शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

कला : स्वायत्त की...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 02:27 IST

ज्या साहित्यकृतीत वा कलाकृतीत राजकारण प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रगटत असते त्याच कलाकृती मोठ्या होतात व त्याचेच लेखक व कलावंत समाजमान्य होतात. चार्ली चॅप्लिन या विनोदी नटाला लाभलेली जगन्मान्यता आपल्याकडील विनोदी नटांना लाभली नाही.

साहित्य वा कला हा अभिव्यक्तीचा आविष्कार आहे आणि अभिव्यक्ती प्रभावी व्हायची असेल तर तीत समाजकारण व राजकारणाचे प्रतिबिंब असले पाहिजे; अन्यथा त्या कृती निर्जीव दागिन्यांसारख्या होतात, हे उद्गार आहेत न्या. धनंजय चंद्रचूड यांचे. आमच्यातील कर्मठ कलावाद्यांना ते आवडायचे नाहीत. त्यांना कला ही शुद्ध व राजकारणनिरपेक्षच हवी असते. राजकारणाने लोकजीवनाएवढेच व्यक्तीचे जीवन पूर्णपणे व्यापून टाकले असतानाही त्यांचा तो आग्रह कायम आहे. वॉल्टर बेजहॉट हा राज्यशास्त्रज्ञ म्हणाला, ‘राज्याचे समाजावरील व व्यक्तीवरील नियंत्रण पाळण्यापासून समाधीपर्यंत (फ्रॉम क्रॅडल टू ग्रेव्ह) चालणारे असते.’

दुसऱ्या एकाने त्याला छेद देत म्हटले, ‘गर्भवती महिलांची काळजी आणि मृत्यूनंतर द्यावयाचे कर पाहता हे नियंत्रण जन्माआधी सुरू होते व मृत्यूनंतरही कायम राहते.’ राजकारण असे सर्वव्यापी आहे एवढाच याचा अर्थ. ज्या साहित्यकृतीत वा कलाकृतीत राजकारण प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रगटत असते त्याच कलाकृती मोठ्या होतात व त्याचेच लेखक व कलावंत समाजमान्य होतात. चार्ली चॅप्लिन या विनोदी नटाला लाभलेली जगन्मान्यता आपल्याकडील विनोदी नटांना लाभली नाही यातून ही बाब स्पष्ट होते. चॅप्लिनच्या कलेतून प्रगटलेले सामाजिक व राजकीय चिंतन त्याला महानता देऊन गेले. दुर्दैवाने आम्ही जीवनाचे एवढ्या हवाबंद कप्प्यात विभाजन केले की त्यातल्या एका क्षेत्रात दुसºयाचा साधा प्रवेशही आम्हाला वर्ज्य वाटतो. रामायण व महाभारतासारखी महाकाव्ये नुसतीच धार्मिक नाहीत, ती राजकीयही आहेत.

तिकडे हेलन आॅफ ट्रॉयही असेच कला व राजकारण सांगत येणारे आहेत. हे करता यायला कलावंतामध्ये प्रचंड सामर्थ्य व अभिव्यक्तीची थोर जाण मात्र असावी लागते. अन्यथा कलाही प्रचारी होते आणि तिच्यातील राजकारणही बटबटीत होते. मराठीतील अनेक लेखकांची नावे अशी सांगता येतील. पण तो प्रमाद नको. समाजमनावर ज्याचा प्रभाव पडत नाही आणि ज्या विचारांना चालना देत नाहीत त्या निर्जीव कलाकृती कोणत्या कामाच्या? ‘तुझे आहे तुजपाशी’ किंवा पूर्वीची ‘किचकवधा’सारखी नाटके, रवींद्रनाथांचे काव्य या पातळीवरचे आहे. खरा प्रश्न, कलेतून प्रगटणाºया राजकीय भावाने तिच्या खºया स्वरूपावर मात करू नये व तिचे कलाकृती असणे स्वायत्त राखावे हा आहे.

राजकारण व समाजकारण हे कलेवर अशी मात करू लागले की कला प्रचारी होते. ज्या कविता क्रांतीला साथ देतात वा ती घडवितात त्यांचे मोठेपण निर्विवाद. पण ज्या निवडणुकीतील प्रचारात म्हटल्या जातात त्या तेवढ्याच बाजारू. मात्र हे तारतम्य तोपर्यंतच टिकते जोपर्यंत राजकारणातील सत्ताधारी माणसे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व जाणतात व जोपासतात. न्या. चंद्रचूड यांनी ज्या श्रेष्ठ कलाकृतींची नावे घेतली त्या सगळ्या अशा तारतम्याच्या काळातील आहेत. (काही श्रेष्ठ कलाकृती बंदीकाळातही क्रांतिगीताच्या स्वरूपात जन्माला येतात हेही येथे नोंदविले पाहिजे. मात्र त्यासाठी कलावंताचे मन कमालीचे निर्भय व सगळ्या परिणामांची जबाबदारी भोगायला सिद्धही असले पाहिजे.) राजकारण व त्यातील लोक जेव्हा हे तारतम्य गमावतात व कलावंतांवर आपली हुकमत गाजविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा केवळ कलावंतांची नव्हे, तर कलेचीही गळचेपी होते व ती समाजाची सांस्कृतिक हानी ठरते.

सारे हुकूमशाही देश व लोकशाहीच्या नावाने दडपशाही आणू पाहणारे राज्यकर्ते कलेची अशी गळचेपी करतात. त्यांना अनुकूल अशाच कलाकृती निर्माण व्हाव्यात अशी व्यवस्था करतात. भारतात इंग्रज सरकारने किती पुस्तकांवर, कवितांवर व नाट्यपदांवर बंदी घातली होती हे येथे आठवायचे. तात्पर्य, साहित्य वा कला आणि राजकारण यांच्यातील संबंध सलोख्याचे असताना त्यांनी परस्परांचे क्षेत्र स्वायत्त व अस्पर्श राखले पाहिजे व त्यांचा आदर करण्याची वृत्ती बाळगली पाहिजे. सध्याचे जागतिक राजकारण त्याला फारसे अनुकूल नाही. मात्र हा काळ मागे पडेल व चांगले राजकारण व तेवढेच चांगले कलाक्षेत्र पुढे येईल अशी आशा आपण बाळगली पाहिजे.

टॅग्स :literatureसाहित्य