शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
4
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
5
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
6
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
7
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
8
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
9
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
10
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
11
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
12
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
13
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
14
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
15
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
16
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
17
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
18
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
19
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
20
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी

शेअर बाजार ऐंशी हजार पार.. आता पुढे काय ही उत्कंठा !

By पुष्कर कुलकर्णी | Updated: July 5, 2024 05:50 IST

शेअर बाजार सध्या उंचीवर असून, उसळी घेत असल्याने गुंतवणूकदारही खुशीत आहेत. आपला खिसा असाच भरत राहो, या अपेक्षेत ते आहेत.

डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

शेअर बाजार नवी-नवी उंची गाठत आहे. कालही  सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वोत्तम पातळी गाठली. दीर्घकालीन गुंतवणूकदार आनंदात आहेत, कारण ते खऱ्या अर्थाने  मालामाल होत आहेत. थोडे इतिहासात जाऊन सेन्सेक्सची वाटचाल कशी झाली हे पाहू. सेन्सेक्स सन २००३ मध्ये ५००० पातळीवर होता. पुढील चार वर्षांत म्हणजेच २००७ मध्ये तो चौपट झाला. याच दरम्यान जागतिक मंदीचे वारे वाहत होते. ही मंदी २००८ मध्ये तीव्र झाली. याची झळ जागतिक पातळीवर सर्वच शेअर बाजारांनी सोसली. 

सेन्सेक्सने या दरम्यान मोठी डुबकी घेत ८,३०० ही नीचांकी पातळी पहिली. पुढे पुन्हा २० हजारांची पातळी गाठायला २०१० उजाडले. पुढील पाच वर्षांत ३० हजार आणि २०१९ मध्ये ४० हजारांचा पल्ला सेन्सेक्सने गाठला, तोच कोरोनाने जगाला विळखा घातला.  याचा धसका गुंतवणूकदारांनी घेत विक्रीचा सपाटा लावत सेन्सेक्सला ४० हजारांहून २५ हजारांपर्यंत खाली आणले. याच दरम्यान वर्षभरात शेअर्सचे भाव आकर्षक अशा खालच्या पातळीवर आल्याने गुंतवणूकदार पुन्हा आकर्षित होऊ लागले. खरेदी सुरू झाली. 

याच दरम्यान विदेशी गुंतवणूकदारही आकर्षित झाले. कॅश मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आणि बाजार जसा खाली आला तसाच एकतर्फा वर चढला. सन २०२१ नंतर बाजाराची खऱ्या अर्थाने मोठ्या ‘बुल रन’ला सुरुवात झाली. एक वर्षातच सेन्सेक्स दुपटीपेक्षा जास्त वाढून ६० हजारी पोहोचला. कोरोना काळात भारतात डिमॅट अकाउंट चौपट वाढले. म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक वाढली. पुढे २०२२ मध्ये बाजाराने थोडे करेक्शन घेतले; पण त्याची घोडदौड सुरूच राहिली. सेन्सेक्स मागील वर्षी ७० हजारी आणि यावर्षी ८० हजारी पोहोचला.विदेशी आणि भारतीय गुंतवणूकदार यांची रस्सीखेच विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या दहा वर्षांत भारतीय बाजाराकडे पाठ फिरवली, हे आकडेवारी सिद्ध करते.

२०१५ पासून २०२४ पर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून कॅश मार्केटमधून तब्बल ६ कोटी ५५ लाख रुपये काढले आहेत. यात अपवाद सन  २०१९ आणि २० मध्ये. या दोन वर्षांत १ लाख ५ हजार कोटी गुंतविले. भारतीय गुंतवणूकदारांनी गेल्या ९ वर्षांत तब्बल ११ लाख ३७ हजार कोटी गुंतविले. फक्त सन २०२० मध्ये ३५ हजार सहाशे कोटी काढून घेतले. याचाच अर्थ भारतीय शेअर बाजाराने ही जी उत्तुंग भरारी घेतली आहे, ती भारतीय गुंतवणूकदारांच्या जोरावर अन् विश्वासावरच. 

म्युच्युअल फंड्समध्ये वाढता ओघभारतात म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक गेल्या पाच वर्षांत वाढली. चार कोटींच्या वर गुंतवणूकदार आणि १७ कोटींच्या वर म्युच्युअल फंडमधील खाती एकूण ५० लाख कोटींची ऍसेट अंडर मॅनेजमेंट सांभाळत आहेत. म्युच्युअल फंड्समधील ६९ टक्के गुंतवणूक थेट शेअर बाजारात इक्विटी योजनेत आहे.  शेअर बाजारावर भारतीय गुंतवणूकदारांनी दाखविलेला हा विश्वास खूप काही सांगून जातो.

पुढे काय? विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठ पुन्हा आकर्षित करेल. भारतातील गुंतवणुकीचा ओघही सुरू राहील. अधून-मधून करेक्शन येणे हे बाजाराच्या आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने कायम सकारात्मक असते. येणाऱ्या काळात स्थिर सरकार, जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण, अमेरिकन फेडरल आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने जर शेअर बाजारांना पूरक असे निर्णय घेतले तर येणाऱ्या काळात सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा सहज पार करेल, यात शंका नाही. 

pushkar.kulkarni@lokmat.com

टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजार