शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

भाष्य - मूल दत्तक घेताना...

By admin | Updated: May 6, 2017 00:07 IST

दत्तक विधान हे फार पवित्र मानले जाते. ही प्रक्रिया संवेदनशील तेवढीच भावनिकही आहे. निपुत्रिक दाम्पत्यासाठी मूल दत्तक घेणे हा एक

दत्तक विधान हे फार पवित्र मानले जाते. ही प्रक्रिया संवेदनशील तेवढीच भावनिकही आहे. निपुत्रिक दाम्पत्यासाठी मूल दत्तक घेणे हा एक विधायक पर्याय असतो. याशिवाय अनेक पालक सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून स्वत:चे मूल असतानाही दुसरे मूल दत्तक घेतात. या देशातील प्रत्येक निराधार, अनौरस बाळाला कौटुंबिक जिव्हाळा आणि मातापित्यांचे प्रेम मिळवून देण्याच्या दृष्टीने दत्तक विधानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ऋणानुबंधांच्या या गाठी बांधण्यात केंद्रीय दत्तकविधान प्राधिकरण (कारा), दत्तक विधान क्षेत्रात कार्यरत संस्था आणि पालकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून कारातर्फे बदलण्यात येणारी नियमावली, संस्थांकडून त्याला होणारा विरोध आणि पालकांमधील साशंकतेमुळे ही प्रक्रिया थंडावल्याचे चित्र आहे. पूर्वी अनेक वर्षे थेट अनाथालयांमधूनच मूल दत्तक घेण्याची प्रथा होती. परंतु या पद्धतीत गैरव्यवहार प्रचंड वाढला होता. अनेक संस्था मूल दत्तक देण्याच्या बदल्यात पालकांकडून लाखो रुपये लुबाडत असल्याचे आरोप होऊ लागले होते. पालकांची संख्या जास्त आणि मुलं कमी यामुळे दत्तक प्रक्रियेला एकप्रकारे व्यापाराचे स्वरूप आले होते. यासंदर्भात काही गंभीर घटनाही उघडकीस आल्या होत्या. यावर अंकुश आणण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय अंतर्गत काराची स्थापना करण्यात आली. परिणामी कुठलीही संस्था आता परस्पर मूल दत्तक देऊ शकत नाही. परिस्थितीनुरूप हा निर्णय योग्यच होता. परंतु काराने जी नवी नियमावली आणली आहे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आतापर्यंत मूल दत्तक घेण्यास इच्छुक पालकांना मुलाची निवड करण्याचा अधिकार होता. मात्र त्यांचा हा अधिकार काढून घेण्यात आला आहे. यापुढे इच्छुक पालकाला फक्त एकच मूल दत्तक दिले जाईल. ते मूल स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा पर्याय त्यांच्याकडे असेल. अशा पद्धतीने तीन फेऱ्यात मूल देऊ केले जाईल आणि पालकांनी यापैकी एकही मूल स्वीकारले नाहीतर प्रतीक्षा यादीत त्यांचे नाव मागे टाकले जाईल. या मुलांकडे वस्तू म्हणून बघण्याची प्रवृत्त बंद होईल आणि वेगही वाढेल, अशी काराची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे संस्थांना मात्र ती अत्यंत किचकट असल्याचे वाटते आहे. अशाने पालक मूल दत्तक घेण्यास कचरतील अशी भीती त्यांना आहे. दत्तक मूल हा आपल्या कुटुंब व्यवस्थेशी संबंधित अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तसाच तो समाजातील निराधार, अनौरस मुलांना चांगले पालकत्व मिळवून देण्यासाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे यासंदर्भातील कुठलेही नियम करताना हे उद्दिष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. या प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवतानाच ती अधिक सुलभसहज कशी होईल याचाही विचार झाला पाहिजे.