शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

भाष्य - हवाई उपद्रवींनो सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:14 IST

हवाई प्रवास करणा-यांनी यापुढे फार सांभाळून वागायला हवे. विशेषत: ज्यांना विमान प्रवासात उपद्रव करण्याची खोड आहे त्यांनी. कारण यापुढे त्यांनी असा कुठलाही खोडसाळपणा केल्यास त्यांच्यावर विमानबंदी लादली जाऊ शकते.

हवाई प्रवास करणा-यांनी यापुढे फार सांभाळून वागायला हवे. विशेषत: ज्यांना विमान प्रवासात उपद्रव करण्याची खोड आहे त्यांनी. कारण यापुढे त्यांनी असा कुठलाही खोडसाळपणा केल्यास त्यांच्यावर विमानबंदी लादली जाऊ शकते. केंद्रीय नागरी उड्डयण मंत्रालयाने देशात प्रथमच यासंदर्भातील दिशानिर्देश जारी केले असून विमान प्रवासी आणि कर्मचा-यांच्या सुखरुप आणि आनंददायी प्रवासासाठी ते निश्चितच लाभदायी ठरतील अशी अपेक्षा आहे. एक काळ असा होता जेव्हा आकाशात उंच उडणारे विमान बघण्यातच अनेकांचे समाधान होत असे. परंतु आता मात्र परिस्थिती पार बदलली आहे. विमान प्रवासाचे कुणाला नावीन्य राहिलेले नाही. एखाद्या एसटी बसस्थानकावर प्रवाशांची जशी गर्दी असते तशीच ती विमानतळांवरही दिसू लागली आहे. हे चित्र दिसायला चांगले असले तरी यासोबतच विमान प्रवासातील अनागोंदीही प्रचंड वाढली आहे, हे सुद्धा तेवढच खरे. एवढी की विमानातही आता हाणामाºया, शिवीगाळ असले प्रकार घडायला लागले असून त्यावर नियंत्रणाची गरज भासू लागली आहे. उड्डयण मंत्रालयाने विमान प्रवासासाठी ही नियमावली तयार करण्यास विशेषत: दोन घटना कारणीभूत ठरल्या आहेत. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची एअर इंडियाच्या अधिकाºयांसोबतची वादावादी आणि त्यानंतरची मारहाण तसेच तेलगू देसमचे खासदार जे.सी. दिवाकर रेड्डी यांनी विशाखापट्टणम विमानतळावर केलेले तांडव आणि मग या दोघांविरुद्धही उगारण्यात आलेले विमानबंदीचे आयुध. खासदारांवरील बंदीचा हा मुद्दा संसदेतही गाजला आणि याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. पुढील काळात विमानप्रवासातील गोंधळ थांबविण्याच्या दृष्टीने ही नियमावली फायद्याची ठरणार आहे. या नो फ्लाय यादीत तीन प्रकारची वर्गवारी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे अतिविशिष्ट व्यक्तींनाही ती लागू असणार आहे. त्यामुळे या बंदीपासून मुक्त राहण्यासाठी सर्व विमानप्रवाशांनी काळजी घ्यायची आहे. अन्यथा त्यांचे हवाई प्रवासाचे स्वप्न हवेतच विरेल.

टॅग्स :Airportविमानतळ