शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लिंबाचे सरबत द्यावे, तर तेवढीही ऐपत उरली नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 05:34 IST

देशातल्या अनेक राज्यांमध्ये तेल, साबण, कपडे धुण्याची पावडर, साखर, चहा यांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. लोकांनी हात आखडता घ्यायला सुरुवात केली आहे.

राही भिडे

देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. केंद्र आणि राज्य सरकारे महागाईची जबाबदारी एकमेकांवर ढकलून मोकळे होत आहेत. महागाई, बेरोजगारी या जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांऐवजी भावनिक प्रश्नांमध्येच त्यांना अधिक स्वारस्य दिसून येत आहे. देश कोरोनातून सावरत नाही तोच रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले हे युद्ध थांबायला तयार नाही.  जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. आयात-निर्यातीचे चक्र बिघडले आहे. त्याचा जगातील बहुतांश राष्ट्रांना फटका बसला आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला असून भारतही त्याला अपवाद नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार मोठा असल्याने श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तानसारखी आपली स्थिती झालेली नाही. परंतु तरीही रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेच्या बाहेर महागाई गेली आहे.

केंद्र सरकार महागाईची जबाबदारी राज्यांवर ढकलून मोकळे होत असताना, मर्यादित अधिकार असलेली राज्ये आपला कराचा बोजा कमी करायला तयार नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसात महागाईचा आलेख सातत्याने उंचावतो आहे. गृहोपयोगी वस्तू, खाद्यान्न, भाजीपाला, वाहने, घरबांधणी साहित्य... अशा बहुतांश वस्तूंच्या किमती वाढत आहेत. उन्हाळ्यात पाहुण्यांना साधे लिंबू सरबतही देता येत नाही, अशी स्थिती आहे. महागाईचे भांडवल करून सत्तेवर आलेले भाजपचे नेते आता त्यावर बोलायला तयार नाहीत. संकटकाळात थोडा तरी पैसा आपल्या हातात राहावा, या विचाराने सध्या ग्राहक आपल्या गरजा कमी करताना दिसत आहेत. परिणामस्वरूप दररोज लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये तेल, साबण, कपडे धुण्याची पावडर, साखर, चहा यांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. याबाबत ‘रिटेल इंटेलिजन्स ’ या संस्थेच्या अहवालामधून, वाढत्या महागाईमुळे लोकांनी खरेदी कमी केली असल्याचे समोर आले आहे. अहवालातून प्राप्त आकडेवारीनुसार दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या मागणीमध्ये ५.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. वाढत्या महागाईमुळे ग्राहक रोजच्या वस्तूंचीदेखील खरेदी टाळू लागले आहेत. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई ६.०७ टक्के होती. ती मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांवर पोहोचली. या अहवालानुसार दक्षिण भारतात परिस्थिती आणखी चिंताजनक असून तिथल्या ग्राहकांच्या खरेदीमध्ये १८.३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

या अहवालानुसार  ओडिशामध्ये गृहोपयोगी वस्तूंच्या मागणीमध्ये तब्बल ३२.४ टक्क्यांची घट झाली आहे. ओडिशानंतर आंध्र प्रदेशमध्ये २८.५ टक्के, तेलंगणा २५.५ टक्के, झारखंडमध्ये १९.१ टक्के, कर्नाटकमध्ये १८.५ टक्के, महाराष्ट्रात ९.३ टक्के आणि केरळमध्ये ३.१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाईत आणखी भर पडली आहे. खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतींमुळे किरकोळ महागाईचा दर आवाक्यात येणे तर दूरच; पण आता हा दर चिंताजनक स्थितीवर जाऊन पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.०७ टक्के होता. आता हा दर ६.९५ झाला आहे.  ग्रामीण भागात  खाद्यपदार्थांचे दर ८.०४ टक्के, तर शहरी भागात दर ७.०४ टक्क्यांनी वाढले आहेत. आठशे औषधांच्या किमती वाढल्या आहेत. 

रिझर्व बँकेने किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा चार टक्के ठेवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे; मात्र गेल्या दोन महिन्यात दुधाच्या किमती, खाद्यपदार्थांच्या किमती या सगळ्यांवर इंधन दरवाढीचा परिणाम जाणवला आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई निर्देशांकामधील  वाढ ‘एवढी वाईट नाही’ असे सांगून महागाईची झळ सोसणे असह्य बनलेल्या नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातही भावनिक मुद्द्यांना हात घातला; परंतु महागाईसारख्या जिव्हाळ्याच्या विषयात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार काय करणार, याबद्दल ते बोलले नाहीत. महागाईचा वणवा पेटलेला असताना सरकारने रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या दरात अवघी आठ रुपये वाढ करून, त्यांची चेष्टा केली आहे.rahibhide@gmail.com

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टॅग्स :Inflationमहागाई