शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाष्य - अण्णा, थोडं थांबा !

By admin | Updated: March 31, 2017 00:13 IST

लोकपाल कायदा होऊनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान असून, लोकपालसाठी पुन्हा

लोकपाल कायदा होऊनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान असून, लोकपालसाठी पुन्हा आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. माझं मन मला सांगतंय, आंदोलन कर, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे सूतोवाच केले आहे. मोदी सरकार येऊन तीन वर्षे झाली तरी देशातील भ्रष्टाचार थांबलेला नाही, असंही निरीक्षण अण्णांनी नोंदविले आहे. आंदोलन करावं की नाही, हा सर्वस्वी अण्णांचा वैयक्तिक मामला आहे. अण्णांनी त्यांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून आंदोलन उभारलं तरी त्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण गेल्या तीन-चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. भ्रष्टचाराच्या विरोधात अण्णांनी आजवर मोठा लढा दिलेला आहे. २०११ साली दिल्लीत रामलीला मैदानावर ऐतिहासिक असे आंदोलन उभे केले. ज्याची दखल ‘टाइम’सारख्या जागतिक माध्यमांनी घेतली. अण्णांच्या या आंदोलनामागे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आणि ‘टीम अण्णा’च्या बॅनरखाली अरविंद केजरीवाल, किरण बेदी, योगेंद्र यादव, भूषण पितापुत्र आणि असंख्य ज्ञात-अज्ञातांचे पाठबळ होते. शिवाय, ‘मी अण्णा’ अशा टोप्या परिधान केलेला आणि कथित नागरी समाजाच्या नावाखाली उदयाला आलेला मेणबत्ती पंथही होता. ज्यांनी आजवर गांधी नावाच्या माणसाचा कमालीचा तिरस्कार केला, त्यांनीच अण्णांचा ‘दुसरे गांधी’ म्हणून उदोउदो केला. पण अण्णांच्या या जागरात सामील झालेल्या प्रत्येकाचे ईप्सित काही वेगळेच होते, हे कालांतराने सिद्ध झाले. केजरीवाल, बेदी, व्ही.के. सिंग आदिंनी आपापली राजकीय पोळी शेकून घेतली, तर भाजपादी पक्षांनी तत्कालीन संपुआ सरकारच्या विरोधात जनमत निर्माण करण्यासाठी अण्णांच्या आंदोलनात हवा भरली. अण्णा, रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेले असताना सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेले घाणाघाती भाषण अनेकांना आठवत असेल. देशातील प्रसारमाध्यमांनी तर अण्णांना अवतारी पुरुष बनवून टाकले होते. आज अण्णांनी पुन्हा आंदोलन उभारले तर, हे सगळे पुन्हा घडून येईल का? शंकाच आहे. कारण, तेव्हाचा मेणबत्ती पंथ आता मोदींचा भक्त बनलेला आहे. केजरीवाल, सिसोदिया, बेदी, सिंग आदिंनी राजकीय चूल मांडली असल्याने ते अण्णांच्यासोबत येण्याची शक्यता दिसत नाही. मीडिया अण्णांच्या मागे उभा राहील, याचीही शाश्वती देता येत नाही. शिवाय, मोदींच्या विरोधात ब्र ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत मोदीभक्त युवक तयार नाही.अण्णांनी मोदी सरकारवर वहीम ठेवलाच, तर लागलीच समाजमाध्यमातून त्यांच्या प्रतिमाहननाची मोहीम सुरू होईल. वेळप्रसंगी आंदोलनही उधळून लावले जाईल. अण्णांचा वापर संपुआ सरकार घालविण्यासाठी केला गेला म्हणून काँग्रेसवाले अण्णांच्या आंदोलनात सहभागी होतील, शंकाच आहे. आणि जरी राहिले तरी त्यांच्यावरील डाग अजून धुतला गेलेला नाही. त्यामुळे तसाही काही फायदा नाही. तात्पर्य, आंदोलन करण्यापूर्वी अण्णांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला बरा.