शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागलेत!

By किरण अग्रवाल | Updated: June 23, 2024 12:04 IST

Assembly elections 2024 : सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये व आगामी निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांमध्ये उठबशा सुरू झाल्या आहेत.

- किरण अग्रवाल

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यासाठी अवघे तीन ते चारच महिने असल्याने, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, राजकीय जोर बैठकांना प्रारंभ झाला आहे. कराड व सावंत या खासदारद्वयींच्या अलीकडील दौऱ्यांकडेही त्याचसंदर्भाने बघितले जात आहे.

लोकसभा निवडणूक आटोपल्या आटोपल्या आता विधानसभा निवडणुकीचे नगाडे वाजू लागले असून, यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष व उमेदवारांना मिळालेल्या मतांचा लेखाजोखा मांडण्यात येत असल्याने अनेकांना ‘हवे’तून जमिनीवर येऊन यंत्रणा राबविण्याची गरज स्पष्ट होऊन गेली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार आले असले, तरी राज्यात महायुतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने त्यांच्या तंबूत धाकधूक, तर महाविकास आघाडीच्या गोटात हायसे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. अर्थात लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकांमधील मुद्दे व स्थिती वेगवेगळी राहत असते हे खरे, पण मतदारांच्या मानसिकतेचा कल जाणून घेण्यासाठी अगोदर झालेल्या निवडणुकीतील आकडेवारी गृहीत धरली जात असते. त्याचदृष्टीने सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये व आगामी निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांमध्ये उठबशा सुरू झाल्या आहेत.

सध्या राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक घोषित झाली असून, आणखी सुमारे तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तोंडावर आलेली ही निवडणूक पाहता भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड व उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अकोल्यात भेटी देऊन आपापल्या पक्षांचा आढावा जाणून घेतला आहे. मतांची घसरण कशी झाली? हे जाणून घेण्यासाठी जबाबदारीचे अवलोकन होणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले, तर केंद्र सरकार औटघटकेचे आहे, तुम्ही विधानसभेच्या कामाला लागा, असा सल्ला सावंत देऊन गेले. काँग्रेसनेही मतदार नोंदणीवर भर दिला असून, त्यासाठी जागोजागी त्यांचे बूथ लागले आहेत. शिंदेसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह अन्य पक्ष्यांच्या पातळीवरही राजकीय सक्रियता वाढून गेलेली दिसत आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोघांमधील प्रमुख त्रिपक्षीय सामीलकी पाहता कोणत्या जागा नेमक्या कोणत्या पक्षाकडून लढविल्या जातील याचे चित्र स्पष्ट व्हायचे असले, तरी सर्वांकडेच इच्छुकांची रांग मोठी आहे. तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याचेही काहींचे इरादे आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठी राजकीय धुमश्चक्री पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

पश्चिम वऱ्हाडाचा विचार करता, अकोला पश्चिम या भाजपाच्या गडातून काँग्रेसला, तर काँग्रेसचे आमदार असलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारास लोकसभेसाठी अधिक मते मिळून गेली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजात दोन्ही प्रमुख उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवाराला मताधिक्य लाभले. शिंदे सेनेकडून केंद्रात मंत्रिपद लाभलेल्या एकमेव उमेदवारास त्यांच्या गृहक्षेत्रात मेहकरमध्ये अवघी तीनशेच मतांची आघाडी लाभली. तिकडे वाशिम जिल्ह्यात वाशिम व कारंजा या दोन्ही भाजपाचे आमदार असलेल्या मतदारसंघात उद्धवसेनेच्या उमेदवारास मताधिक्य लाभले. त्यामुळे या व अशा आकडेवारीतून संकेत घेऊन पुढील व्यूहरचना निश्चित केली जाणे गरजेचे बनले आहे. विशेषतः महाआघाडीने राज्यात जे यश मिळविले त्यामुळे ‘विजय आपलाच’ असेन, या भ्रमात राहणाऱ्या अनेकांचे विमान जमिनीवर आले आहे, तर विरोधकांमधील आत्मविश्वास उंचावून गेल्याने तेही सक्रिय होताना दिसत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, या पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षांखेरीजही वंचित, मनसे, प्रहार, बसपा आदींकडून निवडणूक लढवू इच्छिणारेही अनेकजण आहेत. वंचितच्या उमेदवारांनीही अकोला व बुलढाण्यात काही ठिकाणी चांगली मते घेतली आहेत. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने कोणालाही कमजोर नक्कीच समजता येऊ नये. दुसरे म्हणजे, लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे अगदी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अखेरच्या दिवसापर्यंत काही जागांवर कोणी लढायचे, याचीच स्पष्टता नसल्याने ऐनवेळी घोषित उमेदवारांची प्रचारात दमछाक झाल्याचे दिसून आले व काहींना त्यातून पराभवही स्वीकारावा लागला. तसे विधानसभेबाबत होऊ नये, म्हणून आतापासूनच सर्वजण कामाला लागले असतील, तर ते स्वाभाविक म्हणता येईल.

सारांशात, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला प्रारंभ होऊन गेला आहे खरा. पण, ते करताना निव्वळ राजकीय भूमिकांमधून सक्रियता प्रदर्शित होते की, खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले जाते, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.