शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

भाष्य - ‘कॅशलेस’चे गुंते

By admin | Updated: January 10, 2017 00:28 IST

रोखीतील व्यवहार कमी करुन देशातील जनतेने ‘प्लॅस्टिक मनी’चा वा ‘नेट बँकींग’चा सढळ वापर कारावा आणि संपूर्ण देश ‘कॅशलेस’ व्हावा हा भले मोदी सरकारचा हेतू असला

 रोखीतील व्यवहार कमी करुन देशातील जनतेने ‘प्लॅस्टिक मनी’चा वा ‘नेट बँकींग’चा सढळ वापर कारावा आणि संपूर्ण देश ‘कॅशलेस’ व्हावा हा भले मोदी सरकारचा हेतू असला व तो पूर्णांशाने साध्य होऊ शकत नाही याची सरकारलाही पूर्ण जाणीव असली तरी जनतेने इच्छेने वा अनिच्छेने हा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने गेले दोन महिने पद्धतशीर प्रयत्नही केले आहेत. परंतु जनता आणि सरकारचा हेतू यांच्या दरम्यान बँका व विशेषत: खासगी बँका जी नाठाळपणाची भिंत उभी करु पाहात आहेत त्याबाबत सरकार हतबल असावे असे दिसते. आॅनलाईन पद्धतीने गॅस सिलींडरचे पैसे भरल्यास सरकार पाच रुपयांची सूट देणार तर बँका सहा ते सात रुपये आकारुन मोकळ्या होणार. तोच प्रकार पेट्रोल वा डिझेलचा. प्लॅस्टिक मनीचा वापर केल्यास सरकार शंभर रुपयांमागे ७५ पैशांची सवलत देणार तर खासगी बँका पंप चालकाकडून एक टक्का म्हणजे एक रुपयाचा अधिभार वसूल करणार. परिणामी पंप चालकांनी प्लॅस्टिक मनी स्वीकारणारच नाही अशी भूमिका घेतली तर त्यांचे चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. तूर्तास हे टळले असले तरी या खासगी बँका पुन्हा डोके वर काढणारच नाहीत असे नव्हे. तसे झाले की मग कॅशलेस सोसायटीचे काय होणार हे सांगण्याची गरज नाही. पुन्हा असे व्यवहार सध्या केवळ महानगरे, शहरे आणि काही निमशहरे यांच्यापुरतेच मर्र्यादित आहे. ग्रामीण भागापर्यंत तर याचे वारेही पोहोचलेले नाही. एटीएममधून मिळणाऱ्या रकमवेर (मिळालीच तर) अजूनही रेशनींग असताना एटीएमच्या विनाशुल्क मर्यादेहून अधिकच्या वापरावर आकारले जाणारे व मध्यंतरी स्थागित ठेवलेले शुल्क बँकांनी गुपचूप पुन्हा सुरुदेखील करुन टाकले आहे. पण रिझर्व्ह बँकेने त्याची दखल घेतलेली नाही. थोडक्यात रोकडरहित समाजासाठी आज जे काही पर्याय जनतेला उपलब्ध आहेत व ज्यांचा मर्यादित शहरांमध्ये का होईना मोठ्या प्रमाणावर वापर सुरु झाला आहे त्याच्यातच अडचणी येत असताना व काही बँका त्या जाणीवपूर्वक निर्माण करीत असताना येत्या अवघ्या चार वर्षात रोकडरहित व्यवहाराची आज प्रचलित असलेली सर्व साधने कालबाह्य ठरतील आणि केवळ बोटांच्या ठशांनी सारे व्यवहार सुरु होतील असा विश्वास निती आयोगाने व्यक्त केला आहे. सामान्यत: आजच्या जमान्यात समाज नीती-अनितीशी जसा फटकून वागतो तसाच हा निती आयोगदेखील समाजाशी फटकून वागत असावा असे दिसते. निवृत्ती वेतनधारकास वर्षातून एकदा सादर करावयाचे जीवित प्रमाणपत्र यंदाच्या वर्षापासून आॅनलाईन पद्धतीने जमा करण्याची पद्धत सुरु झाली आहे व त्यासाठी आधारभूत मानले जातात ते आधार कार्ड काढताना दिले गेलेले बोटांचे ठसे. पण वार्धक्य आणि श्रमाची कामे यामुळे ठशांवरही परिणाम होत असतो व त्यापायी अडचणी निर्माण होतात. या आणि अशा व्यावहारिक अडचणींचा विचार जर होणार नसेल तर कार्डलेस काय किंवा कॅशलेस काय, यांचे अस्तित्व केवळ तात्विक चर्चेपुरतेच मर्यादित राहील.