शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - दंडेलीस सक्तमजुरी

By admin | Updated: January 9, 2017 00:27 IST

आमदारकीची रग दाखवून दंडेली करणारे कन्नडचे शिवसैनिक आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाने दोषी मानून चक्क वर्षभराची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावणे

आमदारकीची रग दाखवून दंडेली करणारे कन्नडचे शिवसैनिक आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाने दोषी मानून चक्क वर्षभराची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावणे आणि त्याच्या काहीच दिवस अगोदर अमरावतीच्या आमदारकीची बूज (की दंडेलीच?) राखली नाही म्हणून एका सनदी अधिकाऱ्याला विधिमंडळाने दंडित करणे यात नक्कीच काही तरी घोळ आहे. असे तर नाही ना, की सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा योग्य तो सन्मान राखावा, त्यांचा आदर राखावा, असा जो आदेश विद्यमान फडणवीस सरकारने जारी केला आहे, तो राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण असताना अस्तित्वात नव्हता? मुळात केवळ आपल्यासाठी कोणतीही वाहतूक रोखून धरून लोकाना वेठीस धरू नका असे विनविणारे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम कुठे आणि आपल्यासाठी आगमनापूर्वी तासन्तास वाहतूक रोखून धरली जाण्यात धन्यता मानणारे मंत्री-संत्री कुठे? हर्षवर्धन जाधव यांचा पारा चढला (ते साहजिकच कारण आधी मनसे व नंतर शिवसेना) तो अशाच कारणांसाठी. अर्थात हा प्रकार घडला तेव्हा ते मनसेचे आमदार होते व ती आमदारकीही त्यांनी तिरिमिरीत सोडली होती. मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक रोखून धरली असता जाधव यांनी आपले वाहन घुसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा एका पोलिसाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या पोलिसालाच चोपून काढले. अगदी असाच काहीसा प्रकार मुंबईच्या समुद्रावरील पुलावर झाला होता. पण तेव्हा मात्र विशेषाधिकाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सदर आमदार विधिमंडळात हजर राहण्यासाठी निघाले असता त्यांना अडवणे हा जर विशेषाधिकाराचा भंग असेल आणि एखाद्या सरकारी योजनेचा तपशील सरकारकडे पाठविण्यापूर्वी स्थानिक आमदाराचा अभिप्राय लक्षात न घेणे हादेखील विशेषाधिकाराचा भंग ठरत असेल तर मग लोकप्रतिनिधी या नात्याने हर्षवर्धन त्यांच्या जबाबदारीचे वहन करीत असताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी त्यांची वाट रोखून धरणे हादेखील विशेषाधिकाराचा भंग ठरावयास हवा होता. तसे झाले असते आणि आमदाराचा विशेषाधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ओळखला असता तर मग पुढे मारामारीचा वगैरे काही प्रश्नच आला नसता. परंतु जाधव यांचा विशेषाधिकार अमान्य झाला आणि त्यांना सक्तमजुरीला आता तोंड देणे भाग पडले आहे. वरिष्ठ न्यायालयात कदाचित ती माफदेखील होईल. पण प्रश्न तो नाही. मुळात आमदार-खासदार वा निर्वाचित लोकप्रतिनिधी यांचे विशेषाधिकार नेमके कोणते आणि कोणत्या परिस्थितीत त्यांचा भंग होतो याची सुस्पष्ट संहिता असावी यावर वर्षानुवर्षे चर्चा होत आली आहे. पण तसे करण्याची कोणाचीच तयारी नाही. पण आता एवीतेवी फडणवीस सरकारने लोकप्रतिनिधींचा सन्मान राखण्याविषयी फतवा जारी केलाच आहे (मुळात तो जारी करावा लागावा यातच लोकशाहीचा मोठा पराभव आहे) तर मग हा सन्मान कसा राखावा याचेही मार्गदर्शन केले गेले तर असे अनवस्था प्रसंग ओढवणारच नाहीत.