शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

भाष्य - सदाभाऊंचा झाला चेंडू

By admin | Updated: July 3, 2017 00:08 IST

कृषी, पणन व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे महिनाभरापासून खूप चर्चेत आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी

कृषी, पणन व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे महिनाभरापासून खूप चर्चेत आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी खोत यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदविला आहे. शेट्टी हे दर दोन तीन दिवसांनी खोत यांच्यावर टीका करतात. त्याला खोत प्रत्युत्तर देतात, असा नवा खेळ सुरू झाला आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे खोत यांना जाब विचारण्यात येणार आहे. त्यासाठी समितीही स्थापली आहे. सदाभाऊंना बाजू मांडण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. मात्र दोघांची मने दुभंगली असल्याने आता सदाभाऊंची संघटनेतून गच्छंती होईल, असे बोलले जाते. वास्तविक सरकारमधील एक कार्यक्षम राज्यमंत्री म्हणून सदाभाऊ पुढे आले आहेत. राज्यमंत्री म्हणून विशेष कोणतेही अधिकार नसताना त्यांनी संत सावता माळी शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शिवार बैठका घेऊन सरकारला शेतकऱ्याच्या बांधावर नेले. तूर खरेदीचा प्रश्न चिघळल्यानंतर त्यांनी खरेदी केंद्रांवर जाऊन बैठका घेतल्या. सध्या ते राज्यात पेरणीबाबत कार्यक्रम घेत आहेत. त्यांनी दत्तक घेतलेल्या मिलिटरी अपशिंगे गावात विविध विकास योजना राबवित आहेत. अपशिंगेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांच्या या गावातील तरुण मोठ्या संख्येने सैन्यदलात आहेत. वास्तविक एखादा राज्यमंत्री एवढा कार्यक्षमपणे काम करत असताना त्याचे कौतुक होण्यापेक्षा ते मात्र टीकेचे धनी ठरत आहेत.शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपाची हाक दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुणतांबा येथे पाठविले व मुंबईत बैठक घेऊन संपावर तोडगा काढला. मात्र त्यातून संपात फूट पाडल्याचा खोत यांच्यावर आरोप झाला. त्यांना ‘व्हिलन’ ठरविण्यात आले. सोशल मीडियावर तर त्यांच्याविरुद्ध स्वपक्षीयांनीच मोठी मोहीम सुरू केली होती. शेतकरी संपाच्या वेळी सर्व कॅबिनेट मंत्री गप्प असताना खोत हे पुढे आले व त्यांनी शेतकऱ्यांशी सरकारने चर्चा करण्याची भूमिका मांडली. शेतकऱ्यांचा रोष त्यांनी अंगावर घेतला. नंतर सुकाणू समिती स्थापन झाली, कर्जमाफी जाहीर करण्यासाठी मंत्रिगट नेमण्यात आला. त्यात मात्र सदाभाऊंना कुठेही स्थान मिळाले नाही. कर्जमाफीच्या या प्रक्रियेत सदाभाऊ कुठे दिसलेच नाहीत. कदाचित शेतकरी नेत्यांचा रोष वाढू न देण्यासाठी ही खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली असावी. दुसरीकडे सदाभाऊंवर त्यांचा पक्ष भलताच नाराज झालेला आहे. आता पक्षातून त्यांची हकालपट्टी होणे जवळपास निश्चित झाले आहे. सदाभाऊ चहूबाजूंनी अडचणीत आले असताना मुख्यमंत्री तरी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.