शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

चाप बसवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:04 IST

काही इस्पितळांकडून सुरू असलेल्या लुबाडणुकीची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून यावर चाप बसविण्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट लागू करण्याचा विचार शासन करीत असून हे पाऊल स्वागतार्ह आहे.

काही इस्पितळांकडून सुरू असलेल्या लुबाडणुकीची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून यावर चाप बसविण्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट लागू करण्याचा विचार शासन करीत असून हे पाऊल स्वागतार्ह आहे. तसे बघता हा कायदा यापूर्वीच लागू व्हायला हवा होता. परंतु उशिरा का होईना शासनाला ही बुद्धी सुचली ते फार चांगले झाले. अर्थात हा कायदा लागू करणे तेवढ सोपे नाही, कारण इंडियन मेडिकल असोसिएशन आणि खासगी डॉक्टरांचा त्याला तीव्र विरोध आहे. नागपुरात सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. सभागृहात हा मुद्दा चर्चेला आला होता. अनेक स्वयंसेवी संस्था रक्त विकत असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले तेव्हा अशा संस्थांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे शासनाकडून सांगण्यात आले. अलीकडच्या काळात आरोग्यसेवेचे फार मोठ्या प्रमाणात व्यावसायीकरण झाले असून काही इस्पितळे व्यवसायाच्या नावावर रुग्णांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत असल्याच्याही तक्रारी प्राप्त होत आहेत. शासनाच्या विविध आरोग्य योजनांनाही भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. गेल्या पंधरवड्यातच नागपुरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे एक प्रकरण उघडकीस आले होते. गरीब रुग्णांकरिता शासनातर्फे जीवनदायी आरोग्य योजना राबविली जाते. याअंतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी सुपरस्पेशालिटीमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये पळविण्याचा गोरखधंदा सुरू आहे. रुग्णांना योजनेच्या यादीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेले जाते. योजनेचा पैसा घेतला जातो शिवाय वेगवेगळ्या कारणावरुन रुग्णांची १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत फसवणूक केली जाते, अशी तक्रार आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्येही अशीच परिस्थिती आहे. गोरगरीब रुग्णांना कमी खर्चात आधुनिक औषधोपचार उपलब्ध व्हावेत म्हणून धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी २० टक्के खाटा राखून ठेवणे बंधनकारक केले आहे. असे असतानाही तेथे गरिबांना उपचार नाकारण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. मुळात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात पूर्वीसारखी विश्वासार्हता आता राहिली नाही. डॉक्टरांच्या नावाने लोक घाबरून जातात. खरे तर रुग्णालये ही माणसांना जगण्याचे बळ देणारी असली पाहिजेत. परंतु व्यावसायीकरणाच्या या युगात रुग्णालयांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांवर चाप बसविण्यासोबतच डॉक्टर-रुग्ण संबंध कसे सुधारतील याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर