शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महिला आयोगावर सवंग टीका नको! फक्त ती समजून उमजून करावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 06:22 IST

तर आता कथित आरोपांकडे वळू यात. पहिला आरोप काय, तर प्रशांत परिचारक, राम कदम यांच्याविरुद्ध आयोगाने काहीच कारवाई केलेली नाही.

विजया रहाटकर

महाराष्ट्र राज्य महिला आयोग नक्की काय करतो? त्याचे अधिकार (आणि मयार्दाही) काय? नियम काय? कामकाजाची पद्धत काय आहे? बहुतेक जण अनभिज्ञ असतील किंवा त्यांना पुरेशी माहिती नसेल. हे सगळे लिहिण्याची गरज निर्माण झाली, कारण परळीमधील विधानसभा निवडणुकीतील उमेदवार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाने. या विधानाची आयोग स्वत:हून दखल घेईल, अशी प्रतिक्रिया मी दिल्यानंतर बहुतेकांनी त्याचे स्वागतच केले. मात्र, सामाजिक माध्यमांवर काही जणांच्या प्रतिक्रिया टोकाच्या म्हणजे टीका करणाऱ्या होत्या. ‘धनंजय मुंडेवर कारवाई करणार; पण मग प्रशांत परिचारक, राम कदम यांच्यावर का कारवाई केली नाही?’, ‘आयोग फक्त सेलिब्रिटी महिलांच्या प्रकरणीच सक्रिय होतो’, ‘आयोगाने सामान्य महिलांसाठी काय केले?’ अशा आरोपवजा प्रतिक्रिया. काही मूठभरांनीच आयोगावर असे आरोप केले आहेत.

मतमतांतरे म्हणून त्याकडे कानाडोळा करणे हा एक उपाय असू शकतो, पण जेव्हा आरोप खोडसाळपणाचे, अतिरंजित आणि एका संवैधानिक संस्थेची विनातथ्य बदनामी करणारे असतात, तेव्हा त्याची दखल घेणे आवश्यक ठरते. म्हणून आयोगाबद्दल थोडी माहिती आणि थोडे स्पष्टीकरण देण्याचा हा हेतू. आयोग ही १९९३च्या एका विशेष कायद्याने स्थापन झालेली संवैधानिक, स्वायत्त संस्था आहे. ती राज्य सरकारचा भाग असली, तरी ती शासनाचे खाते किंवा विभाग नाही. थेट शासनाचा दैनंदिन हस्तक्षेप अथवा नियंत्रण नसते. ती स्वायत्त आहे, यासाठी की तिला अर्धन्यायिक अधिकार आहेत. म्हणजे आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना एका मर्यादित अर्थाने न्यायाधीशांसारखे काही अधिकार आहेत. आयोग शपथेवर साक्ष नोंदवू शकतो, नोटीस बजावू शकतो, कोणत्याही कागदपत्रांची मागणी करू शकतो, गुन्हा नोंदवित नसल्यास अथवा तपास व्यवस्थित होत नसेल, तर पोलिसांना योग्य ते निर्देश देऊ शकतो, महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमू शकतो. असे काही महत्त्वपूर्ण अधिकार; पण तेवढेच. शिक्षा ठोठावण्याचा व तत्सम फौजदारी अधिकार आयोगाला नाहीत. फार तर तो राज्य सरकारला शिफारशी करू शकतो. मात्र, त्या शिफारशी अजिबात बंधनकारक नसतात. ही मोठी उणीव आहे, पण ती वस्तुस्थिती आहे, हे समजून घेणे अतिआवश्यक आहे.

Image result for ram kadam

तर आता कथित आरोपांकडे वळू यात. पहिला आरोप काय, तर प्रशांत परिचारक, राम कदम यांच्याविरुद्ध आयोगाने काहीच कारवाई केलेली नाही. तद्दन खोटा दावा. वीर जवानांच्या पत्नींविरुद्ध अतिशय हिणकस वक्तव्य करणारे परिचारक असोत किंवा मुलींना पळविण्यासंदर्भात असंवेदनशील वक्तव्य करणारे राम कदम असोत, आयोगाने आपल्या अधिकारांच्या मर्यादित राहून वेळीच कारवाई केलेली आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही प्रकरणांत स्वत:हून दखल घेतलेली होती. त्या दोघांनाही नोटीस बजावली, त्यांची साक्ष नोंदवून घेतली. त्या दोघांनीही आयोगामार्फत महिलांची विनाअट माफी मागितली. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये विनाअट माफी मान्य करण्याचे निर्देश दिलेले आहेत. याशिवाय या दोघांविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हे दाखल झालेले होतेच. म्हणजे त्यांच्यावर फौजदारी कारवाईदेखील सुरू होती/आहे. कोणत्याही प्रकरणांत इथे आयोगाची भूमिका संपते. जर पोलीस गुन्हा नोंदवित नसतील किंवा तपास नीट करत नसतील, तरच आयोग हस्तक्षेप करू शकतो. आयोग हा काही पोलीस किंवा न्यायालय नाही, हे इथे समजून घेणे आवश्यक आहे.दुसरा आरोप असा की, आयोग फक्त सेलिब्रिटीजबाबतच सक्रिय असतो आणि सामान्य महिलांकडे दुर्लक्ष केले जाते. ही धारणासुद्धा केवळ माहितीअभावीच असू शकते. सेलिब्रिटीजची प्रकरणे ‘ब्रेकिंग न्यूज’ असल्याने माध्यमांचा त्यात रस असतो. त्यामुळे ती त्याला ठळकपणे दाखवितात. म्हणून कदाचित आयोग त्यांच्याच प्रकरणांमध्ये रस घेतो, असे वाटू शकते, पण वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. आयोगाकडे दरवर्षी सरासरी साडेचार हजार प्रकरणे दाखल होतात आणि त्यातील जवळपास साडेतीन हजारांच्या आसपास निकालीदेखील काढली जातात.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राजकीय बांधिलकीचा. आयोगाचे अध्यक्ष आणि बहुतेक सदस्य राजकीय क्षेत्रातील असले, तरी गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वच राजकीय पार्श्वभूमीच्या अध्यक्षांनी आयोगाच्या कामाला अराजकीय ठेवलेय. राजकारणाच्या पलीकडे जाण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. त्यामुळे राजकारणाचे जोडे बाहेर ठेवलेलेच बरे. मग आयोगाचे नेमके काम काय? कायदे व योजनांबाबत महिलांमध्ये जागृती, महिलांविषयक प्रश्नांचा अभ्यास करून सरकारला शिफारशी करणे, कौटुंबिक समस्यांवर सामोपचाराने मार्ग काढणे आणि महिलांच्या सन्मानाला बाधा येत असेल, तिथे त्यांच्या बाजूने उभे राहणे. एका मर्यादित अर्थाने आयोग न्यायसंस्था आहे. न्यायालयांवर आपण सवंगपणे टीका करीत नसतो. न्यायालयीन टीकेबाबत जशी संवेदनशीलता दाखवितो, तशीच काळजी आयोगाबाबत घ्यावी, एवढेच म्हणणे आहे. आयोगावर जरूर टीका व्हावी; फक्त ती समजून उमजून करावी, एवढीच माफक अपेक्षा आहे.

(लेखिका महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत)

टॅग्स :Womenमहिला