शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

भाष्य - हवाई उपद्रवींनो सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:14 IST

हवाई प्रवास करणा-यांनी यापुढे फार सांभाळून वागायला हवे. विशेषत: ज्यांना विमान प्रवासात उपद्रव करण्याची खोड आहे त्यांनी. कारण यापुढे त्यांनी असा कुठलाही खोडसाळपणा केल्यास त्यांच्यावर विमानबंदी लादली जाऊ शकते.

हवाई प्रवास करणा-यांनी यापुढे फार सांभाळून वागायला हवे. विशेषत: ज्यांना विमान प्रवासात उपद्रव करण्याची खोड आहे त्यांनी. कारण यापुढे त्यांनी असा कुठलाही खोडसाळपणा केल्यास त्यांच्यावर विमानबंदी लादली जाऊ शकते. केंद्रीय नागरी उड्डयण मंत्रालयाने देशात प्रथमच यासंदर्भातील दिशानिर्देश जारी केले असून विमान प्रवासी आणि कर्मचा-यांच्या सुखरुप आणि आनंददायी प्रवासासाठी ते निश्चितच लाभदायी ठरतील अशी अपेक्षा आहे. एक काळ असा होता जेव्हा आकाशात उंच उडणारे विमान बघण्यातच अनेकांचे समाधान होत असे. परंतु आता मात्र परिस्थिती पार बदलली आहे. विमान प्रवासाचे कुणाला नावीन्य राहिलेले नाही. एखाद्या एसटी बसस्थानकावर प्रवाशांची जशी गर्दी असते तशीच ती विमानतळांवरही दिसू लागली आहे. हे चित्र दिसायला चांगले असले तरी यासोबतच विमान प्रवासातील अनागोंदीही प्रचंड वाढली आहे, हे सुद्धा तेवढच खरे. एवढी की विमानातही आता हाणामाºया, शिवीगाळ असले प्रकार घडायला लागले असून त्यावर नियंत्रणाची गरज भासू लागली आहे. उड्डयण मंत्रालयाने विमान प्रवासासाठी ही नियमावली तयार करण्यास विशेषत: दोन घटना कारणीभूत ठरल्या आहेत. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची एअर इंडियाच्या अधिकाºयांसोबतची वादावादी आणि त्यानंतरची मारहाण तसेच तेलगू देसमचे खासदार जे.सी. दिवाकर रेड्डी यांनी विशाखापट्टणम विमानतळावर केलेले तांडव आणि मग या दोघांविरुद्धही उगारण्यात आलेले विमानबंदीचे आयुध. खासदारांवरील बंदीचा हा मुद्दा संसदेतही गाजला आणि याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. पुढील काळात विमानप्रवासातील गोंधळ थांबविण्याच्या दृष्टीने ही नियमावली फायद्याची ठरणार आहे. या नो फ्लाय यादीत तीन प्रकारची वर्गवारी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे अतिविशिष्ट व्यक्तींनाही ती लागू असणार आहे. त्यामुळे या बंदीपासून मुक्त राहण्यासाठी सर्व विमानप्रवाशांनी काळजी घ्यायची आहे. अन्यथा त्यांचे हवाई प्रवासाचे स्वप्न हवेतच विरेल.

टॅग्स :Airportविमानतळ