शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - अघळपघळ पर्रीकर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 00:07 IST

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अघळपघळ बोलण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बरेचदा अडचणीत आले आहेत; मात्र

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अघळपघळ बोलण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बरेचदा अडचणीत आले आहेत; मात्र ते काही त्यापासून धडा घेण्यास तयार नाहीत, असे दिसते. पर्रीकर संरक्षण मंत्री असताना, गतवर्षी २९ सप्टेंबर रोजी भारताने पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते. दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीरमधील उरी येथील लष्करी छावणीवर हल्ला चढवून १९ भारतीय सैनिकांचे प्राण घेतले होते. त्याचा बदला म्हणून पाकिस्तानात घुसून बदला घेतल्याचे नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केले होते. पाकिस्तानने अर्थातच तो दावा नाकारला होता. आता जवळपास वर्षभरानंतर पर्रीकर यांनी त्या घटनेसंदर्भात जे भाष्य केले आहे, त्यामुळे मोदी सरकार आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाचीच एकप्रकारे कोंडी झाली आहे. गोव्यात उद्योगपतींच्या संमेलनास संबोधित करताना, पर्रीकर यांनी असे वक्तव्य केले, की त्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची तयारी १५ महिने आधीपासूनच सुरू होती. पर्रीकर यांचे हे वक्तव्य खरे असल्यास त्याचा दुसरा अर्थ हा होतो, की ‘सर्जिकल स्ट्राईक’ उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आले नव्हते. पर्रीकर तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर एका वृत्त वाहिनीवरील निवेदकाने माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना विचारलेल्या प्रश्नामुळे व्यथित होऊन आपण पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा निर्णय घेतला होता, असेही सांगून ते मोकळे झाले. देशाला युद्धाच्या खाईत ढकलू शकणारे निर्णय केवळ एका वृत्त निवेदकाच्या प्रश्नामुळे दुखावून घेतल्या जात असतील, तर या सरकारच्या हाती देश खरेच सुरक्षित आहे का, असा प्रश्न उद्या विरोधकांनी उपस्थित केल्यास, मोदी सरकार आणि भाजपाची चांगलीच पंचाईत होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गोष्टी या हाताचे त्या हाताला न कळू देता उरकून टाकायच्या असतात आणि उरकल्यानंतर त्याबाबत चुप्पी साधायची असते. दुर्दैवाने मोदी सरकार सत्तेत आल्यापासून या सामान्य व्यवहारज्ञानाची सातत्याने वानवा जाणवत आहे. मोदी सरकारमधील हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या प्रज्ञावंत मंत्र्यांमध्ये पर्रीकर यांचा समावेश होत असे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल विरोधकही शंका घेत नाहीत. असे असतानाही त्यांची पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्री पदावरून रवानगी होण्यामागे, त्यांचे अघळपघळ बोलणेच कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे; मात्र पर्रीकर यांनी त्यापासून काही धडा घेतला असावा, असे काही त्यांचे ताजे वक्तव्य बघता वाटत नाही.