शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
2
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
3
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
4
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
5
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
6
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
7
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
8
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
9
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
10
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
11
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
12
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
13
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
14
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
15
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
16
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
17
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
18
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
19
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
20
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?

भाष्य - वाचाळवीरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 00:53 IST

योगी आदित्यनाथ हे आजवर त्यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा विखारी वक्तव्यांमुळेच सर्वांना अधिक परिचित राहिले. आता मुख्यमंत्रिपदी

योगी आदित्यनाथ हे आजवर त्यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा विखारी वक्तव्यांमुळेच सर्वांना अधिक परिचित राहिले. आता मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यावर त्यांनी अत्यंत समजूतदारीची भाषा बोलणे सुरू केले आहे. अर्थात हे किती वरकरणी आहे आणि किती मनापासून ते पुढील काळात कळेलच. पण ते ज्या पक्षाचे नेते आहेत त्या भारतीय जनता पक्षातील काही उपटसुंभांनी मात्र समाजात विखार कायम राखण्याचा विडाच उचललेला दिसतोय. या पक्षाचे खटौली येथील आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्त्या करणाऱ्यांचे हातपाय तोडू अशी धमकी देऊन त्याची चुणूक दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे हे महाशय २०१३च्या मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी आहेत. वंदेमातरम् म्हणण्यास नकार देणारे, भारतमातेचा जयघोष करण्यास उत्सुक नसलेले आणि गाईला माता न मानता तिची हत्त्या करणाऱ्यांचे हातपाय तोडण्यास आम्ही वचनबद्ध आहोत आणि यासाठी आम्ही कार्यकर्त्यांची एक फळीच तयार केली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य या आमदाराने केले आहे. या चिथावणीखोर विधानाबद्दल त्यांचा पक्ष अथवा वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची कानउघडणी होण्याची आशा बाळगण्याचे काही कारण नाही. गेल्या काही वर्षातील भाजपाच्या कार्यशैलीचे हे एक वैशिष्ट्य राहिले आहे. या पक्षाकडे वाचाळवीरांची मोठी फौजच आहे. सुब्रमण्यम स्वामी, साक्षी महाराज, गिरीराज सिंह, साध्वी निरंजन ज्योती, साध्वी प्राची अशी कितीतरी नावे घेता येतील. बड्या नेत्यांनी सामंजस्याची भाषा करून लोकांना मोहीत करायचे आणि या वाचाळवीरांनी धाकधपटशा करीत पक्षाचा छुपा अजेंडा पुढे रेटायचा. गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रातील सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी असेच बेताल वक्तव्य करून आपल्या मुख्यमंत्र्यांनाच घरचा अहेर दिला होता. संकुचित अस्मिता उभ्या करून माणसामाणसात फूट पाडणे, मनमानीपणे समाजाला कोणत्याही दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे हे चांगल्या नेत्यांचे लक्षण नव्हे हे या वाचाळवीरांना कोण सांगणार? अभिनेता शाहरूख खानची पाकिस्तानी दहशतवादी हाफीज सईदशी तुलना करून त्याला पाकिस्तानात जाण्यास सांगणारे आदित्यनाथ तर हे करू शकणार नाहीत. अशात या वाचाळवीरांमुळे त्यांचे नव्या उत्तर प्रदेशचे स्वप्न भंग होऊ नये एवढेच !