शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - वाचाळवीरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 00:53 IST

योगी आदित्यनाथ हे आजवर त्यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा विखारी वक्तव्यांमुळेच सर्वांना अधिक परिचित राहिले. आता मुख्यमंत्रिपदी

योगी आदित्यनाथ हे आजवर त्यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा विखारी वक्तव्यांमुळेच सर्वांना अधिक परिचित राहिले. आता मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यावर त्यांनी अत्यंत समजूतदारीची भाषा बोलणे सुरू केले आहे. अर्थात हे किती वरकरणी आहे आणि किती मनापासून ते पुढील काळात कळेलच. पण ते ज्या पक्षाचे नेते आहेत त्या भारतीय जनता पक्षातील काही उपटसुंभांनी मात्र समाजात विखार कायम राखण्याचा विडाच उचललेला दिसतोय. या पक्षाचे खटौली येथील आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्त्या करणाऱ्यांचे हातपाय तोडू अशी धमकी देऊन त्याची चुणूक दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे हे महाशय २०१३च्या मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी आहेत. वंदेमातरम् म्हणण्यास नकार देणारे, भारतमातेचा जयघोष करण्यास उत्सुक नसलेले आणि गाईला माता न मानता तिची हत्त्या करणाऱ्यांचे हातपाय तोडण्यास आम्ही वचनबद्ध आहोत आणि यासाठी आम्ही कार्यकर्त्यांची एक फळीच तयार केली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य या आमदाराने केले आहे. या चिथावणीखोर विधानाबद्दल त्यांचा पक्ष अथवा वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची कानउघडणी होण्याची आशा बाळगण्याचे काही कारण नाही. गेल्या काही वर्षातील भाजपाच्या कार्यशैलीचे हे एक वैशिष्ट्य राहिले आहे. या पक्षाकडे वाचाळवीरांची मोठी फौजच आहे. सुब्रमण्यम स्वामी, साक्षी महाराज, गिरीराज सिंह, साध्वी निरंजन ज्योती, साध्वी प्राची अशी कितीतरी नावे घेता येतील. बड्या नेत्यांनी सामंजस्याची भाषा करून लोकांना मोहीत करायचे आणि या वाचाळवीरांनी धाकधपटशा करीत पक्षाचा छुपा अजेंडा पुढे रेटायचा. गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रातील सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी असेच बेताल वक्तव्य करून आपल्या मुख्यमंत्र्यांनाच घरचा अहेर दिला होता. संकुचित अस्मिता उभ्या करून माणसामाणसात फूट पाडणे, मनमानीपणे समाजाला कोणत्याही दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे हे चांगल्या नेत्यांचे लक्षण नव्हे हे या वाचाळवीरांना कोण सांगणार? अभिनेता शाहरूख खानची पाकिस्तानी दहशतवादी हाफीज सईदशी तुलना करून त्याला पाकिस्तानात जाण्यास सांगणारे आदित्यनाथ तर हे करू शकणार नाहीत. अशात या वाचाळवीरांमुळे त्यांचे नव्या उत्तर प्रदेशचे स्वप्न भंग होऊ नये एवढेच !