शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

पुस्तके छापली, तरी विकत कोण घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 05:44 IST

समाजाचे चलनवलन सुरळीत चालू असेल, तरच पुस्तक-व्यवहार नीट चालतो. सध्या या व्यवसायावर कोरोनाच्या दहशतीचे मळभ दाटून आलेले आहे.

राम जगताप, संपादक, ‘अक्षरनामा ’

कोरोनाने गेल्या एक-दीड वर्षांपासून जगभर हाहाकार माजवला आहे. या ‘अभूतपूर्व ’ संकटाच्या परिणामातून. मराठी प्रकाशन व्यवसायही सुटलेला नाही. जवळपास वर्षभर हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प म्हणावा, अशा स्थितीला आलेला आहे.

या काळात मराठी पुस्तकांची विक्री ५० टक्क्यांहूनही कमी झाली. दिवाळी अंकांच्या विक्रीवर तर जवळपास ७५ टक्के परिणाम झाला. या अंकांची खरेदी-विक्री, त्यांचे वाचन आणि त्यावरील चर्चा महाराष्ट्रात जवळपास मार्च-एप्रिलपर्यंत चालू राहतात. यावेळी मात्र त्या जानेवारी पर्यंतही जाऊ शकल्या नाहीत. मराठीतल्या नियतकालिकांवर मात्र २०-२५ टक्केच परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये नियतकालिकांची छपाई, वितरण ठप्प झाले, पण या काळात अनेक नियतकालिकांनी आपापल्या अंकांच्या पीडीएफ फाईल तयार करून, त्या आपल्या वर्गणीदारांना पाठविल्या. अर्थात, त्यांना मिळणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. ज्यांची विक्री पूर्णपणे स्टॉलवरच अवलंबून आहे, त्यांना मात्र लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. नियतकालिकांसाठीची सवलत योजना रद्द करणे, अंकांच्या प्रती पाठविण्यावर मर्यादा घालणे, असे प्रकार करून टपाल सेवेने नियतकालिकांच्या अडचणी अजूनच वाढवल्या आहेत.

पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय धडपणे कॉर्पोरेट नाही, धडपणे छोटा उद्योगही नाही, शिवाय तो अक्षरजुळणीकार, कागद विक्रेते, मुद्रणालये, बाइंडर, पुस्तके विक्रेते आणि वाचक अशा अनेक घटकांवर अवलंबून आहे. गेल्या वर्षी मार्च अखेरीस सुरू झालेले लॉकडाऊन जुलै महिन्यानंतर शिथिल झाले, तोवर प्रकाशन संस्थांची कार्यालये, नव्या पुस्तकांची छपाई, पुस्तक विक्रीही बंद होती. काही प्रमाणात ऑनलाईन पुस्तक विक्री झाली. जुलै नंतर टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू झाले. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात मराठीतल्या मोठ्या प्रकाशन संस्थांनी नव्या पुस्तकांची छपाई केली असली, तरी प्रमाण बरेच कमी होते. वर्तमानपत्रांनी रविवार पुरवण्यांची पाने कमी केल्याने पुस्तकांच्या पानांना कात्री लागली. पुस्तकांच्या जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा उपयोग, ऑनलाईन विक्री असे प्रयत्न झाले असले, तरी पुस्तकांच्या विक्रीला मोठा फटका बसला.

१ ते २५ नोव्हेंबर या काळात मराठीतल्या १० आघाडीच्या प्रकाशन संस्थांनी ‘वाचन जागर महोत्सव’ महाराष्ट्र पातळीवर सुरू केला. २५० पुस्तके २५ टक्के सवलतीत देण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे २६ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान पुन्हा हा महोत्सव त्याच पद्धतीने आयोजित करण्यात आला. पुस्तकांवर ३० टक्के सवलत देण्यात आली, पण तोवर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या बातम्या येऊ लागल्याने, या योजनेला तोटाच सहन करावा लागला. गेल्या दीडेक वर्षांत प्रत्यक्ष पुस्तक विक्रीला ५० टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला, पण ऑनलाईन विक्रीत मात्र एरवीपेक्षा या काळात २०-२५ टक्क्यांची वाढ झाली. ई-बुक्स काढलेल्या प्रकाशन संस्थांनाही १०-१५ टक्के फायदा झाला. शासनाच्या विविध पुस्तक खरेदी योजना आणि महाराष्ट्रभरातील ग्रंथालयाकडून होणारी पुस्तक खरेदी मात्र पूर्णपणे बंद आहे. या दोन्हींकडून जवळपास ३० टक्के पुस्तकांची खरेदी केली जाते. 

आपला व्यवसाय ज्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे, ते सगळेच घटक जेव्हा अडचणीत येतात आणि आपल्या ग्राहकांची आर्थिक पत खालावते, तेव्हा कुठल्याही व्यावसायिकाचा नाईलाज होतो. त्याला त्यावर मात करता येत नाही. कोरोनाच्या आपत्तीने सर्वांनाच ग्रासून टाकले आहे. प्रकाशन व्यवसाय हा बेभरवशाचाही व्यवसाय आहे. समाजाचे चलनवलन सुरळीत चालू असेल, तरच तो नीट चालतो. अस्थिर वातावरण निर्माण झाले की, प्राथमिकता बदलल्याचा फटका या व्यवसायाला बसतो. पुस्तकांचा ही ‘जीवनावश्यक’ गोष्टींमध्ये समावेश करायला हवा, अशी मागणी कितीही केली जात असली, तरी महाराष्ट्रामध्ये पुस्तके तितकीशी ‘नडीव’ गोष्टीमध्ये मोडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. - तरीही प्रकाशन व्यवसाय आणि नियतकालिकांपुढे जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला आहे, असे अजून तरी म्हणता येणार नाही. या कोरोना कहरावर आज ना उद्या मात करता येईल, या आशेवरच मराठी प्रकाशन व्यवसाय तग धरून आहे.Jagtap.ram@gmail.com

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या