शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

भाष्य - पुन्हा विरोधी ऐक्य?

By admin | Updated: March 28, 2017 00:23 IST

लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश असला तरी, राजकीय पक्षांना ती आतापासूनच खुणावू लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला

लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश असला तरी, राजकीय पक्षांना ती आतापासूनच खुणावू लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला तीन-चतुर्थांश बहुमत मिळाल्यानंतर लगेच २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीची चर्चा सुरू झाली. रविवारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी ती आणखी पुढे नेली. भाजपाला ‘संपविण्यासाठी’ एकत्र येण्याचे आवाहन, त्यांनी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाला केले. बिहार विधानसभा निवडणुकीत, राजद, कॉँग्रेस व संयुक्त जनता दलाच्या महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे लालूप्रसाद यादव खूपच उत्साहित झाले आहेत. बिहारमधील निकालापासून, भाजपाला लोळविण्याचा मूलमंत्रच गवसल्यासारखी त्यांची देहबोली असते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधीही त्यांनी सपा, बसपा व कॉँग्रेसला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर त्यासाठी सक्रिय पुढाकारही घेतला होता. त्यापैकी सपा व कॉँग्रेस एकत्र आले; पण बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काही लालूप्रसादांचे आवाहन मनावर घेतले नाही. अर्थात उत्तर प्रदेशातील निकालानंतर मुलायम सिंह व अखिलेश यादव या पितापुत्रांएवढ्याच मायावतीही हादरल्या आहेत. कॉँग्रेसमधूनही विरोधी पक्षांच्या एकतेसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा आग्रह सोडून देण्याचे सूर उमटू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार असलेल्या कर्नाटक व गुजरात या दोन मोठ्या राज्यांनी भाजपाला कौल दिल्यास, कॉँग्रेसमधील हा सूर मोठा होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध इतर सगळे असा दुरंगी सामना रंगण्याची शक्यता दिसत आहे. १९७७ मध्ये तत्कालीन सत्ताधारी पक्ष असलेल्या कॉँग्रेसच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जन्माला घातलेल्या जनता पक्षाला तेव्हा जनतेने भरघोस कौल दिला होता आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉँग्रेसला केंद्रातून सत्ताभ्रष्ट केले होते; पण अवघ्या अडीच वर्षातच जनता पक्ष फुटला होता आणि १९८० मध्ये जनतेने पुन्हा कॉँग्रेसला सत्ता दिली होती. त्यानंतर विविध विरोधी पक्षांनी एकत्र येऊन नवा पक्ष स्थापन करण्याचा प्रयोग १९८८मध्ये जनता दलाच्या नावाने झाला होता. त्या पक्षालाही सत्ता मिळाली; पण टिकवून ठेवता आली नाही. ते दोन्ही प्रयोग कॉँग्रेसच्या विरोधात झाले होते आणि भाजपा (पूर्वाश्रमीचा जनसंघ) त्यामध्ये आतून वा बाहेरून सहभागी झाला होता. आता पुन्हा एकदा तोच प्रयोग, अर्थात नवा पक्ष नव्हे तर आघाडी स्थापन करून, भाजपाच्या विरोधात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रयोग होणार का, आधीच्या दोन प्रयोगांप्रमाणे तोदेखील यशस्वी होणार का आणि झाला तरी त्याची गत आधीच्या प्रयोगांप्रमाणेच होणार का, या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे.