शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

..आणि राजनाथजी!

By admin | Updated: September 20, 2015 23:36 IST

आशुतोष गोवारीकरचा ‘स्वदेश’ आठवतो? ‘नासा’त शास्त्रज्ञ असलेला शाहरुख गावात आलेला असतो. त्याची मानलेली आई त्याला पंच मंडळींच्या पुढ्यात नेते. सरपंचासकट कोणालाच नासा ‘यह कौन कंपनी

आशुतोष गोवारीकरचा ‘स्वदेश’ आठवतो? ‘नासा’त शास्त्रज्ञ असलेला शाहरुख गावात आलेला असतो. त्याची मानलेली आई त्याला पंच मंडळींच्या पुढ्यात नेते. सरपंचासकट कोणालाच नासा ‘यह कौन कंपनी है’ याचा पत्ता नसतो. ते त्याला ‘ई कंपनीमा काम क्या करत हो’ असे विचारतात. तेव्हा तो हवामानाचा, पावसाचा अंदाज काढला जातो वगैरे वगैरे सांगतो. त्यावर सरपंच उद्गारतात, ‘ई काम तो हमार हरिया भी करत है. ऐ हरिया बता तो जरा’ आणि मग लगेच हवामानाचा अंदाज मांडला जातो. गोवारीकर यांनी हा प्रसंग आणि त्यातील संवाद कल्पनेने चितारले असावेत असे उगाचच इतके दिवस वाटत होते किंवा मग असेही असेल की जे आधी कल्पनेत येते, तेच मग नंतर सत्यात उतरते. या प्रसंगाचेही तसेच झाले असून, स्वदेशमधील सरपंच आता देशाचे थेट गृहमंत्री झाले आहेत! राजधानीतील एका महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी मेळाव्यात बोलताना, सरपंच राजनाथसिंह म्हणाले की, नासामधल्या शास्त्रज्ञांपेक्षा आमच्याकडे गावागावत भेटणारे पंडित (ज्योतिषी) लोक चांगले. नासावाल्यांना ग्रहणाचा अंदाज केवळ काही महिने अगोदर लागतो तर या पंडितांना अनेक वर्षे आधीच त्यांचा सुगावा लागतो! वारे पठ्ठे! मुळात आकाशस्थ ग्रह-गोल-तारे यांच्या भ्रमणांचा अभ्यास गणिताच्याच आधारे केला जातो, ज्याला खगोल गणित म्हणतात व त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास नासातही केला जातो. अभ्यास मग तो जगाच्या पाठीवर कुठेही केला जावो, त्याचे मोल ठरविता येत नाही. पण अलीकडच्या काळात आणि विशेषत: भाजपाच्या लोकांमध्ये जे भारतीय तेच तेवढे अस्सल आणि पाश्चिमात्य तितके हिणकस असे सांगत राहण्याची चढाओढच सुरू आहे. आपले असलेले वा नसलेले मोठेपण सिद्ध करण्यासाठी इतरांना डावे लेखावेच लागते, या प्रवृत्तीचाही सुळसुळाट झाला आहे. पण राजनाथसिंह यांच्याकडून तशी अपेक्षा करता येऊ नये कारण ते विज्ञानाचे शिक्षक आहेत, असे म्हणतात. तरीही जेव्हा एखादी जबाबदार व्यक्ती विद्यार्थ्यांच्या पुढ्यात बोलत असते तेव्हा समोरचे विद्यार्थी किंवा त्यांची पिढी विज्ञाननिष्ठ कशी बनेल हे पाहण्याची व तसे मार्गदर्शन करण्याची अपेक्षा असते. पण राम-सीता-लक्ष्मण लंकेहून विमानाने अयोध्येत दाखल झाले वा गणपतीला हत्तीचे शीर कलम केले गेले यावरून आमच्याकडे एव्हिएशन टेक्नॉलॉजी व प्लॅस्टिक सर्जरी त्या काळापासूनच प्रगत अवस्थेत होती असे आधी स्वत:ला आणि नंतर इतरांना बजावत राहण्यात ज्यांना आनंद मिळतो, त्यांचा आनंद इतरांनी का बरे हिरावून घ्यावा?