शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सेना, आलेपाक अन् सीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:17 IST

स्वित्झर्लंडसारख्या निसर्गसंपन्न देशातील डावोस येथे भरलेल्या वैश्विक आर्थिक परिषदेला हजेरी लावून आलेले सीएम आज भलतेच प्रफुल्लित दिसत होते. अलीकडच्या काळात घडलेल्या काही सामाजिक व राजकीय घटनांमुळे काळवंडलेल्या चेह-यावर आज प्रसन्नता दिसत होती. स्वित्झर्लंडचे शुद्ध हवा-पाणी (अन् बर्फही!) चांगलेच मानवल्याचे जाणवत होते.

- नंदकिशोर पाटील स्वित्झर्लंडसारख्या निसर्गसंपन्न देशातील डावोस येथे भरलेल्या वैश्विक आर्थिक परिषदेला हजेरी लावून आलेले सीएम आज भलतेच प्रफुल्लित दिसत होते. अलीकडच्या काळात घडलेल्या काही सामाजिक व राजकीय घटनांमुळे काळवंडलेल्या चेह-यावर आज प्रसन्नता दिसत होती. स्वित्झर्लंडचे शुद्ध हवा-पाणी (अन् बर्फही!) चांगलेच मानवल्याचे जाणवत होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या जागतिक परिषदेला हजेरी लावण्याचा मान मिळाल्यानंतर कोण सुखावणार नाही? शिवाय, भाजपशासित अठरा राज्यातील मुख्यमंत्र्यांमधून फक्त महाराष्ट्राचा नंबर लागला असेल, तर ती मोठीच अ‍ॅचिव्हमेन्ट! मनोमन ते मोदीजींचे लाख लाख आभार मानत असले पाहिजेत. मंत्रिमंडळातील सहकाºयांचा जेवढा भरोसा आहे, त्याहून कैक पटीने मोदीजींचा आपल्यावर विश्वास आहे, ही बाबही दिलासादायक आहे म्हणा. डावोसमध्ये फक्त महाराष्ट्राचा एकमेव स्टॉल लागलेला होता. जगभरातील उद्योगपतींनी या स्टॉलला भेट दिली अन् महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा बोलून दाखवली. राज्यात आता कोट्यवधीची गुंतवणूक येणार, हजारो बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आणि त्यातून राज्याचा जीडीपी उंचावणार, या कल्पनेत सीएम अक्षरश: हरखून गेले होते. आज साहेबांचा मूड चांगला दिसतोय, हे हेरून एका स्वीय सहाय्यकाने एक पार्सल त्यांच्या पुढ्यात आणून ठेवले. न बोलता खुणेनंच सीएमनी विचारलं, ‘काय आहे हे?’ स्वीय सहाय्यक कानाजवळ जात पुटपटले, ‘मातोश्रीवरून आलंय!’कपाळावर आठ्या आणत साहेबांनी ते पार्सल फोडायला सांगितलं. उघडून बघतो तर काय, आलेपाकाच्या वड्या, शारंगधर काढा अन् स्ट्रेपसीलच्या गोळ्या, अन् एक चिठ्ठी!सीएमनी चिठ्ठी वाचायला घेतली.प्रिय मुख्यमंत्री,जय महाराष्ट्र!आपल्यापर्यंत वार्ता आलीच असेल की, आपण डावोसला असताना इकडे आमच्या मावळ्यांचा राष्ट्रीय मेळावा झाला. होय, राष्ट्रीयच तो! आता आम्हीही अ.भा. (अर्थात, अखिल भारतीय) होऊ घातलो आहोत आणि त्याचकरिता आम्ही स्वबळाची गर्जना ठोकली आहे. यापुढे आम्हांस्नी कुणाच्या कुबड्यांची गरज नाही. जगदंबेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच. कमळाबाईसोबत संसार थाटून आम्ही आमच्याच पायावर दगड मारून घेतला, हे बारामतीकरांचे म्हणणे आम्हांस पटले आहे. गेली साडेतीन वर्षे रडतखडत आपला संसार सुरू आहे. अधूनमधून कुरबुरी होतात...भांड्याला भांडे लागते. केवळ आपल्या हसºया चेहºयाकडे बघत आम्ही आलेला दिवस ढकलत आहोत. पण मुलंही आता मोठी झालीत. त्यांना ‘शत प्रतिशत’ मालकीचं घर हवंय. कधीतरी वेगळं व्हायचंच होतं. मग म्हटंल, आताच मुर्हूत काढून ठेवू या. ऐनवेळी धावपळ नको. कमळाबाईचा काही भरोसा नाही. तसा व्यक्तिश: आमचा तुमच्यावर राग नाही. पण ते गुजरातचे ‘शहा’वल्ली कधी आक्रमण करतील, याचा नेम नाही. लोभ आहेच. कायम राहावा.जय महाराष्ट्र!ता.क.-डोवोसच्या बर्फामुळं आपला घसा बसल्याचे कळते. सोबत आलेपाक पाठवला आहे. सकाळ-संध्याकाळ तोंडात ठेवत जा!

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार