शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

निपाह विषाणूचे ‘विघ्न' टळले असले तरी, बेफिकीर राहू नका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 07:29 IST

वटवाघळांची लाळ आणि लघवीतून निर्माण होणारे लहान थेंब श्वसनाच्या द्वारे घेणे हा निपाचा मानवांमध्ये संक्रमणाचा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो

डॉ. नंदकुमार कामत, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

निपा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केरळवर चौथ्यांदा संकट आले आहे. निपाह हा सार्स किंवा स्वाइन फ्लूसारखा हवेतून पसरणारा विषाणू आहे. त्याचे नाव मलेशियातील सुंगाई निपाह या गावावरून आले आहे. तिथे तो प्रथम ओळखला गेला.

सुरुवातीची लक्षणे म्हणजे सामान्य ताप, डोकेदुखी, चक्कर येणे, स्नायू दुखणे. ५ ते १४ दिवसांनंतर रुग्णांमध्ये एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) दिसून येते. त्यामागोमाग डोकेदुखी, तंद्री, दिशाभूल आणि मानसिक गोंधळ यांचा त्रास होतो. यावर अद्याप कोणतीही लस किंवा कायमस्वरूपी इलाज नाही. हा विषाणू फळभक्षक वटवाघळांच्या ५८ हून अधिक प्रजातींद्वारे प्रसारित होत असल्याने तो प्राणी आणि मानवांमध्ये कुठेही दिसू शकतो.

२०१८ वर्षी केरळमध्ये २६०० विषाणू संसर्ग आणि १७ मृत्यूची नोंद झाली होती. २०१८ च्या उद्रेकातून चार मानवी आणि तीन फळभक्षक वटवाघळांतील (टेरोपस मेडिअस) नमुन्यांमधून मिळवलेल्या निपाह विषाणूंचा जनुकीय विश्लेषणाने असे दाखवून दिले की मानवांतील निपाह विषाणू २६.१५ टक्के बांगलादेशी प्रकारातला होता; परंतु ९९.७ ते १०० टक्के विषाणू वटवाघळांच्या टेरोपस जातीतील विषाणूसारखे होते. म्हणजे फळभक्षक वटवाघळे हेच उद्रेक होण्याचे स्रोत होते. 

निपाह संसर्गासाठी प्रभावी विशिष्ट उपचार किंवा प्रतिबंधात्मक लस नसल्यामुळे या प्रतिबंधावर जास्त भर दिला पाहिजे. वटवाघळांच्या लाळेच्या संपर्कात येणाऱ्या फळांचे सेवन करणे किंवा वटवाघळांची लाळ आणि लघवीतून निर्माण होणारे लहान थेंब श्वसनाच्या द्वारे घेणे हा निपाहचा मानवांमध्ये संक्रमणाचा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो असा संशयही व्यक्त केला गेला आहे. केरळसारख्या सुशिक्षित राज्यात निपाह विषाणूचा हा पाच वर्षांतील चौथा उद्रेक असेल तर आता शेजारच्या कोणत्या राज्यात पहिला उद्रेक होईल ? केरळच्या कोझिकोडमध्ये १२ सप्टेंबर रोजी दोन मृत्यू निपाह विषाणूमुळे झाल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केला होता. आपल्या देशात हा आजार आढळण्याची ही पाचवी वेळ आहे.

पहिला उद्रेक जानेवारी ते फेब्रुवारी २००१ दरम्यान पश्चिम बंगालच्या सिलीगुडी जिल्ह्यात झाला होता. या गंभीर उद्रेकामुळे ६६ लोक आजारी झाले होते व ४५ जण दगावले होते. २०२१ मध्ये निपाह विषाणूचा प्रादुर्भाव कोझिकोडमधील पझूर येथे १२ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने झाला. हा उद्रेक ५ सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आल्याचे घोषित करण्यात आले होते. आता हा पाचवा उद्रेक आहे. अलीकडेच केरळच्या कोझिकोडमध्ये "अनैसर्गिक तापा" मुळे मरण पावलेल्या दोन लोकांना निपाह विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर चार व्यक्तींची निपाह चाचणी सकारात्मक आली, त्यातील दोन रुग्ण कोझिकोड येथे उपचार घेत आहेत तर इतरांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही मृत व्यक्ती हॉस्पिटलमध्ये एकमेकांच्या संपर्कात आल्या होत्या. केरळ सरकारने या रुग्णांची संपर्क यादी तयार केली आहे. यापैकी एकाच्या संपर्कात आलेल्या सुमारे १६८ व्यक्तींची राज्याच्या आरोग्य विभागाने ओळख पटवली आहे. संसर्ग रोखण्यासाठी केरळने १६ गाभा समित्या स्थापन केल्या आहेत. 

एनआयव्ही, पुणे आणि आयसीएमआरसह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी, चेन्नईच्या तज्ज्ञ पथकाने केरळमध्ये सर्वेक्षणे आणि अभ्यास सुरू केला आहे.

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू