शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लिंबाचे सरबत द्यावे, तर तेवढीही ऐपत उरली नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 05:34 IST

देशातल्या अनेक राज्यांमध्ये तेल, साबण, कपडे धुण्याची पावडर, साखर, चहा यांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. लोकांनी हात आखडता घ्यायला सुरुवात केली आहे.

राही भिडे

देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. केंद्र आणि राज्य सरकारे महागाईची जबाबदारी एकमेकांवर ढकलून मोकळे होत आहेत. महागाई, बेरोजगारी या जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांऐवजी भावनिक प्रश्नांमध्येच त्यांना अधिक स्वारस्य दिसून येत आहे. देश कोरोनातून सावरत नाही तोच रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले हे युद्ध थांबायला तयार नाही.  जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. आयात-निर्यातीचे चक्र बिघडले आहे. त्याचा जगातील बहुतांश राष्ट्रांना फटका बसला आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला असून भारतही त्याला अपवाद नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार मोठा असल्याने श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तानसारखी आपली स्थिती झालेली नाही. परंतु तरीही रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेच्या बाहेर महागाई गेली आहे.

केंद्र सरकार महागाईची जबाबदारी राज्यांवर ढकलून मोकळे होत असताना, मर्यादित अधिकार असलेली राज्ये आपला कराचा बोजा कमी करायला तयार नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसात महागाईचा आलेख सातत्याने उंचावतो आहे. गृहोपयोगी वस्तू, खाद्यान्न, भाजीपाला, वाहने, घरबांधणी साहित्य... अशा बहुतांश वस्तूंच्या किमती वाढत आहेत. उन्हाळ्यात पाहुण्यांना साधे लिंबू सरबतही देता येत नाही, अशी स्थिती आहे. महागाईचे भांडवल करून सत्तेवर आलेले भाजपचे नेते आता त्यावर बोलायला तयार नाहीत. संकटकाळात थोडा तरी पैसा आपल्या हातात राहावा, या विचाराने सध्या ग्राहक आपल्या गरजा कमी करताना दिसत आहेत. परिणामस्वरूप दररोज लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये तेल, साबण, कपडे धुण्याची पावडर, साखर, चहा यांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. याबाबत ‘रिटेल इंटेलिजन्स ’ या संस्थेच्या अहवालामधून, वाढत्या महागाईमुळे लोकांनी खरेदी कमी केली असल्याचे समोर आले आहे. अहवालातून प्राप्त आकडेवारीनुसार दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या मागणीमध्ये ५.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. वाढत्या महागाईमुळे ग्राहक रोजच्या वस्तूंचीदेखील खरेदी टाळू लागले आहेत. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई ६.०७ टक्के होती. ती मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांवर पोहोचली. या अहवालानुसार दक्षिण भारतात परिस्थिती आणखी चिंताजनक असून तिथल्या ग्राहकांच्या खरेदीमध्ये १८.३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

या अहवालानुसार  ओडिशामध्ये गृहोपयोगी वस्तूंच्या मागणीमध्ये तब्बल ३२.४ टक्क्यांची घट झाली आहे. ओडिशानंतर आंध्र प्रदेशमध्ये २८.५ टक्के, तेलंगणा २५.५ टक्के, झारखंडमध्ये १९.१ टक्के, कर्नाटकमध्ये १८.५ टक्के, महाराष्ट्रात ९.३ टक्के आणि केरळमध्ये ३.१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाईत आणखी भर पडली आहे. खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतींमुळे किरकोळ महागाईचा दर आवाक्यात येणे तर दूरच; पण आता हा दर चिंताजनक स्थितीवर जाऊन पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.०७ टक्के होता. आता हा दर ६.९५ झाला आहे.  ग्रामीण भागात  खाद्यपदार्थांचे दर ८.०४ टक्के, तर शहरी भागात दर ७.०४ टक्क्यांनी वाढले आहेत. आठशे औषधांच्या किमती वाढल्या आहेत. 

रिझर्व बँकेने किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा चार टक्के ठेवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे; मात्र गेल्या दोन महिन्यात दुधाच्या किमती, खाद्यपदार्थांच्या किमती या सगळ्यांवर इंधन दरवाढीचा परिणाम जाणवला आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई निर्देशांकामधील  वाढ ‘एवढी वाईट नाही’ असे सांगून महागाईची झळ सोसणे असह्य बनलेल्या नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातही भावनिक मुद्द्यांना हात घातला; परंतु महागाईसारख्या जिव्हाळ्याच्या विषयात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार काय करणार, याबद्दल ते बोलले नाहीत. महागाईचा वणवा पेटलेला असताना सरकारने रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या दरात अवघी आठ रुपये वाढ करून, त्यांची चेष्टा केली आहे.rahibhide@gmail.com

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टॅग्स :Inflationमहागाई