शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

आणखी एक संकल्प

By admin | Updated: August 15, 2014 01:37 IST

आजचा स्वातंत्र्यदिन हा एक वेगळा स्वातंत्र्यदिन आहे.

आजचा स्वातंत्र्यदिन हा एक वेगळा स्वातंत्र्यदिन आहे. देशाने ६६ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य स्वीकारताना नियतीशी जो करार केला होता, त्या कराराची काही अंशी का होईना, पण पूर्तता करण्याचा प्रयत्न आता ६६ वर्षांनंतर होताना दिसतो आहे. स्वातंत्र्य स्वीकारले तेव्हा देशात काँग्रेस हा सर्वमान्य, लोकप्रिय आणि जनतेच्या मनामनात रुजलेला पक्ष होता. आज तो सत्तेवर नसला, तरी त्याचे पूर्वीचे स्थान सरलेले आहे, असे मानायचे कारण नाही. उलट आता तो पक्ष सत्तेवरून शांतपणे आणि खळखळ न करता बाजूला झाला असेल, तर ते देशात लोकशाही रुजली असल्याचे लक्षण आहे. आता स्वातंत्र्याला इतकी वर्षे लोटल्यानंतर सत्ता आजवर विरोधी राहिलेल्या पक्षाकडे बहुमताने प्रथमच गेली आहे. हे देशातील राजकीय वातावरण परिपक्व होत चालले आहे, याचे लक्षण आहे. काँग्रेस पक्षाने आपली राजकीय परिपक्वता इतक्या वर्षांत सिद्ध केली आहे. आता पाळी आहे ती सत्तेवर बहुमताने आलेल्या पक्षाने ती सिद्ध करण्याची. भाजपाला जनतेने फक्त सत्तेचीच संधी दिली आहे, असे नाही तर त्याची आपली राजकीय परिपक्वता सिद्ध करण्याची संधी दिली आहे. या संधीचा फायदा हा पक्ष घेतो की ती वाया घालवतो, याकडे जनतेचे डोळ्यांत तेल घालून लक्ष असणार आहे. जनता एखाद्या पक्षाला सत्तेवर आणते, तेव्हा तिच्या निश्चित काही अपेक्षा असतात. दिल्लीत सत्तेवर आलेल्या आप पक्षाने जनतेच्या या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यानंतर जनतेने त्या पक्षाची काय अवस्था केली, ते सर्व जाणतातच. मोदी सरकारने निवडणूक सभांचे फड मारताना फार मोठी स्वप्ने दाखवली आहेत. पण, सत्तेचे १00 दिवस पुरे होण्याच्या आतच ही स्वप्ने धूसर होताना दिसली, तर लोकांच्या मनात हताशतेची भावना निर्माण होईल. त्यामुळे अशी भावना निर्माण होऊ नये यासाठी तरी मोदी सरकार यशस्वी व्हावे, असे वाटते. गेल्या ६६ वर्षांत देशात अनेक आमूलाग्र बदल झाले आहेत. देश एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. अनेक क्षेत्रांत देशाने स्वालंबन मिळवले आहे. जगात कुठेही नाही एवढा मोठा मध्यमवर्ग देशात निर्माण झाला आहे. त्याची क्रयशक्ती इतकी अचंबित करणारी आहे, की जगातल्या अनेक देशांना आज भारताशी व्यापार करावासा वाटत आहे. हे श्रेय नि:संशय आजवर सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या धोरणाचे आहे. भारत हा एक विविध धर्मी, विविध भाषी असा बहुविध देश आहे. त्याला एका सर्वसमावेशक राष्ट्रीयत्वात गुंफून ठेवण्याची अत्यंत अवघड कामगिरी पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री आदींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारांनी पार पाडली आहे. काँग्रेसची ही पूर्वपुण्याई हा त्याचा मोठा वारसा आहे व त्या वारशाच्या आधारेच त्याला पुन्हा सत्तेवर येता येणार आहे आणि अन्य सर्व पक्षांना या वारशाचाच संदर्भ घेत आपला कारभार करावा लागणार आहे. धर्मनिरपेक्षता, विचार स्वातंत्र्य, सर्वसमावेशकता या मूल्यांना सोडचिठ्ठी देऊ न कुणी कारभार करतो म्हटले, तर आता ते शक्य होणार नाही. त्यामुळेच मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या जातीय विषाणूंनी विद्वेषाची रोगराई फैलविण्याचा प्रयत्न केला तो फसला आहे. अर्थात, मोदी सरकारला आणखी कणखरपणा दाखवून ही जातीय विषवल्ली कायमची गाडून टाकावी लागणार आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने विकासाचा मोठा पल्ला गाठला असला, तरी अजून विकासाचे शिखर कोसो दूर आहे. तेथपर्यंत जाण्याचा मार्ग अजूनही खडतर आहे. आहे, त्या विकासावर समाधान मानणे म्हणजे अल्पसंतुष्ट राहणे आहे. देशातला बराच मोठा जनसमूह अजूनही साध्या जीवनावश्यक गोष्टींपासून वंचित आहे. समाजात मूळ धरून असलेल्या दुष्ट रूढी अजूनही तशाच आहेत, जातिभेदाचा कलंक कायम आहे. लोकांच्या मनाचा विकास झाल्याशिवाय देशाचा खरा विकास होत नाही. दरडोई उत्पन्न वाढले, विकास दर वाढला आणि श्रीमंत व मध्यम वर्गात वाढ झाली,तरी जोपर्यंत जातीयता, धर्मवाद, दुष्ट रूढी कायम आहेत, तोपर्यंत विकासाच्या या आर्थिक परिमाणांचा काहीही फायदा देशाला होणार नाही. त्यामुळे आजच्या स्वातंत्र्यदिनाचा संकल्प देशाच्या भौतिक विकासाबरोबरच आत्मिक विकास हा असला पाहिजे. माणसामाणसाच्या मनाचा विकास होत नाही तोपर्यंत हा आत्मिक विकास साधणार नाही. त्यामुळे आता आपली मनेही संपन्न करण्याचा संकल्प करू या...