शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

भाष्य - वाचाळवीरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 00:53 IST

योगी आदित्यनाथ हे आजवर त्यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा विखारी वक्तव्यांमुळेच सर्वांना अधिक परिचित राहिले. आता मुख्यमंत्रिपदी

योगी आदित्यनाथ हे आजवर त्यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा विखारी वक्तव्यांमुळेच सर्वांना अधिक परिचित राहिले. आता मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यावर त्यांनी अत्यंत समजूतदारीची भाषा बोलणे सुरू केले आहे. अर्थात हे किती वरकरणी आहे आणि किती मनापासून ते पुढील काळात कळेलच. पण ते ज्या पक्षाचे नेते आहेत त्या भारतीय जनता पक्षातील काही उपटसुंभांनी मात्र समाजात विखार कायम राखण्याचा विडाच उचललेला दिसतोय. या पक्षाचे खटौली येथील आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्त्या करणाऱ्यांचे हातपाय तोडू अशी धमकी देऊन त्याची चुणूक दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे हे महाशय २०१३च्या मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी आहेत. वंदेमातरम् म्हणण्यास नकार देणारे, भारतमातेचा जयघोष करण्यास उत्सुक नसलेले आणि गाईला माता न मानता तिची हत्त्या करणाऱ्यांचे हातपाय तोडण्यास आम्ही वचनबद्ध आहोत आणि यासाठी आम्ही कार्यकर्त्यांची एक फळीच तयार केली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य या आमदाराने केले आहे. या चिथावणीखोर विधानाबद्दल त्यांचा पक्ष अथवा वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची कानउघडणी होण्याची आशा बाळगण्याचे काही कारण नाही. गेल्या काही वर्षातील भाजपाच्या कार्यशैलीचे हे एक वैशिष्ट्य राहिले आहे. या पक्षाकडे वाचाळवीरांची मोठी फौजच आहे. सुब्रमण्यम स्वामी, साक्षी महाराज, गिरीराज सिंह, साध्वी निरंजन ज्योती, साध्वी प्राची अशी कितीतरी नावे घेता येतील. बड्या नेत्यांनी सामंजस्याची भाषा करून लोकांना मोहीत करायचे आणि या वाचाळवीरांनी धाकधपटशा करीत पक्षाचा छुपा अजेंडा पुढे रेटायचा. गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रातील सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी असेच बेताल वक्तव्य करून आपल्या मुख्यमंत्र्यांनाच घरचा अहेर दिला होता. संकुचित अस्मिता उभ्या करून माणसामाणसात फूट पाडणे, मनमानीपणे समाजाला कोणत्याही दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे हे चांगल्या नेत्यांचे लक्षण नव्हे हे या वाचाळवीरांना कोण सांगणार? अभिनेता शाहरूख खानची पाकिस्तानी दहशतवादी हाफीज सईदशी तुलना करून त्याला पाकिस्तानात जाण्यास सांगणारे आदित्यनाथ तर हे करू शकणार नाहीत. अशात या वाचाळवीरांमुळे त्यांचे नव्या उत्तर प्रदेशचे स्वप्न भंग होऊ नये एवढेच !