शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

अस्मानी-सुलतानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 03:20 IST

मराठवाड्यावरील संकटाची मालिका संपत नाही, शेतकºयांच्या आत्महत्या तर नित्याच्याच झाल्यात. वातावरण बदलाच्या एका गर्तेत हा प्रदेश सापडला आहे. राजाने मारले अन् पावसाने झोडपले तर तक्रार कुणाकडे करणार?

- सुधीर महाजनमराठवाड्यावरील संकटाची मालिका संपत नाही, शेतकºयांच्या आत्महत्या तर नित्याच्याच झाल्यात. वातावरण बदलाच्या एका गर्तेत हा प्रदेश सापडला आहे. राजाने मारले अन् पावसाने झोडपले तर तक्रार कुणाकडे करणार?म्हणजे आता ओरडण्याचीही ताकद उरली नाही, एवढे फटके निसर्गाने मराठवाड्याला दिले. दुष्काळ पाचवीला पूजलेला, त्यात गेल्या पाच-सहा वर्षांपासून गारपिटीचा न चुकता येणारा फेरा. हा फेरा मरिआईच्या फेºयासारखाच. रबीचे पीक कितीही चांगले आले तरी घरात येईपर्यंत शाश्वती नाही. कालच्या गारपिटीने जालना, नांदेड आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये धूळधाण केली. परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत थोडाफार फटका होता; पण जालन्यातील २८ हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. एकूण दीड लाख हेक्टरवरील पीक नष्ट झाले. त्यापाठोपाठ बीडमध्ये २० हजार हेक्टरचे नुकसान. यात गहू, ज्वारी तर गेलीच, पण द्राक्ष, आंब्याच्या बागा संपल्या. ३१२९ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. याचबरोबर दोन जण मृत्यू पावले, १८ जनावरे दगावली, एक हजार कोंबड्या मेल्या. हा या गारपिटीचा जमा-खर्च.आता पंचनामे सुरू होतील. पंचनामे नवीन नाहीत. पूर्वीच्या काळी पंचानाम्याचा संबंध पोलिसांपुरता होता. आता पोलिसांपेक्षा जास्त पंचनामे महसूलचे कर्मचारी करीत असावेत. कारण आता तर कुठे बोंडअळीचे पंचनामे संपले होते. यावर्षी खरिपात कापूस बोंडअळीने खाल्ला, मक्याला भाव नाही आणि तीच स्थिती सोयाबीनची. त्यामुळे खरिपात नुकसान आणि रबीही कोरडी. म्हणजे ‘नील बटे सन्नाटा’ म्हणून सरकारकडे मदतीची याचना तरी कशी करायची. शेतकºयांच्या आत्महत्या थांबत नाहीत.पंचनामे करण्यासाठी सरकारी कर्मचाºयांची संख्या तरी पुरेशी आहे काय? तलाठ्यांच्या जागा रिकाम्या आहेत. लातूरमध्ये कृषी अधिकारी नाहीत. लातूरमधील नुकसानीचा अहवाल दुसºया दिवशी दुपारपर्यंत विभागीय आयुक्तांच्या हाती पडला नव्हता. एक हजार कोंबड्या मेल्या ही वार्ता चोवीस तासांनंतर बाहेर आली. ही प्रशासनाची गती आहे. जालना जिल्ह्यात काही वर्षांत द्राक्षाचे क्षेत्र विकसित झाले, पण यावेळी द्राक्ष बागा साफ झाल्या. रेशीम उत्पादनात बीड आणि जालना हे दोन जिल्हे राज्यात आघाडीवर आहेत. या गारपिटीने तुतीच्या पिकाचे नुकसान केल्यामुळे बहरत असलेल्या रेशीम उद्योगाला फटका बसला.यावर्षी परभणी, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी होते. गारपिटीचा फटका याच जिल्ह्यांना बसला. भौगोलिकदृष्ट्या विचार केला, तर जालना जिल्हा केंद्रस्थानी असल्याने परभणीतील जिंतूर आणि बीडमधील गेवराई, माजलगाव हे शेजारचे तालुके बाधित झाले. गारपिटीशिवाय पावसानेही नुकसान केले आहे. कमी पावसाचा आणि गारपिटीचा काही संबंध आहे काय, हे शास्त्रीयदृष्ट्या तपासणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने हवामान या विषयातील तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकरांनी सांगितले की, सूर्याच्या पृष्ठभागांवर पडणाºया डागांची साखळी होते, तिला सौर साखळी म्हणतात. आताची साखळी २००९ पासून सुरू झाली असून, ती २०२१ पर्यंत चालणार, तिचा आणि गारपिटीचा संबंध आहे. दुसरी सौर साखळी २०२५ पासून सुरू होऊन २०३२ मध्ये संपणार आहे. म्हणजे पुढची पंधरा वर्षे गारपिटीचा फटका न टळणारा, असेच म्हणता येईल. आता तक्रार कुणाकडे करणार.

टॅग्स :Rainपाऊस