शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - अण्णा, थोडं थांबा !

By admin | Updated: March 31, 2017 00:13 IST

लोकपाल कायदा होऊनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान असून, लोकपालसाठी पुन्हा

लोकपाल कायदा होऊनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान असून, लोकपालसाठी पुन्हा आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. माझं मन मला सांगतंय, आंदोलन कर, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे सूतोवाच केले आहे. मोदी सरकार येऊन तीन वर्षे झाली तरी देशातील भ्रष्टाचार थांबलेला नाही, असंही निरीक्षण अण्णांनी नोंदविले आहे. आंदोलन करावं की नाही, हा सर्वस्वी अण्णांचा वैयक्तिक मामला आहे. अण्णांनी त्यांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून आंदोलन उभारलं तरी त्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण गेल्या तीन-चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. भ्रष्टचाराच्या विरोधात अण्णांनी आजवर मोठा लढा दिलेला आहे. २०११ साली दिल्लीत रामलीला मैदानावर ऐतिहासिक असे आंदोलन उभे केले. ज्याची दखल ‘टाइम’सारख्या जागतिक माध्यमांनी घेतली. अण्णांच्या या आंदोलनामागे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आणि ‘टीम अण्णा’च्या बॅनरखाली अरविंद केजरीवाल, किरण बेदी, योगेंद्र यादव, भूषण पितापुत्र आणि असंख्य ज्ञात-अज्ञातांचे पाठबळ होते. शिवाय, ‘मी अण्णा’ अशा टोप्या परिधान केलेला आणि कथित नागरी समाजाच्या नावाखाली उदयाला आलेला मेणबत्ती पंथही होता. ज्यांनी आजवर गांधी नावाच्या माणसाचा कमालीचा तिरस्कार केला, त्यांनीच अण्णांचा ‘दुसरे गांधी’ म्हणून उदोउदो केला. पण अण्णांच्या या जागरात सामील झालेल्या प्रत्येकाचे ईप्सित काही वेगळेच होते, हे कालांतराने सिद्ध झाले. केजरीवाल, बेदी, व्ही.के. सिंग आदिंनी आपापली राजकीय पोळी शेकून घेतली, तर भाजपादी पक्षांनी तत्कालीन संपुआ सरकारच्या विरोधात जनमत निर्माण करण्यासाठी अण्णांच्या आंदोलनात हवा भरली. अण्णा, रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेले असताना सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेले घाणाघाती भाषण अनेकांना आठवत असेल. देशातील प्रसारमाध्यमांनी तर अण्णांना अवतारी पुरुष बनवून टाकले होते. आज अण्णांनी पुन्हा आंदोलन उभारले तर, हे सगळे पुन्हा घडून येईल का? शंकाच आहे. कारण, तेव्हाचा मेणबत्ती पंथ आता मोदींचा भक्त बनलेला आहे. केजरीवाल, सिसोदिया, बेदी, सिंग आदिंनी राजकीय चूल मांडली असल्याने ते अण्णांच्यासोबत येण्याची शक्यता दिसत नाही. मीडिया अण्णांच्या मागे उभा राहील, याचीही शाश्वती देता येत नाही. शिवाय, मोदींच्या विरोधात ब्र ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत मोदीभक्त युवक तयार नाही.अण्णांनी मोदी सरकारवर वहीम ठेवलाच, तर लागलीच समाजमाध्यमातून त्यांच्या प्रतिमाहननाची मोहीम सुरू होईल. वेळप्रसंगी आंदोलनही उधळून लावले जाईल. अण्णांचा वापर संपुआ सरकार घालविण्यासाठी केला गेला म्हणून काँग्रेसवाले अण्णांच्या आंदोलनात सहभागी होतील, शंकाच आहे. आणि जरी राहिले तरी त्यांच्यावरील डाग अजून धुतला गेलेला नाही. त्यामुळे तसाही काही फायदा नाही. तात्पर्य, आंदोलन करण्यापूर्वी अण्णांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला बरा.