शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जनतेपेक्षा मंत्री मोठे आहेत काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 12:19 IST

धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्याने न्यायासाठी मंत्रालयासमोर आत्महत्या केली. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. सर्वसामान्य शेतकरी, माणूस न्यायासाठी मेला तरी चालेल, पण आमचे सरकार टिकले पाहिजे, अशी धारणा झालेल्या लोकांना आपण कुणाच्या जिवावर निवडून आलो आहोत, याची जाणीव सत्तेत बसल्यावर येत नसावी. त्यामुळेच त्यांना त्यांच्या प्रचारात अडचण ठरणाऱ्या लोकांना ते पोलीस बळाचा वापर करून स्थानबद्ध करतात. प्रसंगी बळजबरीने अटकाव करतात. लोकशाहीमध्ये जनता हीच सार्वभौम असते, याचे त्यांना भान राहत नाही. जनतेपेक्षा मंत्री मोठे आहेत काय? हे कधीतरी शहाण्या माणसांनी त्यांना विचारावे. थेट विचारता येत नसेल, तर मतपेटीतून तरी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अन्यथा लोकशाही हुकूमशाहीची जागा कधी घेईल याचा थांगपत्ताही लागणार नाही.

- धनाजी कांबळे

आपला देश लोकशाहीप्रधान आहे. लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकरवी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही, असे नागरिकशास्त्रात शिकवले जाते. मात्र, प्रत्यक्षात लोकशाही व्यवहारात कुठेच दिसत नसल्याने केवळ एका मताचा अधिकार म्हणजेच लोकशाही वाटावी, अशी सध्याची परिस्थिती देशात आणि राज्यातही आहे. सत्ता आपल्या हातात आहे, म्हणजे कोणालाही आपण नियंत्रित करू शकतो, असा एक फाजील विश्वास सत्ताधाऱ्यांमध्ये आलेला दिसतो. तो आताच्या भाजप सरकारमध्ये जसा आहे, तसाच तो काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या सत्ताधाऱ्यांमध्ये होता. लोकशाहीमध्ये मताला लाखमोलाची किंमत आहे. याचा अर्थ माणसाला असामान्य महत्त्व आहे. तरी देखील जेव्हा सत्तेची धुंदी लोकांच्या डोक्यात जाते, तेव्हा ते सर्वसामान्य जनतेला गुलामाप्रमाणे वागवायला देखील मागेपुढे पाहत नाहीत, हे अतिशय घातक आणि गंभीर आहे. 

निवडणुका जाहीर झाल्यावर आज जे मिजास करतात, ते सरपटत मते मागण्यासाठी जिथे नीट मोटरसायकल जाऊ शकत नाही, तिथे चारचाकी घेऊन येतात. कधी कधी पायातले पायतान हातात घेऊन मतदाराच्या दारात पोचतात. ‘आम्ही अमूक करू, तमूक करू,’ अशी नेहमीची आश्वासने देऊन मते पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय लोकांची घाई असते. प्रत्यक्षात जेव्हा निवडून येतात, तेव्हा ते पाच वर्षांत त्या भागात फिरकत देखील नाहीत, ही वस्तुस्थिती सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. प्रत्येक वेळी नेत्यांच्या दौऱ्यासाठी आंदोलकांना ताब्यात घेऊन अथवा स्थानबद्ध करून पोलिस बळाचा वापर केला जातो. नेत्यांच्या दौऱ्यात अडथळा येऊ नये, त्यांना कोणी काळे झेंडे दाखवू नयेत, म्हणून प्रशासनाला वेठीला धरून तशी तजवीज केली जाते. अशा वेळी आंदोलकांचा किंवा त्या पीडितांच्या न्याय्य मागण्यांचा विचारच केला जात नाही. केवळ नेत्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारी यंत्रणा घेते. ती सर्वसामान्य माणसांची घेत नाही, हेच या लोकशाही व्यवस्थेतील उघडं वास्तव आहे. हे चित्र बदलायचं असेल, तर नेते जसे महत्त्वाचे आहेत, तशीच सर्वसामान्य जनता देखील महत्त्वाची आहे. जनतेशिवाय नेते तयार होऊ शकत नाहीत. किंबहुना जनतेशिवाय ते मंत्री, आमदार, खासदार देखील होऊ शकत नाहीत, याचे भान नेत्यांना कधी येणार हा खरा प्रश्न आहे.

 कोणताही विकास करत असताना कोणी ना कोणी तरी त्यामुळे बाधित होतात, हे कुणीही नाकारणार नाही. मात्र, जे बाधित किंवा पीडित आहेत, त्यांचा प्रश्न समजून घेऊन तो सोडविण्याच्या दृष्टीने काय करावे लागेल, याचा विचार न करता, त्यांच्याशी संवादच होणार नाही, अशी व्यवस्था केली जाते. पीडितांना स्थानबद्ध केले जाते, अटक केले जाते. ही एकप्रकारची दडपशाही नव्हे तर दुसरे काय? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण असो, अथवा कोणत्या धरणप्रकल्पाचे उद्घाटन असो. किंवा कोणत्या नेत्याचा दौरा असो, अशा प्रत्येक वेळी सर्वसामान्य जनतेला स्थानबद्ध करून, नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आहे. वय झालेले असताना देखील सरकारने सरकारी योजनेत बाधित जमिनीचा मोबदला देताना अन्याय केला म्हणून मायबाप सरकारचे दार ठोठावले, तरी पदरी निराशाच येणार असेल, तर रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला कधी तरी समजणार आहे, का केवळ वेळ मारून नेणे आणि लढणाऱ्या माणसांना कोंडून ठेवून स्वत:चा दौरा फळाला आणणे एवढ्यातच सत्ताधारी धन्यता मानणार आहेत, हा खरा सवाल आहे.

महाराष्ट्राला एक प्रचंड मोठी परंपरा आहे. संविधानाने दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय जर मिळत नसेल, तर संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या हरएक माणसाला इथे न्याय मिळायलाच हवा. तसे होणार नसेल, तर ही इतके कोटी रुपये खर्च करून कामाला लावलेली सगळी यंत्रणा केवळ देखाव्यासाठी आहे का, हेही कधी तरी सरकारला विचारल्याशिवाय जनता राहणार नाही, हे सत्तेत बसलेल्या लोकांनी ध्यानात घ्यायला हवे. 

मुख्यमंत्री धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांच्या दौऱ्यात अडथळा येऊ नये, यासाठी दोंडाईचा पोलिसांनी मंत्रालयात विष प्राशन करुन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन सकाळपासून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. हा प्रकारच चुकीचा असल्याने ‘जोपर्यंत मंत्री पोलीस स्टेशनला येत नाही, तोपर्यंत जाणार नाही,’ अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली. त्यामुळे प्रशासनाची देखील तारांबळ उडाली. मात्र, असे प्रत्येक ठिकाणी घडेलच असे नाही. विखरण ता. शिंदखेडा येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई धर्मा पाटील आणि मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून  सकाळी सहा वाजल्यापासून विखरण येथून आणून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते. विशेषत:  नरेंद्र पाटील यांनी २४ डिसेंबर रोजीच दोंडाईचा पोलिसांना लेखी हमी दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात आपण कोणत्याही गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही. माझ्याकडून असे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही, असे त्यात म्हटले होते. तरीही त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर कारवाई करण्यात आली. आगामी काळात निवडणुका आहेत. त्या वेळी अनेक मंत्री याठिकाणी येतील. तेव्हा दरवेळी मला आणि माझ्या कुटुंबियांना अशापद्धतीने त्रास दिला जाईल का, असा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला असून, लेखी हमी दिल्यानंतरही कारवाई करणे म्हणजे जनतेवर विश्वास नसल्यासारखेच आहे, असेही म्हटले आहे. 

एकूणच लोकांना गृहीत धरून अथवा त्यांना नियंत्रित करून राज्य करता येत नाही. तर समोर आलेल्या आव्हानांचा अभ्यास करून योग्य मार्ग काढणे आणि संबंधित पीडितांना न्याय देण्याची भूमिका घेणे महत्त्वाचे असते. धर्मा पाटील यांच्या परिवाराला स्थानबद्ध करून सरकारने आपली मानसिकता दाखवून दिली असून, अशापद्धतीने सर्वसामान्य माणसांना नियंत्रित करणे ही लोकशाहीची चेष्ठा आहे, हे सत्ताधार्यांनी ध्यानात घ्यावे. अन्यथा लोकमान्य टिळकांनी जो सवाल तेव्हा केला होता, तोच पुन्हा विचारावा लागेल, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस