शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

निपाह विषाणूचे ‘विघ्न' टळले असले तरी, बेफिकीर राहू नका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 07:29 IST

वटवाघळांची लाळ आणि लघवीतून निर्माण होणारे लहान थेंब श्वसनाच्या द्वारे घेणे हा निपाचा मानवांमध्ये संक्रमणाचा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो

डॉ. नंदकुमार कामत, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

निपा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केरळवर चौथ्यांदा संकट आले आहे. निपाह हा सार्स किंवा स्वाइन फ्लूसारखा हवेतून पसरणारा विषाणू आहे. त्याचे नाव मलेशियातील सुंगाई निपाह या गावावरून आले आहे. तिथे तो प्रथम ओळखला गेला.

सुरुवातीची लक्षणे म्हणजे सामान्य ताप, डोकेदुखी, चक्कर येणे, स्नायू दुखणे. ५ ते १४ दिवसांनंतर रुग्णांमध्ये एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) दिसून येते. त्यामागोमाग डोकेदुखी, तंद्री, दिशाभूल आणि मानसिक गोंधळ यांचा त्रास होतो. यावर अद्याप कोणतीही लस किंवा कायमस्वरूपी इलाज नाही. हा विषाणू फळभक्षक वटवाघळांच्या ५८ हून अधिक प्रजातींद्वारे प्रसारित होत असल्याने तो प्राणी आणि मानवांमध्ये कुठेही दिसू शकतो.

२०१८ वर्षी केरळमध्ये २६०० विषाणू संसर्ग आणि १७ मृत्यूची नोंद झाली होती. २०१८ च्या उद्रेकातून चार मानवी आणि तीन फळभक्षक वटवाघळांतील (टेरोपस मेडिअस) नमुन्यांमधून मिळवलेल्या निपाह विषाणूंचा जनुकीय विश्लेषणाने असे दाखवून दिले की मानवांतील निपाह विषाणू २६.१५ टक्के बांगलादेशी प्रकारातला होता; परंतु ९९.७ ते १०० टक्के विषाणू वटवाघळांच्या टेरोपस जातीतील विषाणूसारखे होते. म्हणजे फळभक्षक वटवाघळे हेच उद्रेक होण्याचे स्रोत होते. 

निपाह संसर्गासाठी प्रभावी विशिष्ट उपचार किंवा प्रतिबंधात्मक लस नसल्यामुळे या प्रतिबंधावर जास्त भर दिला पाहिजे. वटवाघळांच्या लाळेच्या संपर्कात येणाऱ्या फळांचे सेवन करणे किंवा वटवाघळांची लाळ आणि लघवीतून निर्माण होणारे लहान थेंब श्वसनाच्या द्वारे घेणे हा निपाहचा मानवांमध्ये संक्रमणाचा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो असा संशयही व्यक्त केला गेला आहे. केरळसारख्या सुशिक्षित राज्यात निपाह विषाणूचा हा पाच वर्षांतील चौथा उद्रेक असेल तर आता शेजारच्या कोणत्या राज्यात पहिला उद्रेक होईल ? केरळच्या कोझिकोडमध्ये १२ सप्टेंबर रोजी दोन मृत्यू निपाह विषाणूमुळे झाल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केला होता. आपल्या देशात हा आजार आढळण्याची ही पाचवी वेळ आहे.

पहिला उद्रेक जानेवारी ते फेब्रुवारी २००१ दरम्यान पश्चिम बंगालच्या सिलीगुडी जिल्ह्यात झाला होता. या गंभीर उद्रेकामुळे ६६ लोक आजारी झाले होते व ४५ जण दगावले होते. २०२१ मध्ये निपाह विषाणूचा प्रादुर्भाव कोझिकोडमधील पझूर येथे १२ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने झाला. हा उद्रेक ५ सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आल्याचे घोषित करण्यात आले होते. आता हा पाचवा उद्रेक आहे. अलीकडेच केरळच्या कोझिकोडमध्ये "अनैसर्गिक तापा" मुळे मरण पावलेल्या दोन लोकांना निपाह विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर चार व्यक्तींची निपाह चाचणी सकारात्मक आली, त्यातील दोन रुग्ण कोझिकोड येथे उपचार घेत आहेत तर इतरांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही मृत व्यक्ती हॉस्पिटलमध्ये एकमेकांच्या संपर्कात आल्या होत्या. केरळ सरकारने या रुग्णांची संपर्क यादी तयार केली आहे. यापैकी एकाच्या संपर्कात आलेल्या सुमारे १६८ व्यक्तींची राज्याच्या आरोग्य विभागाने ओळख पटवली आहे. संसर्ग रोखण्यासाठी केरळने १६ गाभा समित्या स्थापन केल्या आहेत. 

एनआयव्ही, पुणे आणि आयसीएमआरसह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी, चेन्नईच्या तज्ज्ञ पथकाने केरळमध्ये सर्वेक्षणे आणि अभ्यास सुरू केला आहे.

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू