शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

शिवसेनेसोबतच्या युतीचा वंचितला लाभ शक्य!

By किरण अग्रवाल | Updated: January 29, 2023 11:43 IST

Politics : वऱ्हाड प्रांतात या नवीन समीकरणामुळे भाजपला शह देता येण्याची शक्यता चर्चेत येऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे.

-  किरण अग्रवाल

शिवसेनावंचित बहुजन आघाडीचे सूर जुळल्यामुळे काँग्रेससोबतच्या महाआघाडीत खटके उडताना दिसत असलेत तरी, वंचितचे प्रभावक्षेत्र असलेल्या अकोला जिल्ह्यात या नवीन समीकरणाचा महाआघाडीला लाभच होण्याची शक्यता नाकारता येऊ नये.

काँग्रेस महाआघाडीतील शिवसेनावंचित बहुजन आघाडीच्या नवीन सांधे जुळणीमुळे राज्यात अपेक्षेनुसार काहीसा खडखडाट होत असला तरी, अकोला जिल्हा व एकूणच वऱ्हाड प्रांतात या नवीन समीकरणामुळे भाजपला शह देता येण्याची शक्यता चर्चेत येऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे.

शिवसेना व वंचितच्या नव्या युतीमुळे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्याची चर्चा होत असली तरी, प्रतिस्पर्धी भाजप व त्यांच्या वळचणीला असलेल्या रिपाइं गटाकडून मात्र या युतीकडे गांभीर्याने पाहिले जाताना दिसत नाही. अर्थात, राजकारणात जेव्हा एखादी बाब अदखलपात्र दर्शविली जाते तेव्हा अंतस्थदृष्ट्या ती बाब अधिक गंभीरपणे घेण्याचीच मानसिकता दिसून येते. तेव्हा याही बाबतीत तसेच असेल तर सांगता येऊ नये; पण शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटामुळे काहीशा अडचणीत सापडलेल्या शिवसेना ठाकरे गटाला वंचितचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये नवा सूर सापडण्याची चिन्हे नाकारता येणारी नाहीत.

‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे राज्यात अकोला जिल्हा हा त्यांचे प्रभाव क्षेत्र राहिला आहे. तुलनेने या जिल्ह्यात शिवसेनेत खूप दखलपात्र ठरावी अशी फूट पडलेली नाही. मात्र, आतापर्यंत भाजपच्या साथीने वाढलेल्या शिवसेना ठाकरे गटाला वंचितच्या रूपाने दुसरा भक्कम जोडीदार लाभून गेल्याने सेनेच्या वाट्याला दुय्यमत्वच राहण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. गेल्या वेळी सेना-भाजप युतीत जिल्ह्यात बाळापूर हा एकमेव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला व तो या पक्षाने राखलाही आहे. तेथे वंचितची ताकदही मोठी असून, दुसऱ्या क्रमांकावर वंचितचाच उमेदवार राहिला होता. बळीराम शिरसकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पूर्वी वंचितच्या तिकिटावर दोन टर्म तिथून निवडूनही आलेले होते; पण तरी वंचितला या मतदारसंघावरील हक्क शिवसेनेसाठी सोडणे भाग पडू शकते, कारण राज्यातील उलथापालथीत येथील आमदार नितीन देशमुख हे ठाकरे गटाशी निष्ठा कायम ठेवून आहेत.

अकोला जिल्ह्यातील उर्वरित जागांबद्दल शिवसेना व वंचितमध्ये जागा वाटपावरून फार घमासान होण्याची शक्यता नाही, कारण पूर्वीच्या युतीमध्ये ज्या जागा भाजपला द्याव्या लागत त्या आता शिवसेनेला वंचितसाठी सोडाव्या लागल्या, तर त्यांचे फार नुकसान होत नाही. मात्र, अशास्थितीत संधीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या इच्छुक शिवसेना उमेदवारांनी वेगळी वाट धरली तर सांगता येऊ नये. गेल्यावेळी मूर्तिजापूरमध्ये वंचितच्या उमेदवार खूप कमी फरकाने विजयापासून दूर राहिल्या होत्या. अकोटची जागाही दहा हजारांपेक्षा कमी मतांच्या फरकाने मागे पडली होती. अकोट तर पूर्वी गुलाबराव गावंडे व संजय गावंडे यांच्या रूपाने शिवसेनेच्याच हाती होते, पण नंतर समीकरण बदलले. तेव्हा मूर्तिजापूर व अकोटमध्ये भाजपला शह देण्याची संधी शिवसेनेसोबतच्या युतीमुळे वंचितला फेरमांडणी करून घेता येऊ शकेल. अकोला पूर्व मतदारसंघ भाजपच्या हाती येण्यापूर्वी हरिदास भदे व डॉ. दशरथ भांडे यांनी तेथे प्रतिनिधित्व केल्याचे पाहता या जागेवरही वंचितची आशा बळावू शकते.

बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार आणि दोन आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसेना ठाकरे गटातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना राजकीय महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटलेले आहेत. गत विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ने सातही विधानसभा मतदारसंघांत उमेदवार देऊन आपल्या ताकदीची चुणूक दाखवली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी उमेदवारीसाठी होऊ पाहणारी स्पर्धा पाहता प्रतिस्पर्धी भाजप व शिवसेना शिंदे गटापेक्षाही आपसात वाटाघाटी करूनच उभय पक्षांना जिल्ह्यातील वाटचाल करावी लागेल, असे चित्र आहे.

वाशिम जिल्ह्यात विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत स्थानिक वाशिम मतदारसंघात वंचितचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर, तर शिवसेनेचे बंडखाेर उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले हाेते, तर कारंजा व रिसाेड मतदारसंघामध्ये वंचित आणि शिवसेनेचीही तशी मोठी ताकद नाही, त्यामुळे या जिल्ह्यात या दोन्ही पक्षांना परस्परपूरक लाभाचे गणित मांडता यावे. येथे कुणाचा राग, लोभ फारसा आडवा येण्याची शक्यता नाही

सारांशात, महाआघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत वंचितचे कसे जमेल हा नंतरचा भाग; परंतु शिवसेनेसोबतच्या नवीन समीकरणांमुळे वंचितचा प्रभाव असलेल्या अकोला जिल्ह्यातून तरी या पक्षाची विधानसभेत जाण्याबाबतची वंचितावस्था दूर होण्याची शक्यता निर्माण झाली तर आश्चर्य वाटू नये.

टॅग्स :PoliticsराजकारणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीShiv Senaशिवसेना