शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन - नयनतारा सहगल यांना सन्मानाने बोलवायलाच हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 06:54 IST

मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत वादाची परंपरा असणे खूप दुर्दैवाची बाब आहे.

अरुण म्हात्रे मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत वादाची परंपरा असणे खूप दुर्दैवाची बाब आहे. संमेलनातील राजकीय सहभाग वाढला की ते संमेलन आयोजक असो वा सामान्य कुणाच्याही हातात राहत नाही. त्यामुळे संमेलनातील ‘साहित्य’ हा भाग बाजूला राहतो आणि राजकारण सुरू होते. अशा प्रकारांमुळे संमेलन दूर राहते आणि अन्य विषयांना फाटे फुटत जातात, या वादांमुळे साहित्यिक संमेलनापासून दूर जातात आणि निव्वळ राजकारण सुरू होते. ही बाब साहित्य क्षेत्राप्रमाणे महाराष्ट्रासाठीही अत्यंत दुर्दैवी आहे. या वादाच्या निमित्ताने साहित्य संमेलनातील अशा कुप्रथा बंद व्हायला हव्यात. कोणत्याही भाषेतील साहित्यिकाला केवळ अतिथी म्हणून आमंत्रित करावे अशा कृतींमधूनच वाद आणि संमेलन हे समीकरण बदलण्यास सुरुवात होईल.

साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाद या समीकरणामुळे जागतिक स्तरावर महाराष्ट्राची प्रतिमा अधिकाधिक खालावते आहे. उद्घाटक म्हणून येणाऱ्या नयनतारा सहगल यांचे येणे रद्द झाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी भाषणात लिहिलेली परिस्थिती महाराष्ट्रात असल्याचे परखड मत मांडले आहे, त्यामुळे पुन्हा महाराष्ट्राला कलंक लावला गेला आहे. हा सगळा प्रकार आयोजकांना टाळता आला असता, विदर्भासारख्या काहीशा मागासलेल्या, स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणाºया भागाला इंग्रजी साहित्यिकाची काहीच गरज नाहीय. त्यामुळे इंग्रजी भाषेतील साहित्यिक बोलाविण्यापेक्षा एखाद्या देशी भाषेतील, बोली भाषेतील साहित्यिकाला आमंत्रित करायला हवे होते. जेणेकरून, अशा मातीतील साहित्यिकाने विदर्भातील शेतकºयांच्या, तेथील मातीतील समस्या-प्रश्नांना वाचा फोडली असती. परंतु, मराठीच्या गौरवासाठी अन्य भाषा भगिनीला बोलवायचे हे चुकीचे आहे. याउलट, विदर्भाच्या मातीतील एखाद्या शेतकºयाला बोलावून साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले असते, तर ती सर्वांत गौरवास्पद बाब ठरली असती. या कृतीतून निश्चितच शेतकºयांना आपल्या पाठीशी कुणीतरी खंबीरपणे उभे आहे, याची जाणीव झाली असती.

सहगल या डाव्या विचारसरणीच्या आहेत, ही माहिती यापूर्वीच आयोजकांना होती. त्यामुळे त्यांना आमंत्रित केल्यानंतर त्या आपली परखड मते मांडणारच, याचा विचार आयोजकांनी आधीच करायला हवा होता. परंतु, आता दोन दिवसांवर संमेलन येऊन ठेपले असताना सहगल यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झालेला हा वाद साहित्यिकांनी वाढवू नये, यामुळे पुन्हा एकदा मराठीच्या मागासलेपणाची वृत्ती उघड्यावर पडते आहे. संमेलनाध्यक्षांच्या बिनविरोध निवडीमुळे महामंडळाने नवा आदर्श घालून दिला होता. परंतु, आयोजकांच्या या कृतीमुळे याचा विसर पडला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला संमेलन आयोजकांचे वागणे शोभेसे नाही, त्यामुळे आयोजकांनी नयनतारा सहगल यांना लेखी माफीनामा पाठवून सन्मानाने बोलावले पाहिजे. मात्र आता प्रश्न आणखी चिघळला आहे, त्यामुळे परत त्यांना बोलावणे, त्यांच्या विचारांचा विरोध करणारा वर्ग मोठा आहे आणि या एका प्रकारामुळे संपूर्ण संमेलन उधळू शकते. केवळ या विषयामुळे संपूर्ण संमेलनाला गालबोट लागू नये याची काळजी घेऊन आयोजकांनी सहगल यांची माफी मागण्यासाठी पुढाकार घ्यावा. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन