ठेवत सांस्कृतिक सौहार्दाच्या इतिहासाचे नव्याने पुनरुज्जीवन केले पाहिजे.(लेखक इतिहास संशोधक आहेत, पुणे)

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर