शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अरुण साधू... मितभाषी पण ठाम भूमिका घेणारा पत्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 03:35 IST

सव्यसाची पत्रकार, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सतत नवतेचा शोध घेण्याची वृत्ती असणारे व समाजाशी जोडलेली नाळ कायम जपणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून अरुण साधूंचा कायम उल्लेख होत राहील.

सव्यसाची पत्रकार, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सतत नवतेचा शोध घेण्याची वृत्ती असणारे व समाजाशी जोडलेली नाळ कायम जपणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून अरुण साधूंचा कायम उल्लेख होत राहील. त्यांच्यासोबत पत्रकारितेचा मोठा काळ घालवलेल्या दिनकर रायकर यांच्या या आठवणी.अरुण साधू यांच्या निधनाची बातमी आली आणि माझे मन ४७ वर्षे मागे गेले. सप्टेंबर १९७० साली मी इंडियन एक्स्प्रेसमध्ये रिपोर्टर म्हणून रुजू झालो. मला पहिले काम क्राईम रिपोर्टिंगचे दिले. सोबत एक सिनियर पत्रकार म्हणून अरुण साधू यांना दिले गेले. माझ्या पहिल्या बातमीतील काही चुका त्यांनी दुरुस्त केल्या. त्या चुका मी पुन्हा कधीही केल्या नाहीत. सिनियर म्हणून ते एक आठवडा सोबत होते. तसे आम्ही दोघे समवयीन, पण पत्रकारितेत ते मला ज्येष्ठ होते. मात्र त्यांच्या वागण्याबोलण्यात ती ज्येष्ठता त्यांनी त्यावेळी दाखवली नाही आणि पुढेही कधीच नाही. नंतर ते टाइम्स आॅफ इंडियात गेले मात्र आम्हा दोघांना पॉलिटिकल बिट मिळाले. त्यामुळे आमच्या भेटीगाठी, चर्चा सतत होत राहिल्या. मंत्रालय, विधिमंडळ, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यालयांना भेटी, सभा, दौरे अशा अनेक प्रसंगात आम्ही एकत्र होतो. त्यातून माझी पत्रकारिता संपन्न होत राहिली.ते दिवस राजकीय स्थैर्याचे होते. तसेच विरोधी पक्षातील नैतिकतेचे मापदंड अधोरेखित करणारे होते. काहीही लिहिले आणि धकून गेले असा तो काळ नव्हता. त्यामुळे आम्ही एकमेकांची साप्ताहिक वार्तापत्रे उत्सुकतेने वाचून त्यावर चर्चा करीत होतो. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील अशा वार्तापत्रांवर मंत्रालय प्रेसरुममध्ये चर्चा रंगायच्या. त्यातून नवीन काही शोधण्याचा प्रयत्न असायचा. एक किस्सा असाच, अरुण साधूंनी झोपडपट्टीत राहून कचरा गोळा करणाºयांवर एक वार्तापत्र लिहिले होते. गोळा केल्या जाणाºया कचºयात लोखंड, पत्रा असे धातूही असायचे. साधूंनी लिहिताना ‘‘हे मेटल विकून गरीब लोक पैसे कमावतात’’ असा उल्लेख टाइम्समध्ये केला होता. तो वाचून त्यावेळी एक्स्प्रेसचे चीफ रिपोर्टर बी.एस.व्ही. राव त्यांना म्हणाले, ‘‘ए बच्चा, इट्स नॉट ओन्ली मेटल... इट्स अ प्रेशस्स मेटल’’ असा उल्लेख पाहिजे होता. एक ‘प्रेशस्स’ शब्द आला असता तर त्या लेखाची उंची वाढली असती हे साधंूनी मान्य केले व पुढे हा किस्सा सगळ्या प्रेसरुमध्ये सांगितला. इतका मोकळेपणा त्यांच्याकडे होता आणि अशी निकोप स्पर्धाही त्यावेळी होती.पत्रकारितेखेरीज त्यांचे इतरही खूप लिखाण सुरू असायचे. त्यांचा वेगळा असा वाचक वर्ग होता. शासकीय अधिकारी, मंत्री त्यांच्या त्या साहित्यविषयक लिखाणावरून त्यांच्याशी बोलायचे, त्या गप्पा ऐकताना आम्हाला नेहमी हेवा वाटायचा. टाइम्सची नोकरी सोडून ते पुढे स्टेट्समनमध्ये गेले. त्यावेळी त्या पेपरचा लौकिक होता. पण ती नोकरी सोडून ते फ्री प्रेसचे संपादक झाले. आमचा त्याला विरोध होता. पण साधू म्हणाले, प्रत्येक पत्रकाराने संपादक होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे, मला ते पद मिळते आहे, मग मी ते का सोडू?मितभाषी पण लिखाणातून ठाम भूमिका घेणारा हा जगनमित्र पत्रकार होता. आम्ही किती काळ एकत्र घालवला यापेक्षा तो आम्ही खूप चांगला घालवला हे माझ्यासाठी कायम स्मरणात राहील...