शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

मुडदे उकरून काढायची इतकी खुमखुमी का येते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 06:54 IST

सत्तापक्षाचे आमदार, मंत्रीच धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा का चालवतात? दोन शंका : एकतर त्यांचा वैयक्तिक हेतू किंवा उचकवणारी भाषा बोलण्याचा 'आदेश'!

यदु जोशी 

धार्मिक तेढ निर्माण होईल अशा विषयांनी महाराष्ट्रात काही दिवसांपासून डोके वर काढले आहे. कुठे झटका-हलाल वाद, तर कुठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम नव्हतेच हा निराधार वाद उकरणे... हे विषय सहज आलेले नाहीत. समाजाचे ज्याने काहीही अडत नाही असे मुद्दे कोणीही काढले तर समजून जायचे, की अजेंडा दुसराच आहे. नॉन इश्युजना इश्युज बनवून त्यावर गदारोळ करण्याचे सध्याचे दिवस आहेत. औरंगजेबाचे कोडकौतुक अबू आझमी यांनी सहजासहजी केले नाही. एका समाजाचा रोष पत्करण्याची तयारी ठेवत दुसऱ्या समाजात लोकप्रियता मिळविण्याचा हा फंडा आहे. 

लोकसभेचे मुद्दे विधानसभेला चालले नाहीत. आता विधानसभेचे मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चालणार नाहीत, हे चाणाक्ष राजकारण्यांना लगेच कळते. मग अशी पेरणी सुरू होते. मुडदे उकरून काढल्याने महाराष्ट्राचे सामाजिक, धार्मिक सौहार्द टिकणार नाही याचे भान कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना नाही. सत्तापक्षाचे आमदार, मंत्रीच जेव्हा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा चालवतात तेव्हा दोन प्रकारच्या शंका येतात. एकतर त्यात त्यांचा वैयक्तिक हेतू असावा किंवा अशी उचकवणारी भाषाबोलण्यास त्यांना सांगितले असावे. प्रार्थना स्थळावरील भोंग्याचा विषय समोर आला आहे. हिंदुत्वावर फोकस करून पुढचे राजकारण करण्याची भाजपची भूमिका दिसते. अजीर्ण होणारे बहुमत मिळालेले असताना राज्याच्या विकासावर फोकस करण्याऐवजी पेटवापेटवी का केली जात आहे? फक्त सत्ताधारीच नव्हेत, विरोधकही तसेच आहेत. जग कुठे चालले आहे, याचे भान तरी या लोकांना आहे का?

वाटण्यात किती जातात? 

पारदर्शक कारभाराची आश्वासक सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. त्यासाठी ते अनेक उपाय योजत आहेत. विविध विभागांमध्ये कंत्राटदारांना वरपासून खालपर्यंत द्यावी लागणारी टक्केवारी हा भ्रष्टाचाराच्या मुळाशी असलेला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. 'एकूण कामाच्या ८ पासून २० टक्क्यांपर्यतची रक्कम वाटण्यातच जाते', असे काही कंत्राटदार सांगतात. वेगवेगळ्या विभागाचे अदृश्य रेटकार्ड वेगवेगळे आहे. अर्थात हा पुराव्यापलीकडचा भ्रष्टाचार आहे. तो वरवर दिसत नाही, खोल खाली गेले की त्याची पाळेमुळे कळतात. वाटपाची एक साखळी असते त्यातील प्रत्येक कडीला सुखवावे लागते. आदिवासी विकास, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण, जलसंपदा अशी बरीच खाती आहेत जिथे व्यवहार चालतात. वाटपाचा हा ट्रेल एका कागदावर काढून एकेक करून तो मोडून काढता नाही का येणार?

फुके हे काय बोलले? 

विधानसभेत प्रश्न, लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार होत असल्याचा आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात ऑडिओ, व्हिडिओ क्लिप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्या आहेत. एक आमदारच असे आरोप करत असतील तर ती गंभीर बाब आहे. असे कोणते रॅकेट खरेच असेल का? राईस मिल मालकांना धमकावल्याच्या क्लिप्स फुके यांच्याकडे आहेत. त्यांचा निशाणा कोणावर असावा? असे म्हणतात की काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा संबंध या प्रकरणाशी जोडला जावू शकतो. धान घोटाळे करणाऱ्यांना सोडणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत म्हणाले होते. ते हेच प्रकरण आहे.

विधान परिषदेचे काय? 

विधान परिषदेवरील पाच जागांची निवडणूक २७मार्चला होणार आहे. विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या या जागा आहेत. भाजपला त्यातील तीन जागा मिळतील. माहिती अशी आहे की प्रदेश भाजपने तब्बल २० जणांची नावे सुचवून ती दिल्लीला निर्णयार्थ पाठविली आहेत. कोणाला राग नको म्हणून वीस जणांची यादी वर पाठवून प्रदेश भाजपने अंग झटकले आहे. उद्या त्यातील तीन नावे दिल्लीहून आली की 'आम्ही तर तुमचेही नाव पाठविले होते', असे प्रत्येकाला सांगायला मोकळे. भाजपच्या प्रत्येक आमदाराला दीडदोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. तरीही खूप स्पर्धा आहे. एक इच्छुक म्हणाले, 'दीड वर्ष तर दीड वर्ष, माजी आमदार हा ठप्पा तर नावासमोर लागतो ना?' भाजपमध्ये पूर्वी संघटनेतील माणसे संघटनेतच वर्षानुवर्षे राहायची; पण आता संघटनेत असलेल्यांनाही सत्तेची पदे हवी आहेत. आपल्यामागून आलेले विधान परिषदेतर गेले आणि आपण हात हलवत बसलो, अशी नाराजी असलेले पाच-सहा जण आहेत, यावेळी त्यांच्यापैकी किती जणांची नाराजी दूर होते ते पहायचे.

जयंत पाटील यांची नाराजी? 

शरद पवार गटात धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे. जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा हा सुप्त संघर्ष आहे. त्यातच सुप्रियाताईचे जयंतरावांशी फारसे पटत नसल्याची चर्चादेखील आहे. पक्षात आपल्याला पुरेसे स्वातंत्र्य नाही, अशी जयंतरावांची भावना झाली आहे म्हणतात. ते अजित पवार गटात जात असल्याचा दावा शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट करत आहेत. 'माझे मन कशात लागत नाही', असे ते आपल्याला म्हणाल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. इकडे अजितदादांचे एक मंत्रिपद रिकामे आहे, म्हणून चर्चेला अधिकच पेव फुटले आहे.

जाता जाता

बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्यातून मोठ्या श्रद्धेने राजसाहेबांसाठी गंगाजल आणले अन् राजसाहेब तरी काय? नांदगावकरांना चक्क 'हुड' म्हणाले. नागपुरात एका भागाचे नाव आहे हुडकेश्वर. नांद‌गावकर हे मनसेतले नते 'हुड'केश्वर आहेत.

yadu.joshi@lokmat.com 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025