शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीचा कत्तलखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 10:07 IST

गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्याजवळ आर्वी येथे उघडकीस आलेले गर्भपाताचे रॅकेट मानवतेला काळिमा फासणारे आहे.

गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्याजवळ आर्वी येथे उघडकीस आलेले गर्भपाताचे रॅकेट मानवतेला काळिमा फासणारे आहे. देवदूत समजले जाणारे डॉक्टर केवळ पैशासाठी किती नृशंस होतात, मुलीचे पाऊल वाकडे पडले, गर्भधारणा झाली, कुटुंबाची अब्रू चव्हाट्यावर टांगली गेली म्हणून गर्भगळीत झालेल्या अगतिक पालकांचा कसा गैरफायदा घेतला जातो, हेदेखील या प्रकरणाने स्पष्ट झाले आहे. धक्कादायक म्हणजे डॉ. रेखा व डॉ. नीरज कदम यांच्या या हॉस्पिटलमध्ये अगदी गोबरगॅसच्या खड्ड्यांमध्येही गर्भातील जिवांच्या कवट्या व हाडांचा चुरा आढळून आला. या कदमांच्या कुटुंबाला चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा डॉक्टरी पेशाचा वारसा आहे.

नीरज यांचे वडील कुमार व आई शैलजा दोघेही डॉक्टर. त्यातही आई डॉ. शैलजा या वर्धा व अमरावती जिल्ह्यांची सीमा असलेल्या वर्धा नदीच्या डाव्या तीरावरच्या भागात आधीच्या पिढीतल्या नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ. कदम कुटुंब राजकीयदृष्ट्याही प्रभावी मानले जाते. नीरज कदम यांचे आजोबा जगजीवनराव ऊर्फ नानाजी कदम तीनवेळचे आमदार व १९७१ चे लोकसभेचे खासदार.  त्यांच्या कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीने ग्रामीण भागात गर्भपाताचा गोरखधंदा  का उघडावा, हा प्रश्न कोणालाही पडेल. अल्पवयीन मुला-मुलींची प्रेमप्रकरणे नवी नाहीत. लैंगिक आकर्षणासाठी कारणीभूत सिनेमा, नट-नट्यांचे गॉसिप, विवाहबाह्य संबंधांभोवती फिरणाऱ्या टीव्ही मालिका वगैरेंसोबतच स्मार्टफोन खेड्यापाड्यात पोहोचला असल्याने अगदी शाळकरी वयातच मुला-मुलींचे शारीरिक संबंध आता सवयीचे झाले आहेत.

मुलीच्या अब्रूचा प्रश्न असल्याने समाजातील चारचौघांना मध्यस्थ टाकून कसेबसे प्रकरण निस्तरणे व शक्य तितक्या लवकर मुलीचे लग्न लावून देणे, असा मधला मार्ग त्यावर पालक शोधतात. दरवेळी ते जमतेच असे नाही. त्यामुळेच गर्भधारणा, बलात्काराच्या तक्रारी, कोर्टकज्जे आदी प्रकार वाढल्याचे दिसते. आर्वीचा कत्तलखानाही अशाच प्रकरणातून चव्हाट्यावर आला. अल्पवयीन मुला-मुलीच्या प्रेमसंबंधातून मुलीला गर्भधारणा झाली.  

मुलीची बदनामी होईल तेव्हा गर्भपात करून टाकू, खर्च आम्ही करू, असा प्रस्ताव मुलाच्या आई-वडिलांकडून देण्यात आला. त्यानुसार गर्भपातासाठी कदम यांचे हॉस्पिटल गाठले गेले. ऐंशी हजारांत गर्भपाताचा सौदा ठरला. तीस हजार अगाऊ देण्यात आले. त्याचदरम्यान मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली व डॉ. रेखा कदम तसेच मुलाच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली. नंतर दोन परिचारिकांना अटक झाली.  संबंधित मुलीच्या विल्हेवाट लावलेल्या गर्भाचा शोध घेतला जात असताना, हॉस्पिटलच्या परिसरात आधी पाच मानवी कवट्या, तर नंतर गोबरगॅसच्या खड्ड्यात अकरा मानवी कवट्या, गर्भाच्या रूपातील अर्भकांची काही हाडे पोलिसांना आढळून आली.

बहुतेक गर्भ पूर्ण वाढ झालेले, शरीरात हाडे तयार झालेले असावेत. कायद्यानुसार अतिआवश्यक असेल तरच मान्यताप्राप्त केंद्रांवरच गर्भपात करता येतो. आधी वीस आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा गर्भ काढून टाकायचा असेल, तर मान्यताप्राप्त डॉक्टरची परवानगी घ्यावी लागायची. वर्षभरापूर्वी हा कालावधी चोवीस आठवडे करण्यात आला. डॉक्टरांनी परवानगी नाकारली, तर न्यायालयात जाता येते. बलात्काराच्या प्रकरणांमध्ये मात्र कालावधीचा विचार न करता न्यायालयाची परवानगी लागतेच. बलात्कार ठरू शकेल अशा प्रकरणामुळे आर्वीतील गर्भपाताचे रॅकेट उघडकीस आले असले तरी, सगळेच गर्भपात तशा प्रकरणांचेच असतील, असे मानता येणार नाही. कारण, गुरुवारी सापडलेल्या अकरा कवट्यांपैकी नऊ कवट्या मुलींच्या गर्भाच्या असाव्यात, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. वर्धा, अमरावती, नागपूर अशा आजुबाजूंच्या शहरांमध्ये स्त्रीभ्रूणहत्येच्या उद्देशाने केले जाणारे गर्भपात उघडकीस येतील, ही भीती मुलींना गर्भातच मारून टाकणाऱ्या मंडळींना असते.

लिंगनिदान चाचण्यांबद्दल प्रशासन सतर्क आहे. सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवर संगणकीय ट्रॅकर बसविण्यात आले आहेत. तेव्हा, आर्वीसारखे आडवळणाचे गाव तर या कतलींसाठी निवडले गेले नाही ना?, याचा तपास करणे गरजेचे आहे. राज्यभर गाजलेल्या आधीच्या प्रकरणांमध्येही बीड जिल्ह्यातील परळी, सांगलीजवळचे म्हैसाळ अशी मुख्य शहरांपासूनची दूरची गावेच नराधम डॉक्टरांनी व मुलीचा गर्भातच जीव घेणाऱ्या माता-पित्यांनी निवडली होती. तेव्हा, आर्वी प्रकरणाचा तपास बेकायदेशीर गर्भपातापुरता मर्यादित राहू नये. कोवळ्या कळ्यांच्या गर्भातच कतलींच्या दृष्टीनेही गंभीर तपास व्हावा.