शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

‘आनंदयात्री’ हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 04:31 IST

गेली ६० वर्षे मराठी भावसंगीतावर अधिराज्य गाजविणारे लोकप्रिय गायक अरुण दाते रविवारी कालवश झाले. त्यांच्या रूपाने जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके या मराठी भावगीतांच्या सुवर्ण पर्वातील आणखी एक तारा निखळून पडला आहे. दाते यांचे वैशिष्ट्य असे की, ते मराठी असले, तरी मराठी भाषक नव्हते.

गेली ६० वर्षे मराठी भावसंगीतावर अधिराज्य गाजविणारे लोकप्रिय गायक अरुण दाते रविवारी कालवश झाले. त्यांच्या रूपाने जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके या मराठी भावगीतांच्या सुवर्ण पर्वातील आणखी एक तारा निखळून पडला आहे. दाते यांचे वैशिष्ट्य असे की, ते मराठी असले, तरी मराठी भाषक नव्हते. त्यांच्या घरात रसिकतेची परंपरा असली, तरी गायनाची परंपरा नव्हती. मात्र, अरुण दातेंचे भाग्य एवढे थोर होते की, त्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिले गाणे खुद्द कुमार गंधर्वांनी शिकविले. एकदा कुमार त्यांना म्हणाले, तू फार छान गुणगुणतोस, तुझा आवाजही चांगला आहे. चल मी तुला गाणे शिकवितो. कुमारांनी त्यांना उर्दू गझल म्हणायला शिकविली. आयुष्यात त्यांनी गायलेली ती पहिली गझल. बिरला समूहातील बड्या कंपनीच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळीत असताना, त्यांनी भावगीत गायनाचे अनोखे पर्व साकार केले होते. जेव्हा नोकरी की भावगीत गायन, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय तत्काळ घेऊन टाकला आणि नोकरीतून मिळणाऱ्या दरमहा ३० हजार रुपये पगाराच्या अनेक पटीने अधिक पैसा आपल्या गायनाच्या कार्यक्रमातून सातत्याने मिळविला. त्यांनी कधीही दुसºया गायकाची गाणी गायली नाहीत, हे त्यांचे अनोखे वैशिष्ट्य होते. कमालीची कृतज्ञता आणि नम्रता हा त्यांचा स्थायी भाव होता. जी. एन. जोशी यांनी मराठी भावगीताची परंपरा निर्माण केली, तिच्यामुळेच आपण यशस्वी ठरलो, या कृतज्ञभावापोटी त्यांनी पदरचे ८५ हजार रुपये खर्चून, जोशी यांचा ८५वा वाढदिवस साजरा केला होता. बिरला समूहातील उपाध्यक्षपदाची नोकरी सोडल्यानंतर, मिळालेल्या पीएफ आणि गॅ्रच्युईटीच्या घसघशीत रकमेतून गीतकार पाडगावकर आणि संगीतकार श्रीनिवास खळे व यशवंत देव यांना, एक-एक लाख रुपये कृतज्ञतेपोटी घरी जाऊन अर्पण करण्याचे दातृत्व केवळ दातेच दाखवू शकत होते. मराठी भावगीतात दोनच गायक उच्च विद्या विभूषित होते. एक अरुण दाते, जे मॅकेनिकल इंजिनीअर व्हिजेटीआयमधून झाले होते आणि दुसरे श्रीधर फडके. गेली काही वर्षे अरुण दाते यांना स्मृतिभं्रशाच्या विकाराने ग्रासले होते. त्यामुळे ते रुग्णशय्येला खिळलेले होते. आयुष्यात सगळी सुखे त्यांनी प्राप्त केली होती. त्यांचे आयुष्य तृप्ततेने भरलेले होते. त्यामुळेच निद्रावस्थेतच त्यांना मृत्यू आला. कलावंताचे शालीनतेचे व सुसंस्कृत असे आयुष्य कसे असावे, याचा वस्तुपाठ म्हणजेत्यांचे आयुष्य होते. त्यांच्यासारखा भावगीत गायक पुन्हाहोणार नाही.

टॅग्स :arun datearun datemarathiमराठीmusicसंगीत