शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

शुभ काळ, अवघ्या दिशा

By admin | Updated: March 3, 2017 23:57 IST

सकाळी सहा-साडेसहाची प्रसन्न वेळ होती. अवघा तो शकुन .... तुका म्हणे हरिच्या दासा।

सकाळी सहा-साडेसहाची प्रसन्न वेळ होती. अवघा तो शकुन .... तुका म्हणे हरिच्या दासा। शुभ काळ अवघ्या दिशा।। (तु.गा. २१७६) संत तुकारामांच्या कालातीत काव्याने आणि किशोरी आमोणकरांच्या सुरांनी मन चकित झाले तर नवल कसले? आजच्या विज्ञानयुगातसुद्धा आपण शुभ-अशुभ दिवस, लाभी दिशा, मुहूर्त यांचा हळूच शोध घेत असतो. समाजाला या गैरसमजुतींच्या जंजाळातून बाहेर काढण्यासाठी सतराव्या शतकात लिहिलेल्या या ओळी आहेत. तुकाराम बीजेची पहाट या शब्दांनी अधिक उजळ झाली.जप-तप, भगवी वस्त्रे, कर्मकांड ही भक्तीची वरवरची साधने आपण महत्त्वाची मानतो. यापेक्षा ‘क्षुधेलिया अन्न’ म्हणजे भुकेनी कळवळणाऱ्याची जात, राहणी न पाहता आधी त्याला अन्न द्यायला हवे. जर ‘ईश्वराचा अंश प्रत्येक जिवात आहे’ असे शास्त्रे-पुराणे सांगतात तर हा प्रत्येक जीव समाजाच्या किंवा विश्वाच्या एकाच देहाचा भाग-अंश-अवयव आहे. मग त्यातील एकाला दु:ख, पीडा, वेदना असेल तर ते साऱ्यांचेच दु:ख नाही का? सामाजिक समतेचा हा विचार त्याकाळी संत तुकारामांनी सांगितला. पण प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या आजच्या मानवजातीलाही सामाजिक समता पेलत नाही हे कटुसत्य आहे. संस्कार संपन्न, सदाचारी माणूस घडवण्याचे कार्य निरपेक्षपणे संत करीत होते. सावळ्या, सुंदर विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जाणारे संत अद्वैत तत्त्वज्ञान जाणत होते. ‘कासयाने पूजा करू केशीराजा’ (तु.गा. ३७६८) हा त्यांचा बोलका अभंग पहा. संत तुकाराम यात म्हणतात- तीर्थक्षेत्री स्नान केले; पण मनप्रक्षालन झालेच नाही. केशीराजा ! तुझी पूजा मी कोणत्या साधनांनी करावी? पाण्याने तुला स्नान घालावे तर जीवनाचा निर्माता तूच आहेस. या फुलांच्या सौंदर्याचा आणि सुगंधाचा कल्पक निर्माताही तूच. नागवेलीची सुबक नक्षीदार पाने, क्षत नसणारे धान्य, गळलेल्या मोहरातून वाचलेली फळे, साऱ्यांचे सृजन तर तूच करतोस. राजमुद्रा असणाऱ्या शिक्क्यांची धातू, शेतातील सोनसळी धान्यराशी यांचेही निर्माण त्या जगनियंत्याचेच. संत तुकाराम महाराज म्हणतात, हाती चिपळ्या, गळ्यात वीणा घेऊन नामघोष करत ज्या भूमीवर आम्ही फेर धरतो ती धरती धारण करणाराही तोच. तेव्हा टाळ्या वाजवणारे दोन हस्तक आणि झुकलेले मस्तक याआधारे मी तुझी मानसपूजा करतो. आपल्या पोटच्या मुलांवर जसे आणि जेवढे प्रेम आपण करतो तेवढेच आपल्याकडे सेवारत असणाऱ्यांवर करावे हा माणुसकीचा अमोल संदेश नित्य व्यवहारात आणण्यासारखाच आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात ‘ज्ञानदेवे रचिला पाया....’तुका झालासे कळस’ हा बहिणाबार्इंनी केलेला गौरवपूर्ण उल्लेख संत तुकारामांच्या अमोल कार्याची ग्वाही देणारा आहे. -डॉ. सौ. प्रज्ञा आपटे