शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

निपाह विषाणूचे ‘विघ्न' टळले असले तरी, बेफिकीर राहू नका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 07:29 IST

वटवाघळांची लाळ आणि लघवीतून निर्माण होणारे लहान थेंब श्वसनाच्या द्वारे घेणे हा निपाचा मानवांमध्ये संक्रमणाचा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो

डॉ. नंदकुमार कामत, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

निपा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केरळवर चौथ्यांदा संकट आले आहे. निपाह हा सार्स किंवा स्वाइन फ्लूसारखा हवेतून पसरणारा विषाणू आहे. त्याचे नाव मलेशियातील सुंगाई निपाह या गावावरून आले आहे. तिथे तो प्रथम ओळखला गेला.

सुरुवातीची लक्षणे म्हणजे सामान्य ताप, डोकेदुखी, चक्कर येणे, स्नायू दुखणे. ५ ते १४ दिवसांनंतर रुग्णांमध्ये एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) दिसून येते. त्यामागोमाग डोकेदुखी, तंद्री, दिशाभूल आणि मानसिक गोंधळ यांचा त्रास होतो. यावर अद्याप कोणतीही लस किंवा कायमस्वरूपी इलाज नाही. हा विषाणू फळभक्षक वटवाघळांच्या ५८ हून अधिक प्रजातींद्वारे प्रसारित होत असल्याने तो प्राणी आणि मानवांमध्ये कुठेही दिसू शकतो.

२०१८ वर्षी केरळमध्ये २६०० विषाणू संसर्ग आणि १७ मृत्यूची नोंद झाली होती. २०१८ च्या उद्रेकातून चार मानवी आणि तीन फळभक्षक वटवाघळांतील (टेरोपस मेडिअस) नमुन्यांमधून मिळवलेल्या निपाह विषाणूंचा जनुकीय विश्लेषणाने असे दाखवून दिले की मानवांतील निपाह विषाणू २६.१५ टक्के बांगलादेशी प्रकारातला होता; परंतु ९९.७ ते १०० टक्के विषाणू वटवाघळांच्या टेरोपस जातीतील विषाणूसारखे होते. म्हणजे फळभक्षक वटवाघळे हेच उद्रेक होण्याचे स्रोत होते. 

निपाह संसर्गासाठी प्रभावी विशिष्ट उपचार किंवा प्रतिबंधात्मक लस नसल्यामुळे या प्रतिबंधावर जास्त भर दिला पाहिजे. वटवाघळांच्या लाळेच्या संपर्कात येणाऱ्या फळांचे सेवन करणे किंवा वटवाघळांची लाळ आणि लघवीतून निर्माण होणारे लहान थेंब श्वसनाच्या द्वारे घेणे हा निपाहचा मानवांमध्ये संक्रमणाचा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो असा संशयही व्यक्त केला गेला आहे. केरळसारख्या सुशिक्षित राज्यात निपाह विषाणूचा हा पाच वर्षांतील चौथा उद्रेक असेल तर आता शेजारच्या कोणत्या राज्यात पहिला उद्रेक होईल ? केरळच्या कोझिकोडमध्ये १२ सप्टेंबर रोजी दोन मृत्यू निपाह विषाणूमुळे झाल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केला होता. आपल्या देशात हा आजार आढळण्याची ही पाचवी वेळ आहे.

पहिला उद्रेक जानेवारी ते फेब्रुवारी २००१ दरम्यान पश्चिम बंगालच्या सिलीगुडी जिल्ह्यात झाला होता. या गंभीर उद्रेकामुळे ६६ लोक आजारी झाले होते व ४५ जण दगावले होते. २०२१ मध्ये निपाह विषाणूचा प्रादुर्भाव कोझिकोडमधील पझूर येथे १२ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने झाला. हा उद्रेक ५ सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आल्याचे घोषित करण्यात आले होते. आता हा पाचवा उद्रेक आहे. अलीकडेच केरळच्या कोझिकोडमध्ये "अनैसर्गिक तापा" मुळे मरण पावलेल्या दोन लोकांना निपाह विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर चार व्यक्तींची निपाह चाचणी सकारात्मक आली, त्यातील दोन रुग्ण कोझिकोड येथे उपचार घेत आहेत तर इतरांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही मृत व्यक्ती हॉस्पिटलमध्ये एकमेकांच्या संपर्कात आल्या होत्या. केरळ सरकारने या रुग्णांची संपर्क यादी तयार केली आहे. यापैकी एकाच्या संपर्कात आलेल्या सुमारे १६८ व्यक्तींची राज्याच्या आरोग्य विभागाने ओळख पटवली आहे. संसर्ग रोखण्यासाठी केरळने १६ गाभा समित्या स्थापन केल्या आहेत. 

एनआयव्ही, पुणे आणि आयसीएमआरसह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी, चेन्नईच्या तज्ज्ञ पथकाने केरळमध्ये सर्वेक्षणे आणि अभ्यास सुरू केला आहे.

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू