शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

भाष्य - पुन्हा विरोधी ऐक्य?

By admin | Updated: March 28, 2017 00:23 IST

लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश असला तरी, राजकीय पक्षांना ती आतापासूनच खुणावू लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला

लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश असला तरी, राजकीय पक्षांना ती आतापासूनच खुणावू लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला तीन-चतुर्थांश बहुमत मिळाल्यानंतर लगेच २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीची चर्चा सुरू झाली. रविवारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी ती आणखी पुढे नेली. भाजपाला ‘संपविण्यासाठी’ एकत्र येण्याचे आवाहन, त्यांनी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाला केले. बिहार विधानसभा निवडणुकीत, राजद, कॉँग्रेस व संयुक्त जनता दलाच्या महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे लालूप्रसाद यादव खूपच उत्साहित झाले आहेत. बिहारमधील निकालापासून, भाजपाला लोळविण्याचा मूलमंत्रच गवसल्यासारखी त्यांची देहबोली असते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधीही त्यांनी सपा, बसपा व कॉँग्रेसला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर त्यासाठी सक्रिय पुढाकारही घेतला होता. त्यापैकी सपा व कॉँग्रेस एकत्र आले; पण बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काही लालूप्रसादांचे आवाहन मनावर घेतले नाही. अर्थात उत्तर प्रदेशातील निकालानंतर मुलायम सिंह व अखिलेश यादव या पितापुत्रांएवढ्याच मायावतीही हादरल्या आहेत. कॉँग्रेसमधूनही विरोधी पक्षांच्या एकतेसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा आग्रह सोडून देण्याचे सूर उमटू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार असलेल्या कर्नाटक व गुजरात या दोन मोठ्या राज्यांनी भाजपाला कौल दिल्यास, कॉँग्रेसमधील हा सूर मोठा होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध इतर सगळे असा दुरंगी सामना रंगण्याची शक्यता दिसत आहे. १९७७ मध्ये तत्कालीन सत्ताधारी पक्ष असलेल्या कॉँग्रेसच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जन्माला घातलेल्या जनता पक्षाला तेव्हा जनतेने भरघोस कौल दिला होता आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉँग्रेसला केंद्रातून सत्ताभ्रष्ट केले होते; पण अवघ्या अडीच वर्षातच जनता पक्ष फुटला होता आणि १९८० मध्ये जनतेने पुन्हा कॉँग्रेसला सत्ता दिली होती. त्यानंतर विविध विरोधी पक्षांनी एकत्र येऊन नवा पक्ष स्थापन करण्याचा प्रयोग १९८८मध्ये जनता दलाच्या नावाने झाला होता. त्या पक्षालाही सत्ता मिळाली; पण टिकवून ठेवता आली नाही. ते दोन्ही प्रयोग कॉँग्रेसच्या विरोधात झाले होते आणि भाजपा (पूर्वाश्रमीचा जनसंघ) त्यामध्ये आतून वा बाहेरून सहभागी झाला होता. आता पुन्हा एकदा तोच प्रयोग, अर्थात नवा पक्ष नव्हे तर आघाडी स्थापन करून, भाजपाच्या विरोधात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रयोग होणार का, आधीच्या दोन प्रयोगांप्रमाणे तोदेखील यशस्वी होणार का आणि झाला तरी त्याची गत आधीच्या प्रयोगांप्रमाणेच होणार का, या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे.