शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

उसाखालील क्षेत्र कमी करता येईल, पण पर्याय काय देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 00:31 IST

साखरेचे दर मात्र बाजारातील मागणी-पुरवठ्यावर ठरतात. पुरवठा कमी असेल तर ते वाढतात, जादा असेल तर कमी होतात.

- चंद्रकांत कित्तुरेदेशातील साखर उद्योग आणि ऊस उत्पादक सध्या सरकारच्या ‘हॉटलिस्ट’वर आहेत. सरकारी मदतीशिवाय हा उद्योग सुरू राहू शकत नाही, असा एक समज वाढीस लागला आहे. याला कारणेही तशीच आहेत. दरवर्षी साखर कारखान्यांना या ना त्या स्वरूपात पॅकेज अथवा अर्थसाहाय्य करावेच लागते. याचाच अर्थ हा उद्योग स्वावलंबी नाही. कारण, उसाचा दर ठरविणे साखर कारखान्यांच्या हातात नाही तसेच साखरेचे दर ठरविणेही त्यांच्या हातात नाही. उसाचा किमान दर अर्थात एफआरपी केंद्र सरकार ठरवून देते. ही एफआरपी १४ दिवसांच्या आत ऊस उत्पादकांना दिलीच पाहिजे, असे कायदा सांगतो. याचवेळी साखरेचे दर मात्र बाजारातील मागणी-पुरवठ्यावर ठरतात. पुरवठा कमी असेल तर ते वाढतात, जादा असेल तर कमी होतात.

गेल्या चार वर्षांपासून देश अतिरिक्त साखर उत्पादनाला सामोरा जात आहे. यामुळे दर घसरून साखर उद्योग उद्ध्वस्त होतोय, असे वाटू लागल्यानंतर केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर ठरवून देण्यास सुरुवात केली, तसेच साखरेच्या बफर स्टॉकसह विविध उपाययोजना केल्या, तरी अजूनही हा उद्योग समस्यांच्या गर्तेतून बाहेर पडलेला नाही. चालू हंगामात साखरेचे उत्पादन २६५ लाख टन झाले आहे. देशाची मागणी २६० लाख टन असल्याने गरजेपेक्षा थोडे जास्त साखर उत्पादन आहे. याचवेळी गेल्यावर्षीच्या शिल्लक साखरेचा यात समावेश केला, तर येत्या आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामावेळी १२० लाख टन साखर शिल्लक असणार आहे. त्यातच यंदा ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने येत्या हंगामात साखरेचे उत्पादन ३०५ लाख टनांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. सरकारी अंदाज २९० लाख टनाचा आहे. म्हणजेच पुढील वर्षीही अतिरिक्त साखरेचा प्रश्न कायम राहणार आहे. याची तीव्रता कमी करण्यासाठी इथेनॉल निर्मितीकडे ऊस वळविण्यास केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. मात्र, त्यालाही मर्यादा आहेत. कारण इथेनॉलच्या दराबाबतच्या धोरणात सातत्य राहील याची खात्री या साखर कारखान्यांना नाही. एफआरपीत जशी दरवर्षी वाढ होते, तशी इथेनॉलच्या दरातही दरवाढ करण्याची हमी सरकारने दिली, तर ब्राझीलप्रमाणे देशातही मोठ्या प्रमाणात साखर कारखाने इथेनॉल निर्मितीकडे वळतील. बाजाराच्या गरजेनुसार साखर उत्पादनही करतील. यासाठी सरकारने धोरणात सातत्य ठेवले पाहिजे, पण तसे होण्याची चिन्हे दिसत नाहीत. याउलट नीती आयोगाने केंद्र सरकारला साखरेचा बफर स्टॉक करण्याची योजना रद्द करण्याची, ऊस लागवडीखालील क्षेत्र कमी करण्याची शिफारस केली आहे. देशातील ऊस उत्पादनात १९८०, ९० व २००० या दशकात सरासरी दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. कमी श्रमात जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाकडे वळला आहे.आजघडीला देशातील ५ कोटी कुटुंबे ऊस आणि साखर उद्योगावर अवलंबून आहेत. याचवेळी सर्वाधिक पाणी लागणारे पीक म्हणून ऊस कुप्रसिद्ध आहे. प्रतिहेक्टर सरासरी १९६.७८ लाख लीटर पाणी उसाला लागते. एवढ्या पाण्यात तेलबिया किंवा डाळवर्गीय पिके घ्यायची झाली, तर ३१ लाख हेक्टर क्षेत्रावर ती निघू शकतात, असा अहवाल सुनील केंद्रेकर यांनी दिला होता. मराठवाड्यात उसाखालील क्षेत्र कमी करण्याची मागणी यासाठीच होत असते. आता नीती आयोगानेही तशीच शिफारस केल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. उसासाठी पाण्याचा बेसुमार वापर होऊन भूजल पातळी घटते व पाण्याची कमतरता भासते. असे कारण यासाठी दिले जात आहे. काहीअंशी हे खरे असले तरी ऊस पीक हे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे. अन्य कोणत्याच शेतमालाला खात्रीचा दर मिळत नाही. त्यामुळे उसाखालील क्षेत्र कमी करायचे झाल्यास शेतकऱ्यांना कोणता पर्याय देणार? उसाएवढे उत्पन्न दुसºया कोणत्या पिकांपासून खात्रीने मिळू शकेल, हे शेतकºयांना कसे पटवून देणार? सरकारची यासाठी कसोटी लागू शकते. दुसºया बाजूला १०० टक्के ठिबक सिंचनाचा वापर करून ऊस पीक घेण्याचा पर्यायही आहे. यातून पाण्याची बचत होऊ शकते, पण हे शेतकºयांना पटवून कसे देणार? ठिबक सिंचनासाठी भांडवल कोण देणार? हे प्रश्नही आहेत. यामुळे सरकारने नीती आयोगाची शिफारस स्वीकारायचे ठरविले, तर त्यासाठी ठोस पर्याय देणे गरजेचे आहे. सध्याची देशातील परिस्थिती पाहता सरकार यावर लगेच निर्णय घेईल असे वाटत नाही, पण आज ना उद्या यासंदर्भात विचार करावाच लागेल.
साखर कारखान्यांकडून महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे सरकारने कारखान्यांना अर्थसाहाय्य केले, शेतकºयांना मदत केली तर काय बिघडते? असे मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे साखर उद्योगाचे धोरण आर्थिक तसेच राजकीय हित डोळ्यासमोर ठेवूनच घेतले जाते. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी उसाची एफआरपी टनाला १०० रुपयांनी वाढविली आहे. साखरेच्या विक्री दरातही दोन रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आहे. तो मंजूर होईलच, पण हे पुरेसे नाही. कारण साखरेचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपये आहे. त्यामुळे ३५०० ते ३७०० रुपये दर मिळावा यासाठी कारखानदार आग्रही आहेत. साखर उद्योग टिकवायचा असेल, तर विक्री दरही किफायतशीर असला पाहिजे, अन्यथा उसाला ठोस पर्याय दिला पाहिजे.(वृत्तसंपादक, लोकमत, कोल्हापूर)