शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

आणखी एक प्रयोग

By admin | Updated: October 27, 2016 04:41 IST

एखाद्या दुर्धर आजारावरील औषध शोधण्यासाठी देशात जेवढे प्रयोग केले गेले नसतील तेवढे प्रयोग एकट्या शिक्षण खात्यात आजवर देशात आणि महाराष्ट्रात केले गेले असतील

एखाद्या दुर्धर आजारावरील औषध शोधण्यासाठी देशात जेवढे प्रयोग केले गेले नसतील तेवढे प्रयोग एकट्या शिक्षण खात्यात आजवर देशात आणि महाराष्ट्रात केले गेले असतील पण प्रचलित शिक्षण पद्धतीमधील निरर्थकतेच्या व्याधीवर अजूनपर्यंत एकालाही अक्सीर इलाज सापडलेला नाही. प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक म्हणजे आठव्या इयत्तेपर्यंत परीक्षा न घेताच सर्वांना वरच्या वर्गात ‘ढकलत’ राहाण्याचा इतके दिवस सुरु असलेला प्रयोग म्हणे आता बंद करुन ही ढकलाढकली चौथ्या इयत्तेपर्यंतच सुरु राहाणार आहे. अर्थात यासंबंधीचा निर्णय संबंधित राज्य सरकारांनी घ्यावयाचा आहे आणि त्यांनी तसा तो घेतला तरी त्याची अंमलबजावणी दोन वर्षांनी सुरु करता येणार आहे. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात दाखल करण्याच्या पद्धतीला महाराष्ट्र सरकारचा म्हणे विरोध होता. यातही एक मोठा विरोधाभासच म्हणायचा. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत कसेही करुन विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत म्हणून फेर परीक्षा घेत राहाण्याचा व तसे करताना उच्च शिक्षणावरील ताण आणि फुगवटा वाढविण्याचा निर्णय ज्या सरकारने घेतला तेच सरकार निम्न श्रेणीतील इयत्तांसाठी परीक्षा घेत राहाण्याला म्हणजेच गुणवत्तेला प्राधान्य मिळावे असा आग्रह धरते यातील विरोधाभास लक्षणीयच म्हणायचा. तत्कालीन मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब (बीजी) खेर यांनी सातव्या इयत्तेर्पंतच्या अभ्यासक्रमातून इंग्रजीची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आणि काही पिढ्यांचे कायमचे नुकसान केले असा आरोप आजही केला जातो. याचा अर्थ महाराष्ट्रातील शिक्षण खात्यात दर दोन-पाच वर्षांनी जे नवनवे प्रयोग केले जातात त्यात विद्यार्थी आणि त्यांचे हित याकडे साफ दुर्लक्ष केले जाते व ही परंपरा इतकी जुनी आहे. नव्या प्रयोगानुसार विद्यार्थ्यांच्या पाचवीपासून ज्या परीक्षा सुरु केल्या जातील त्यातील विद्यार्थ्यांच्या किमान आवश्यक गुणवत्तेसाठी संबंधित घटकांना म्हणजेच शिक्षकांना म्हणे जबाबदार धरले जाणार आहे. राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी अलीकडेच एका जाहीर समारंभात बोलताना स्पष्टपणे सांगून टाकले की, देशात गरजेच्या तुलनेत जवळजवळ पन्नास टक्के शिक्षकांची कमतरता आहे. चांगले शिक्षक ही बाब तर दूरच राहिली. अशा स्थितीत कोणत्या गुणवत्तेची चर्चा केली जाते आहे? एकीकडे सरकार पुरस्कृत शिक्षणाची अशी परवड होत असताना इंग्रजी माध्यमांच्या आणि राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांच्या प्रगतीमध्ये आणि तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढच होताना दिसते आहे. त्यामुळेच अशा शाळांकडील पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढादेखील वाढताना दिसतो आहे. सरकारी शाळांमधील अभ्यासाच्या ओझ्याचा गवगवा करीत राहाणारे लोक खासगी शाळांमधील ओझ्याविषयी मौन बाळगून असतात. मुळात अभ्याचे ओझे यातच मोठा विरोधाभास आहे. मुळात शिक्षण हा विषय राज्यघटनेच्या सामाईक यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने देशभरात शिक्षणाचे समांगीकरण प्रस्थापित होऊ शकत नाही असा काही शिक्षणतज्ज्ञांचा अभिप्राय असून आता त्या दिशेने खरोखरीच विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.