शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

भाष्य - अघळपघळ पर्रीकर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 00:07 IST

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अघळपघळ बोलण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बरेचदा अडचणीत आले आहेत; मात्र

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अघळपघळ बोलण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बरेचदा अडचणीत आले आहेत; मात्र ते काही त्यापासून धडा घेण्यास तयार नाहीत, असे दिसते. पर्रीकर संरक्षण मंत्री असताना, गतवर्षी २९ सप्टेंबर रोजी भारताने पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते. दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीरमधील उरी येथील लष्करी छावणीवर हल्ला चढवून १९ भारतीय सैनिकांचे प्राण घेतले होते. त्याचा बदला म्हणून पाकिस्तानात घुसून बदला घेतल्याचे नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केले होते. पाकिस्तानने अर्थातच तो दावा नाकारला होता. आता जवळपास वर्षभरानंतर पर्रीकर यांनी त्या घटनेसंदर्भात जे भाष्य केले आहे, त्यामुळे मोदी सरकार आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाचीच एकप्रकारे कोंडी झाली आहे. गोव्यात उद्योगपतींच्या संमेलनास संबोधित करताना, पर्रीकर यांनी असे वक्तव्य केले, की त्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची तयारी १५ महिने आधीपासूनच सुरू होती. पर्रीकर यांचे हे वक्तव्य खरे असल्यास त्याचा दुसरा अर्थ हा होतो, की ‘सर्जिकल स्ट्राईक’ उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आले नव्हते. पर्रीकर तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर एका वृत्त वाहिनीवरील निवेदकाने माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना विचारलेल्या प्रश्नामुळे व्यथित होऊन आपण पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा निर्णय घेतला होता, असेही सांगून ते मोकळे झाले. देशाला युद्धाच्या खाईत ढकलू शकणारे निर्णय केवळ एका वृत्त निवेदकाच्या प्रश्नामुळे दुखावून घेतल्या जात असतील, तर या सरकारच्या हाती देश खरेच सुरक्षित आहे का, असा प्रश्न उद्या विरोधकांनी उपस्थित केल्यास, मोदी सरकार आणि भाजपाची चांगलीच पंचाईत होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गोष्टी या हाताचे त्या हाताला न कळू देता उरकून टाकायच्या असतात आणि उरकल्यानंतर त्याबाबत चुप्पी साधायची असते. दुर्दैवाने मोदी सरकार सत्तेत आल्यापासून या सामान्य व्यवहारज्ञानाची सातत्याने वानवा जाणवत आहे. मोदी सरकारमधील हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या प्रज्ञावंत मंत्र्यांमध्ये पर्रीकर यांचा समावेश होत असे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल विरोधकही शंका घेत नाहीत. असे असतानाही त्यांची पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्री पदावरून रवानगी होण्यामागे, त्यांचे अघळपघळ बोलणेच कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे; मात्र पर्रीकर यांनी त्यापासून काही धडा घेतला असावा, असे काही त्यांचे ताजे वक्तव्य बघता वाटत नाही.