शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयांचा गैरवापर टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 05:57 IST

विरोधकांचे काम सरकारवर टीका करण्याचे आहे. ते करताना केलेल्या टीकेवर सर्वत्र खटले दाखल करून संबंधिताला त्रास देण्याचा हेतू असेल, तर न्यायालयाने हा बदनामीचा प्रकार नसल्याचे ठणकावून सांगितले पाहिजे.

सरकारने एखाद्या विरोधी नेत्याला त्रास द्यायचे वा सतत भटकत ठेवायचे मनात आणल्यास त्यासाठी तो न्यायालयाचा वापर करू शकतो. सरकार सत्ताधारी व पैसाधारी असल्याने त्याला स्वत:च्या खिशाला खार न लावता एखाद्या नेत्याविरुद्ध देशाच्या निरनिराळ्या भागात कोणत्या ना कोणत्या कारणाखातर खटले भरता येतात. त्यात हजर राहण्यासाठी वा त्यातून येणारे वॉरंट टाळण्यासाठी मग त्याने त्याला कधी गोवा, कधी बिहार तर कधी मणिपूरपर्यंत भटकावे लागते. प्रकरण तेवढ्यावर थांबत नाही. अतिशय कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या न्यायासनासमोर त्या नेत्याला आरोपी म्हणून उभे राहावे लागत असते. शिवाय एखादा राष्ट्रीय नेता आपल्यासमोर आरोपी म्हणून आलेला पाहण्याने काही न्यायाधीशही मनातून सुखावत असतात.

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले खा. राहुल गांधी गोवा, मुंबईच्या कोर्टात ‘संघाची बदनामी केल्याच्या खटल्यासाठी’ व नंतर पाटण्याच्या कोर्टात सुशील मोदी या भाजपच्या नेत्याची बदनामी केल्याच्या आरोपाखातर हजर होते. यापुढेही त्यांना असे भटकत व दूर ठेवण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी होऊ शकतो. विरोधी पक्षाचे काम सरकारवर टीका करण्याचे व त्याचे दोष दाखवून देण्याचे आहे. नव्हे, ते त्याचे कर्तव्यच आहे. ते कर्तव्य पार पाडताना त्याने केलेली टीका ही आपली मानहानी आहे, असे मानून सरकारातील मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करता येणे आता सोपे झाले आहे. काही चिल्लर माणसे तर त्यामुळे आपली साºया देशात बदनामी झाली म्हणून असे खटले देशभरच्या कोर्टात सर्वत्र लावू शकतात. देशातील काही नेत्यांविरुद्ध सिरोंचा व अहेरी या गडचिरोली जिल्ह्यातील लहान कोर्टासमोर असे खटले भरले गेले. तेथे चकरा मारण्याचे काम त्या नेत्यांना करावे लागले. यात मानहानीच्या शिक्षेहूनही संबंधिताला त्रास देण्याचा हेतूच अधिक मोठा असतो. न्यायालयेही ‘या खटल्याचे आमच्या कोर्टात काय प्रयोजन’ असा प्रश्न विचारीत नाही. कारण न्यायदानाचे ओझे त्यांच्या खांद्यावर असते.

राहुल किंवा सोनिया गांधी अथवा त्यांच्यासारखे वरिष्ठ राष्ट्रीय नेते जे बोलतात त्याचे पडसाद मुंबईपासून इम्फाळपर्यंत आणि श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत उमटतात. त्यामुळे त्यांच्यावर देशात कुठेही व कितीही जागी असे खटले दाखल करता येतात. सरकारला सूड उगवायचा असतो आणि न्यायासनही त्याबाबत तारतम्य विचारात घेत नाहीत. संघाची बदनामी केल्याने राहुल गांधींविरुद्ध गोव्यातच खटला का, तो नागपुरात वा दिल्लीत का नाही, हा प्रश्न न्यायालय विचारत नाही. परिणामी न्यायालयाचा वापर न्यायाची पायमल्ली करून सरकारला करता येतो. या प्रकाराला न्यायासाठी तरी आता आळा घालणे आवश्यक आहे. एकाच तºहेचे खटले वेगवेगळ्या न्यायालयांत व वेगवेगळ्या वेळी का दाखल होतात? ते एकत्र आणून त्यांची सुनावणी करण्याची व्यवस्था आहे की नाही? आणि ती असेल तर अशा वेळी तिचा उपयोग का केला जात नाही? सुशील मोदींची बदनामी झाली म्हणून पाटण्यात, संघाची बदनामी झाली म्हणून गोव्यात तर आणखी कुणावर टीका केली म्हणून एखाद्या तालुक्याच्या जागी खटले दाखल होत असतील तर त्यात न्याय नसून अन्याय असतो आणि सरकार व पैसाधारी लोक तो करू शकतात. याला आळा घातला पाहिजे.

टीकाकारांच्या टीकेचा अधिकार हा बदनामीचा प्रकार होत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयानेच ठणकावून सांगितले पाहिजे. राजकारणात असलेल्या व्यक्तींवर टीका होणारच. त्यांच्या चुकांवर लोक, माध्यमे व विरोधी पक्ष बोलणारच. तो त्यांचा हक्कही आहेच. पण त्यांचा बंदोबस्त करायचा तर तोही योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे. त्यासाठी देशातली न्यायालये वापरून घेण्याचे कारण नाही. या प्रकारातील अन्याय साºयांना दिसतो, मात्र न्यायालयासंबंधी बोलणे टाळण्याकडेच साºयांची प्रवृत्ती असते. न जाणो अशी गोष्ट आपल्या अंगावर उलटू शकेल अशा भीतीनेही अनेकांना ग्रासले असते. तरीही अशा प्र्रकाराविषयी आता स्पष्टपणे बोलणे व लिहिणे आवश्यक झाले आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयRahul Gandhiराहुल गांधी