शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

अकोला जिल्ह्यात पर्यायवाची प्रहार!

By किरण अग्रवाल | Updated: October 10, 2021 12:41 IST

Akola ZP By Poll : पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अकोला जिल्हा परिषदेत झालेला प्रहार जनशक्ती पक्षाचा चंचुप्रवेश याचदृष्टीने प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालणारा म्हणायला हवा.

- किरण अग्रवाल

प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोला जिल्हा परिषदेतील प्रवेशाने केवळ वंचित बहुजन आघाडीनेच नव्हे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेनेही सतर्क व्हायला हवे, कारण यातून मतदारांना पर्याय उपलब्ध झाल्याचा संकेत मिळून गेला आहे. राज्यातील सत्तेच्या साथीने प्रहार बळकट होणार असेल तर इतर सहयोगी प्रस्थापितांचे काय? असाही प्रश्न आहेच.

व्यक्ती निष्ठा बदलतात, तसे मतदार पक्ष बदलतात आता. आश्वासनांना भुलून शिक्के मारण्याचे दिवस गेले, आता काम बोलते; शिवाय अनेकांना संधी देऊन व अनुभवूनही फारसे पदरी पडत नाही तेव्हा ‘सारे एकाच माळेचे मणी’ अशी भावना वाढीस लागते आणि त्यातूनच नव्या पर्यायाचा शोध घेतला जातो. अशा स्थितीत प्रस्थापित पक्ष वा व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कुणाचे चांगभले होऊन जाणे स्वाभाविक ठरते. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अकोला जिल्हा परिषदेत झालेला प्रहार जनशक्ती पक्षाचा चंचुप्रवेश याचदृष्टीने प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालणारा म्हणायला हवा.

अकोला जिल्हा परिषदेच्या कुटासा गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास मात देऊन प्रहार जनशक्तीने विजय संपादित केल्याची घटना हलक्यात घेऊन चालणारी नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांना बाजूस सारून ज्या अमोल मिटकरी यांना पक्षाने विधान परिषदेत संधी दिली, त्यांच्याच गटात सदर प्रकार घडल्याने मिटकरी व त्यांच्या पक्षाला हा पराभव जिव्हारी लागणे स्वाभाविक आहे; विशेषत: या ठिकाणी मिटकरी यांनी आपला सर्वाधिक आमदार निधी वापरल्याचा आरोप ओढवून घेतला असतानाही त्यांच्या उमेदवारास पराभव स्वीकारावा लागला, तेव्हा नेमके काय व कुठे चुकते आहे याचा शोध त्यांनी घेणे गरजेचे आहे.

राज्यातील सत्ता समीकरणांच्या महाआघाडी अंतर्गत अकोल्याचे पालकमंत्रिपद बच्चू कडू यांना देण्यात आले तेव्हाच स्थानिक पातळीवर तिघात चौथा वाटेकरी दृष्टिपथात येऊन गेला होता. काँग्रेस व राष्ट्रवादी असो, की शिवसेना; या तीनही पक्षांकडे स्थानिक पातळीवर सर्वमान्य नेतृत्व नाही. त्यात सत्तेत असूनही पालकमंत्रिपद चौथ्याकडेच गेल्यामुळे या पक्षांना राज्यातील सत्तेचा तसा लाभदायी आधार लाभू शकलेला नाही. तिघाडाच नव्हे, राजकीय चौघाडा झाल्याने जिल्ह्यातील शासकीय समित्यांच्या निवड-नियुक्त्या अद्याप होऊ शकलेल्या नाहीत, यामागील कारणही तेच. अशात पोटनिवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत प्रथमच प्रहारचा प्रवेश होणे हे महाआघाडीतीलच प्रस्थापितांना धक्का देणारे आहे.

बच्चू कडू यांची राजकीय वाटचाल ही धडाकेबाज व अभिनव आंदोलनांनी भरलेली आहे. जनतेचे प्रश्न तेवढ्याने सुटतात असेही नाही, मात्र इतरांकडून भ्रमनिरास झालेल्यांना पर्याय म्हणून ते खुणावू लागले असतील तर आश्चर्य वाटू नये. लगतच्या अमरावती जिल्हा परिषदेत पाच जागा व अचलपूर तसेच चांदूरबाजार नगरपालिकेत अस्तित्व राखून असलेल्या प्रहार जनशक्तीने आता अकोल्यातही पक्ष संघटनेचा विस्तार चालविला आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या असून सदस्यता मोहीम राबविली जात आहे. अशात या पक्षाला जि.प. व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत यश लाभल्यामुळे त्यांच्या टार्गेटवर यापुढील अकोला महापालिका निवडणूक असणार आहे.

भलेही निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती त्याच वा उमेदवार तेच असतात, पण नवीन पक्षाचा झेंडा घेऊन ते येतात तेव्हा पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यादृष्टीनेच प्रहारच्या अकोल्यातील चंचुप्रवेशाकडे पाहता येणारे आहे. कुटासा येथे ही ज्योत पेटली म्हणून केवळ तेथील आमदार मिटकरी यांनीच नव्हे, तर पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेनेच याबाबत सतर्क व्हायला हवे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAkola ZPअकोला जिल्हा परिषदPoliticsराजकारण