शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भाष्य - मूल दत्तक घेताना...

By admin | Updated: May 6, 2017 00:07 IST

दत्तक विधान हे फार पवित्र मानले जाते. ही प्रक्रिया संवेदनशील तेवढीच भावनिकही आहे. निपुत्रिक दाम्पत्यासाठी मूल दत्तक घेणे हा एक

दत्तक विधान हे फार पवित्र मानले जाते. ही प्रक्रिया संवेदनशील तेवढीच भावनिकही आहे. निपुत्रिक दाम्पत्यासाठी मूल दत्तक घेणे हा एक विधायक पर्याय असतो. याशिवाय अनेक पालक सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून स्वत:चे मूल असतानाही दुसरे मूल दत्तक घेतात. या देशातील प्रत्येक निराधार, अनौरस बाळाला कौटुंबिक जिव्हाळा आणि मातापित्यांचे प्रेम मिळवून देण्याच्या दृष्टीने दत्तक विधानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ऋणानुबंधांच्या या गाठी बांधण्यात केंद्रीय दत्तकविधान प्राधिकरण (कारा), दत्तक विधान क्षेत्रात कार्यरत संस्था आणि पालकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून कारातर्फे बदलण्यात येणारी नियमावली, संस्थांकडून त्याला होणारा विरोध आणि पालकांमधील साशंकतेमुळे ही प्रक्रिया थंडावल्याचे चित्र आहे. पूर्वी अनेक वर्षे थेट अनाथालयांमधूनच मूल दत्तक घेण्याची प्रथा होती. परंतु या पद्धतीत गैरव्यवहार प्रचंड वाढला होता. अनेक संस्था मूल दत्तक देण्याच्या बदल्यात पालकांकडून लाखो रुपये लुबाडत असल्याचे आरोप होऊ लागले होते. पालकांची संख्या जास्त आणि मुलं कमी यामुळे दत्तक प्रक्रियेला एकप्रकारे व्यापाराचे स्वरूप आले होते. यासंदर्भात काही गंभीर घटनाही उघडकीस आल्या होत्या. यावर अंकुश आणण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय अंतर्गत काराची स्थापना करण्यात आली. परिणामी कुठलीही संस्था आता परस्पर मूल दत्तक देऊ शकत नाही. परिस्थितीनुरूप हा निर्णय योग्यच होता. परंतु काराने जी नवी नियमावली आणली आहे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आतापर्यंत मूल दत्तक घेण्यास इच्छुक पालकांना मुलाची निवड करण्याचा अधिकार होता. मात्र त्यांचा हा अधिकार काढून घेण्यात आला आहे. यापुढे इच्छुक पालकाला फक्त एकच मूल दत्तक दिले जाईल. ते मूल स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा पर्याय त्यांच्याकडे असेल. अशा पद्धतीने तीन फेऱ्यात मूल देऊ केले जाईल आणि पालकांनी यापैकी एकही मूल स्वीकारले नाहीतर प्रतीक्षा यादीत त्यांचे नाव मागे टाकले जाईल. या मुलांकडे वस्तू म्हणून बघण्याची प्रवृत्त बंद होईल आणि वेगही वाढेल, अशी काराची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे संस्थांना मात्र ती अत्यंत किचकट असल्याचे वाटते आहे. अशाने पालक मूल दत्तक घेण्यास कचरतील अशी भीती त्यांना आहे. दत्तक मूल हा आपल्या कुटुंब व्यवस्थेशी संबंधित अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तसाच तो समाजातील निराधार, अनौरस मुलांना चांगले पालकत्व मिळवून देण्यासाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे यासंदर्भातील कुठलेही नियम करताना हे उद्दिष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. या प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवतानाच ती अधिक सुलभसहज कशी होईल याचाही विचार झाला पाहिजे.