शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

भाष्य - वाचाळवीरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 00:53 IST

योगी आदित्यनाथ हे आजवर त्यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा विखारी वक्तव्यांमुळेच सर्वांना अधिक परिचित राहिले. आता मुख्यमंत्रिपदी

योगी आदित्यनाथ हे आजवर त्यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा विखारी वक्तव्यांमुळेच सर्वांना अधिक परिचित राहिले. आता मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यावर त्यांनी अत्यंत समजूतदारीची भाषा बोलणे सुरू केले आहे. अर्थात हे किती वरकरणी आहे आणि किती मनापासून ते पुढील काळात कळेलच. पण ते ज्या पक्षाचे नेते आहेत त्या भारतीय जनता पक्षातील काही उपटसुंभांनी मात्र समाजात विखार कायम राखण्याचा विडाच उचललेला दिसतोय. या पक्षाचे खटौली येथील आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्त्या करणाऱ्यांचे हातपाय तोडू अशी धमकी देऊन त्याची चुणूक दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे हे महाशय २०१३च्या मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी आहेत. वंदेमातरम् म्हणण्यास नकार देणारे, भारतमातेचा जयघोष करण्यास उत्सुक नसलेले आणि गाईला माता न मानता तिची हत्त्या करणाऱ्यांचे हातपाय तोडण्यास आम्ही वचनबद्ध आहोत आणि यासाठी आम्ही कार्यकर्त्यांची एक फळीच तयार केली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य या आमदाराने केले आहे. या चिथावणीखोर विधानाबद्दल त्यांचा पक्ष अथवा वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची कानउघडणी होण्याची आशा बाळगण्याचे काही कारण नाही. गेल्या काही वर्षातील भाजपाच्या कार्यशैलीचे हे एक वैशिष्ट्य राहिले आहे. या पक्षाकडे वाचाळवीरांची मोठी फौजच आहे. सुब्रमण्यम स्वामी, साक्षी महाराज, गिरीराज सिंह, साध्वी निरंजन ज्योती, साध्वी प्राची अशी कितीतरी नावे घेता येतील. बड्या नेत्यांनी सामंजस्याची भाषा करून लोकांना मोहीत करायचे आणि या वाचाळवीरांनी धाकधपटशा करीत पक्षाचा छुपा अजेंडा पुढे रेटायचा. गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रातील सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी असेच बेताल वक्तव्य करून आपल्या मुख्यमंत्र्यांनाच घरचा अहेर दिला होता. संकुचित अस्मिता उभ्या करून माणसामाणसात फूट पाडणे, मनमानीपणे समाजाला कोणत्याही दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे हे चांगल्या नेत्यांचे लक्षण नव्हे हे या वाचाळवीरांना कोण सांगणार? अभिनेता शाहरूख खानची पाकिस्तानी दहशतवादी हाफीज सईदशी तुलना करून त्याला पाकिस्तानात जाण्यास सांगणारे आदित्यनाथ तर हे करू शकणार नाहीत. अशात या वाचाळवीरांमुळे त्यांचे नव्या उत्तर प्रदेशचे स्वप्न भंग होऊ नये एवढेच !