शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

सेना-भाजपामधील बेबनाव : ‘यांना’ कोण शिकविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 05:51 IST

‘आमची युती होणारच’ हे शहा या भाजपाच्या पराभूत सेनापतीचे म्हणणे आणि ‘त्यांच्या आशावादाला आमच्या शुभेच्छा आहेत’ असे सेनेने त्यांना हिणवणे ही उपेक्षेची परिणती आहे.

भाजपाच्या तीन राज्यांतील पराभवांनी त्या पक्षाच्या नेतृत्वातील राष्टÑीय लोकशाही आघाडीचे टवके उडवायला सुरुवात केली आहे. त्या पक्षाची आताची स्थिती पाहून, हे पक्ष त्याकडे लोकसभेच्या जास्तीच्या जागा तरी मागत आहेत किंवा आपले वेगळेपण अधोरेखित करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. शिवसेनेचा यासंबंधीचा पवित्रा जुना आहे आणि भाजपावर टीका करण्याची एकही संधी तो पक्ष कधी सोडत नाही. त्याने महाराष्ट्रात निर्माण केलेले चित्र असे की, सेना ‘स्वबळावर’ पुढे धावत आहे आणि भाजपा हा त्याचा मोठा मित्रपक्ष लाचारासारखा ‘तरीही आम्ही मित्रच,’ असे म्हणत त्याच्यामागे रखडताना दिसत आहे.‘आमची युती होणारच,’ हे शहा या भाजपाच्या पराभूत सेनापतीचे म्हणणे आणि ‘त्यांच्या आशावादाला आमच्या शुभेच्छा आहेत,’ असे सेनेने त्यांना हिणवणेही या उपेक्षेची परिणती आहे. युती एकदाची होईलही, परंतु तोपर्यंत आपले ‘स्वतंत्र’ असणे, कटुता घेऊनही सेना सांगत राहील, असे वाटायला लावणारा हा प्रकार आहे. मुळात १८ खासदार असलेल्या सेनेला मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात एक बिना वजनाचे पद दिले. महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारनेही उष्टावलेल्या पत्रावळी भिरकाव्या, तशी अतिशय कमी महत्त्वाची पदे त्या पक्षाला राज्यात दिली. त्यामुळे २०१४ पासून सुरू झालेला सेनेचा रोष समोरच्या निवडणुका दिसू लागताच, आता अधिक तीव्र झाला आहे. झालेच तर परवाच्या पराभवांनी भाजपालाही मित्र जोडून ठेवण्याची गरज लक्षात आणून दिली आहे. नेमक्या याच वेळी लोकजनशक्ती या रामविलास पासवानांच्या बारक्या पक्षाने आपल्याही मागण्यांचे निशाण उंचावून भाजपाला हात दाखवायला सुरुवात केली आहे. १९७७ पासून कोणत्या ना कोणत्या पक्षातर्फे वा आघाडीतर्फे मंत्रिपद मिळविण्यात यशस्वी झालेल्या पासवानांना त्या पदावाचून राहता येत नाही. त्यासाठी त्यांनी त्यांच्या लोहियावादाचा बळीही कधीचाच दिला आहे. लोकसभेच्या येत्या निवडणुकीत भाजपाचे नेते जनता दल (यु.)च्या नितीशकुमारांना जास्तीच्या जागा देतील व आपला भाव कमी करतील, या भयाने त्यांनीही आपला खासदार चिरंजीवासह व आमदार भावासह अमित शहा यांना भेटून, आपला खुंटा मजबूत करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.जाणकारांच्या मते, उपेंद्र कुशवाहा यांनी त्यांचा लोकसमता पक्ष जसा रालोआपासून दूर नेला व लालू प्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली, तशाच प्रयत्नांना हे पासवानही आता लागले आहेत. जहाज बुडायला लागले की, त्यातले उंदीर आधी पळापळ करतात, असे म्हणतात. रालोआत ही पळापळ कधीचीच सुरू झाली आहे. तिने चंद्राबाबू नायडू गमावले. के. चंद्रशेखरराव गमावले आणि कर्नाटक व पंजाबातले बारके मित्र गमावले. या काळात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला पक्षांचे दोन-दोन डझन नेते उपस्थित राहत असल्याचेही देशाने पाहिले़ राहुल गांधींच्या सभा मोठ्या होत आहेत. त्यांच्या भाषणांना वजन येत आहे आणि प्रत्यक्ष रायबरेलीत मोदींनी घेतलेल्या जाहीर सभेकडे लोक फिरकलेही नाहीत, अशी छायाचित्रे वृत्तपत्रांनी प्रकाशित केली आहेत. मोदी बोलतात, शाहही बोलतात, पण जेटलींची वाचा गेली आहे, रविशंकर वेडसरांसारखे आज्ञार्थक बोलतात, पण त्यांना लोकप्रियता नाही. सुषमा स्वराज किंवा इराणी यांच्यावर न बोलण्याचे बंधन असावे, असे वाटावे, अशी त्यांची अबोल अवस्था आहे.अडवाणी, जोशी बेपत्ता आहेत (किंवा त्यांना पडद्याआड लोटले आहे) आणि रालोआचा कोणताही नेता परवाच्या भाजपाच्या पराभवाविषयी साधी सहानुभूती व्यक्त करतानाही दिसला नाही. आश्चर्य याचे की, संघ परिवारलाही त्याविषयी साधी ‘चुक्चुक्’ कराविशी वाटली नाही. मोदींचा प्रभाव कमी झाला असला, तरी त्यांचा भाव अजून शिल्लक आहे. शहांना तो पूर्वीही नव्हता आणि आजही नाही. ही स्थिती हातचे सोडून पळते सोबत ठेवायला सांगणारी आहे, पण भाजपा किंवा मोदी यातून काही शिकणार नाहीत. ते स्वत:ला जगद्गुरू समजतात. अशी माणसे कशापासूनही काही शिकणार नाहीत. कारण साऱ्या ज्ञानाचे गठ्ठे त्यांच्याजवळ कधीचेच जमा झाले आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा