शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजार ऐंशी हजार पार.. आता पुढे काय ही उत्कंठा !

By पुष्कर कुलकर्णी | Updated: July 5, 2024 05:50 IST

शेअर बाजार सध्या उंचीवर असून, उसळी घेत असल्याने गुंतवणूकदारही खुशीत आहेत. आपला खिसा असाच भरत राहो, या अपेक्षेत ते आहेत.

डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

शेअर बाजार नवी-नवी उंची गाठत आहे. कालही  सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वोत्तम पातळी गाठली. दीर्घकालीन गुंतवणूकदार आनंदात आहेत, कारण ते खऱ्या अर्थाने  मालामाल होत आहेत. थोडे इतिहासात जाऊन सेन्सेक्सची वाटचाल कशी झाली हे पाहू. सेन्सेक्स सन २००३ मध्ये ५००० पातळीवर होता. पुढील चार वर्षांत म्हणजेच २००७ मध्ये तो चौपट झाला. याच दरम्यान जागतिक मंदीचे वारे वाहत होते. ही मंदी २००८ मध्ये तीव्र झाली. याची झळ जागतिक पातळीवर सर्वच शेअर बाजारांनी सोसली. 

सेन्सेक्सने या दरम्यान मोठी डुबकी घेत ८,३०० ही नीचांकी पातळी पहिली. पुढे पुन्हा २० हजारांची पातळी गाठायला २०१० उजाडले. पुढील पाच वर्षांत ३० हजार आणि २०१९ मध्ये ४० हजारांचा पल्ला सेन्सेक्सने गाठला, तोच कोरोनाने जगाला विळखा घातला.  याचा धसका गुंतवणूकदारांनी घेत विक्रीचा सपाटा लावत सेन्सेक्सला ४० हजारांहून २५ हजारांपर्यंत खाली आणले. याच दरम्यान वर्षभरात शेअर्सचे भाव आकर्षक अशा खालच्या पातळीवर आल्याने गुंतवणूकदार पुन्हा आकर्षित होऊ लागले. खरेदी सुरू झाली. 

याच दरम्यान विदेशी गुंतवणूकदारही आकर्षित झाले. कॅश मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आणि बाजार जसा खाली आला तसाच एकतर्फा वर चढला. सन २०२१ नंतर बाजाराची खऱ्या अर्थाने मोठ्या ‘बुल रन’ला सुरुवात झाली. एक वर्षातच सेन्सेक्स दुपटीपेक्षा जास्त वाढून ६० हजारी पोहोचला. कोरोना काळात भारतात डिमॅट अकाउंट चौपट वाढले. म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक वाढली. पुढे २०२२ मध्ये बाजाराने थोडे करेक्शन घेतले; पण त्याची घोडदौड सुरूच राहिली. सेन्सेक्स मागील वर्षी ७० हजारी आणि यावर्षी ८० हजारी पोहोचला.विदेशी आणि भारतीय गुंतवणूकदार यांची रस्सीखेच विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या दहा वर्षांत भारतीय बाजाराकडे पाठ फिरवली, हे आकडेवारी सिद्ध करते.

२०१५ पासून २०२४ पर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून कॅश मार्केटमधून तब्बल ६ कोटी ५५ लाख रुपये काढले आहेत. यात अपवाद सन  २०१९ आणि २० मध्ये. या दोन वर्षांत १ लाख ५ हजार कोटी गुंतविले. भारतीय गुंतवणूकदारांनी गेल्या ९ वर्षांत तब्बल ११ लाख ३७ हजार कोटी गुंतविले. फक्त सन २०२० मध्ये ३५ हजार सहाशे कोटी काढून घेतले. याचाच अर्थ भारतीय शेअर बाजाराने ही जी उत्तुंग भरारी घेतली आहे, ती भारतीय गुंतवणूकदारांच्या जोरावर अन् विश्वासावरच. 

म्युच्युअल फंड्समध्ये वाढता ओघभारतात म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक गेल्या पाच वर्षांत वाढली. चार कोटींच्या वर गुंतवणूकदार आणि १७ कोटींच्या वर म्युच्युअल फंडमधील खाती एकूण ५० लाख कोटींची ऍसेट अंडर मॅनेजमेंट सांभाळत आहेत. म्युच्युअल फंड्समधील ६९ टक्के गुंतवणूक थेट शेअर बाजारात इक्विटी योजनेत आहे.  शेअर बाजारावर भारतीय गुंतवणूकदारांनी दाखविलेला हा विश्वास खूप काही सांगून जातो.

पुढे काय? विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठ पुन्हा आकर्षित करेल. भारतातील गुंतवणुकीचा ओघही सुरू राहील. अधून-मधून करेक्शन येणे हे बाजाराच्या आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने कायम सकारात्मक असते. येणाऱ्या काळात स्थिर सरकार, जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण, अमेरिकन फेडरल आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने जर शेअर बाजारांना पूरक असे निर्णय घेतले तर येणाऱ्या काळात सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा सहज पार करेल, यात शंका नाही. 

pushkar.kulkarni@lokmat.com

टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजार