शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

भाष्य - अण्णा, थोडं थांबा !

By admin | Updated: March 31, 2017 00:13 IST

लोकपाल कायदा होऊनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान असून, लोकपालसाठी पुन्हा

लोकपाल कायदा होऊनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान असून, लोकपालसाठी पुन्हा आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. माझं मन मला सांगतंय, आंदोलन कर, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे सूतोवाच केले आहे. मोदी सरकार येऊन तीन वर्षे झाली तरी देशातील भ्रष्टाचार थांबलेला नाही, असंही निरीक्षण अण्णांनी नोंदविले आहे. आंदोलन करावं की नाही, हा सर्वस्वी अण्णांचा वैयक्तिक मामला आहे. अण्णांनी त्यांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून आंदोलन उभारलं तरी त्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण गेल्या तीन-चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. भ्रष्टचाराच्या विरोधात अण्णांनी आजवर मोठा लढा दिलेला आहे. २०११ साली दिल्लीत रामलीला मैदानावर ऐतिहासिक असे आंदोलन उभे केले. ज्याची दखल ‘टाइम’सारख्या जागतिक माध्यमांनी घेतली. अण्णांच्या या आंदोलनामागे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आणि ‘टीम अण्णा’च्या बॅनरखाली अरविंद केजरीवाल, किरण बेदी, योगेंद्र यादव, भूषण पितापुत्र आणि असंख्य ज्ञात-अज्ञातांचे पाठबळ होते. शिवाय, ‘मी अण्णा’ अशा टोप्या परिधान केलेला आणि कथित नागरी समाजाच्या नावाखाली उदयाला आलेला मेणबत्ती पंथही होता. ज्यांनी आजवर गांधी नावाच्या माणसाचा कमालीचा तिरस्कार केला, त्यांनीच अण्णांचा ‘दुसरे गांधी’ म्हणून उदोउदो केला. पण अण्णांच्या या जागरात सामील झालेल्या प्रत्येकाचे ईप्सित काही वेगळेच होते, हे कालांतराने सिद्ध झाले. केजरीवाल, बेदी, व्ही.के. सिंग आदिंनी आपापली राजकीय पोळी शेकून घेतली, तर भाजपादी पक्षांनी तत्कालीन संपुआ सरकारच्या विरोधात जनमत निर्माण करण्यासाठी अण्णांच्या आंदोलनात हवा भरली. अण्णा, रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेले असताना सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेले घाणाघाती भाषण अनेकांना आठवत असेल. देशातील प्रसारमाध्यमांनी तर अण्णांना अवतारी पुरुष बनवून टाकले होते. आज अण्णांनी पुन्हा आंदोलन उभारले तर, हे सगळे पुन्हा घडून येईल का? शंकाच आहे. कारण, तेव्हाचा मेणबत्ती पंथ आता मोदींचा भक्त बनलेला आहे. केजरीवाल, सिसोदिया, बेदी, सिंग आदिंनी राजकीय चूल मांडली असल्याने ते अण्णांच्यासोबत येण्याची शक्यता दिसत नाही. मीडिया अण्णांच्या मागे उभा राहील, याचीही शाश्वती देता येत नाही. शिवाय, मोदींच्या विरोधात ब्र ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत मोदीभक्त युवक तयार नाही.अण्णांनी मोदी सरकारवर वहीम ठेवलाच, तर लागलीच समाजमाध्यमातून त्यांच्या प्रतिमाहननाची मोहीम सुरू होईल. वेळप्रसंगी आंदोलनही उधळून लावले जाईल. अण्णांचा वापर संपुआ सरकार घालविण्यासाठी केला गेला म्हणून काँग्रेसवाले अण्णांच्या आंदोलनात सहभागी होतील, शंकाच आहे. आणि जरी राहिले तरी त्यांच्यावरील डाग अजून धुतला गेलेला नाही. त्यामुळे तसाही काही फायदा नाही. तात्पर्य, आंदोलन करण्यापूर्वी अण्णांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला बरा.