शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

अटक झाली खरी पण उशिराच!

By admin | Updated: December 23, 2016 23:51 IST

पापाचा घडा भरावा लागतो हेच खरे. मग तो महाभारतातील शिशुपाल असो, की नाशकातील माजी खासदार राष्ट्रवादीकार देवीदास

पापाचा घडा भरावा लागतो हेच खरे. मग तो महाभारतातील शिशुपाल असो, की नाशकातील माजी खासदार राष्ट्रवादीकार देवीदास पिंगळे असोत! कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकरी हितासाठी व त्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून अस्तित्वात आल्या असल्या तरी या मूळ हेतुलाच हरताळ फासून आपण नाशिकच्या समितीचे जणू तहहयात मालक आहोत अशा अविर्भावात देवीदास पिंगळे यांनी बेगुमान पद्धतीने तेथला कारभार चालविल्याच्या अनेक तक्रारी होत्या. विविध स्तरांवर चौकशाही सुरू होत्या; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील उच्चपदस्थांच्या मागे लपून आतापर्यंत प्रत्येक वेळी पिंगळे सहीसलामत बाहेर पडण्यात यशस्वी ठरले होते. कदाचित त्यामुळेच हुरूप वाढलेल्या पिंगळे यांनी शेतकऱ्यांच्या पाठोपाठ बाजार समितीमधील गरीब कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आणि तेथेच त्यांच्या पापाचा घडा भरला म्हणायचे. कारण या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे अखेर त्यांना अटक केली गेली आहे.सहकार क्षेत्रातील लुटमारीची उदाहरणे कमी नाहीत. संचालक म्हणून ज्यांच्या हाती या संस्था सोपविल्या जातात त्यांनी विश्वस्त म्हणून काम पाहाणे अपेक्षित असते. परंतु तेच या संस्थांचा गळा घोटायला निघतात आणि यंत्रणांवर दबाव आणून स्वत:चा बचाव करून घेतात त्यामुळे सहकार क्षेत्र बदनाम होत असते. यात ठिकठिकाणी काही मान्यवरांची मातब्बरी सर्वज्ञात असून, त्यात नाशिकच्या देवीदास पिंगळे यांचेही नाव घेता येणारे आहे. विधान परिषदेची आमदारकी व त्यापाठोपाठ खासदारकी भूषविलेले पिंगळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाशिक सहकारी साखर कारखाना व नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या नाशिक जिल्ह्याच्या सहकारातील आघाडीच्या संस्थांमध्ये सत्ताधारी राहिले. पण त्यांच्या कार्यकाळात यापैकी कोणतीही सहकारी संस्था वादातीत राहू शकली नाही. संस्था आणि पिंगळेदेखील नेहमी कोणत्या ना कोणत्या चौकशांना सामोरे जात राहिले. यातील जिल्हा बँकेत गेल्या वेळी अवघ्या एका मताने त्यांना पराभव स्वीकारून बाहेर व्हावे लागले तर ‘नासाका’ म्हणजे नाशिक सहकारी साखर कारखाना तोट्यामुळे मोडीत निघाला. आता एकमेव बाजार समिती त्यांच्या हाती उरली असून, तेथे सुमारे पंधरा वर्षांपासून त्यांची सत्ता आहे. परंतु तेथील एककल्ली कारभाराबद्दल होणाऱ्या अनेकविध आरोपांनी पिंगळे यांची पाठ सोडलेली नसून तेथीलच एका नव्या प्रकरणामुळे अखेर त्यांना ‘आत’ जाण्याची वेळ आली आहे.नाशिक बाजार समितीच्या तीन कर्मचाऱ्यांकडून जी ५७ लाखांची बेहिशेबी रोकड प्राप्त करण्यात आली, ती पिंगळे यांना देण्यासाठीच नेली जात होती, याचे पुरावे उपलब्ध झाल्याने त्यांना अटक केली गेली. परंतु सदर घटना सुमारे दोन महिन्यांपूर्वीची आहे. याचबरोबर बाजार समितीमधील काही कर्मचाऱ्यांच्या बोनस व भविष्यनिर्वाह निधीचे पैसेही परस्पर बँकेतून काढले गेल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणणे आहे. हा प्रकार दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले गेले. यावरून पिंगळेंच्या अटकेला विलंब झाल्याचेच म्हणता यावे.विशेष म्हणजे, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अगोदरच माजी खासदार समीर भुजबळ ‘आत’ गेलेले असताना आता पिंगळे यांच्यावरही तीच वेळ आली. भुजबळ व पिंगळे हे दोघे नाशिकचे माजी खासदार. शिवाय एकाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. त्यामुळे त्यांच्या अटकेची बाब केवळ नाशिकलाच बट्टा लावणारी नसून त्यांच्या पक्षालाही कमीपणा आणून देणारी आहे. परंतु तरी हा पक्ष मूग गिळून गप्प राहिला तर आश्चर्य वाटू नये, कारण अशांच्या पाठराखणीत या पक्षाचेच मोठे योगदान आहे. आजवर अशा कोणत्याही नेत्यास दटावण्याचे सोडा, साधा जाब विचारण्याचे धारिष्ट्यही हा पक्ष दाखवू शकलेला नसल्याने आता वेगळी अपेक्षाही करता येणारी नाही.- किरण अग्रवाल