शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

शुभ काळ, अवघ्या दिशा

By admin | Updated: March 3, 2017 23:57 IST

सकाळी सहा-साडेसहाची प्रसन्न वेळ होती. अवघा तो शकुन .... तुका म्हणे हरिच्या दासा।

सकाळी सहा-साडेसहाची प्रसन्न वेळ होती. अवघा तो शकुन .... तुका म्हणे हरिच्या दासा। शुभ काळ अवघ्या दिशा।। (तु.गा. २१७६) संत तुकारामांच्या कालातीत काव्याने आणि किशोरी आमोणकरांच्या सुरांनी मन चकित झाले तर नवल कसले? आजच्या विज्ञानयुगातसुद्धा आपण शुभ-अशुभ दिवस, लाभी दिशा, मुहूर्त यांचा हळूच शोध घेत असतो. समाजाला या गैरसमजुतींच्या जंजाळातून बाहेर काढण्यासाठी सतराव्या शतकात लिहिलेल्या या ओळी आहेत. तुकाराम बीजेची पहाट या शब्दांनी अधिक उजळ झाली.जप-तप, भगवी वस्त्रे, कर्मकांड ही भक्तीची वरवरची साधने आपण महत्त्वाची मानतो. यापेक्षा ‘क्षुधेलिया अन्न’ म्हणजे भुकेनी कळवळणाऱ्याची जात, राहणी न पाहता आधी त्याला अन्न द्यायला हवे. जर ‘ईश्वराचा अंश प्रत्येक जिवात आहे’ असे शास्त्रे-पुराणे सांगतात तर हा प्रत्येक जीव समाजाच्या किंवा विश्वाच्या एकाच देहाचा भाग-अंश-अवयव आहे. मग त्यातील एकाला दु:ख, पीडा, वेदना असेल तर ते साऱ्यांचेच दु:ख नाही का? सामाजिक समतेचा हा विचार त्याकाळी संत तुकारामांनी सांगितला. पण प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या आजच्या मानवजातीलाही सामाजिक समता पेलत नाही हे कटुसत्य आहे. संस्कार संपन्न, सदाचारी माणूस घडवण्याचे कार्य निरपेक्षपणे संत करीत होते. सावळ्या, सुंदर विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जाणारे संत अद्वैत तत्त्वज्ञान जाणत होते. ‘कासयाने पूजा करू केशीराजा’ (तु.गा. ३७६८) हा त्यांचा बोलका अभंग पहा. संत तुकाराम यात म्हणतात- तीर्थक्षेत्री स्नान केले; पण मनप्रक्षालन झालेच नाही. केशीराजा ! तुझी पूजा मी कोणत्या साधनांनी करावी? पाण्याने तुला स्नान घालावे तर जीवनाचा निर्माता तूच आहेस. या फुलांच्या सौंदर्याचा आणि सुगंधाचा कल्पक निर्माताही तूच. नागवेलीची सुबक नक्षीदार पाने, क्षत नसणारे धान्य, गळलेल्या मोहरातून वाचलेली फळे, साऱ्यांचे सृजन तर तूच करतोस. राजमुद्रा असणाऱ्या शिक्क्यांची धातू, शेतातील सोनसळी धान्यराशी यांचेही निर्माण त्या जगनियंत्याचेच. संत तुकाराम महाराज म्हणतात, हाती चिपळ्या, गळ्यात वीणा घेऊन नामघोष करत ज्या भूमीवर आम्ही फेर धरतो ती धरती धारण करणाराही तोच. तेव्हा टाळ्या वाजवणारे दोन हस्तक आणि झुकलेले मस्तक याआधारे मी तुझी मानसपूजा करतो. आपल्या पोटच्या मुलांवर जसे आणि जेवढे प्रेम आपण करतो तेवढेच आपल्याकडे सेवारत असणाऱ्यांवर करावे हा माणुसकीचा अमोल संदेश नित्य व्यवहारात आणण्यासारखाच आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात ‘ज्ञानदेवे रचिला पाया....’तुका झालासे कळस’ हा बहिणाबार्इंनी केलेला गौरवपूर्ण उल्लेख संत तुकारामांच्या अमोल कार्याची ग्वाही देणारा आहे. -डॉ. सौ. प्रज्ञा आपटे