शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

..आणि राजनाथजी!

By admin | Updated: September 20, 2015 23:36 IST

आशुतोष गोवारीकरचा ‘स्वदेश’ आठवतो? ‘नासा’त शास्त्रज्ञ असलेला शाहरुख गावात आलेला असतो. त्याची मानलेली आई त्याला पंच मंडळींच्या पुढ्यात नेते. सरपंचासकट कोणालाच नासा ‘यह कौन कंपनी

आशुतोष गोवारीकरचा ‘स्वदेश’ आठवतो? ‘नासा’त शास्त्रज्ञ असलेला शाहरुख गावात आलेला असतो. त्याची मानलेली आई त्याला पंच मंडळींच्या पुढ्यात नेते. सरपंचासकट कोणालाच नासा ‘यह कौन कंपनी है’ याचा पत्ता नसतो. ते त्याला ‘ई कंपनीमा काम क्या करत हो’ असे विचारतात. तेव्हा तो हवामानाचा, पावसाचा अंदाज काढला जातो वगैरे वगैरे सांगतो. त्यावर सरपंच उद्गारतात, ‘ई काम तो हमार हरिया भी करत है. ऐ हरिया बता तो जरा’ आणि मग लगेच हवामानाचा अंदाज मांडला जातो. गोवारीकर यांनी हा प्रसंग आणि त्यातील संवाद कल्पनेने चितारले असावेत असे उगाचच इतके दिवस वाटत होते किंवा मग असेही असेल की जे आधी कल्पनेत येते, तेच मग नंतर सत्यात उतरते. या प्रसंगाचेही तसेच झाले असून, स्वदेशमधील सरपंच आता देशाचे थेट गृहमंत्री झाले आहेत! राजधानीतील एका महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी मेळाव्यात बोलताना, सरपंच राजनाथसिंह म्हणाले की, नासामधल्या शास्त्रज्ञांपेक्षा आमच्याकडे गावागावत भेटणारे पंडित (ज्योतिषी) लोक चांगले. नासावाल्यांना ग्रहणाचा अंदाज केवळ काही महिने अगोदर लागतो तर या पंडितांना अनेक वर्षे आधीच त्यांचा सुगावा लागतो! वारे पठ्ठे! मुळात आकाशस्थ ग्रह-गोल-तारे यांच्या भ्रमणांचा अभ्यास गणिताच्याच आधारे केला जातो, ज्याला खगोल गणित म्हणतात व त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास नासातही केला जातो. अभ्यास मग तो जगाच्या पाठीवर कुठेही केला जावो, त्याचे मोल ठरविता येत नाही. पण अलीकडच्या काळात आणि विशेषत: भाजपाच्या लोकांमध्ये जे भारतीय तेच तेवढे अस्सल आणि पाश्चिमात्य तितके हिणकस असे सांगत राहण्याची चढाओढच सुरू आहे. आपले असलेले वा नसलेले मोठेपण सिद्ध करण्यासाठी इतरांना डावे लेखावेच लागते, या प्रवृत्तीचाही सुळसुळाट झाला आहे. पण राजनाथसिंह यांच्याकडून तशी अपेक्षा करता येऊ नये कारण ते विज्ञानाचे शिक्षक आहेत, असे म्हणतात. तरीही जेव्हा एखादी जबाबदार व्यक्ती विद्यार्थ्यांच्या पुढ्यात बोलत असते तेव्हा समोरचे विद्यार्थी किंवा त्यांची पिढी विज्ञाननिष्ठ कशी बनेल हे पाहण्याची व तसे मार्गदर्शन करण्याची अपेक्षा असते. पण राम-सीता-लक्ष्मण लंकेहून विमानाने अयोध्येत दाखल झाले वा गणपतीला हत्तीचे शीर कलम केले गेले यावरून आमच्याकडे एव्हिएशन टेक्नॉलॉजी व प्लॅस्टिक सर्जरी त्या काळापासूनच प्रगत अवस्थेत होती असे आधी स्वत:ला आणि नंतर इतरांना बजावत राहण्यात ज्यांना आनंद मिळतो, त्यांचा आनंद इतरांनी का बरे हिरावून घ्यावा?