शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात पर्यायवाची प्रहार!

By किरण अग्रवाल | Updated: October 10, 2021 12:41 IST

Akola ZP By Poll : पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अकोला जिल्हा परिषदेत झालेला प्रहार जनशक्ती पक्षाचा चंचुप्रवेश याचदृष्टीने प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालणारा म्हणायला हवा.

- किरण अग्रवाल

प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोला जिल्हा परिषदेतील प्रवेशाने केवळ वंचित बहुजन आघाडीनेच नव्हे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेनेही सतर्क व्हायला हवे, कारण यातून मतदारांना पर्याय उपलब्ध झाल्याचा संकेत मिळून गेला आहे. राज्यातील सत्तेच्या साथीने प्रहार बळकट होणार असेल तर इतर सहयोगी प्रस्थापितांचे काय? असाही प्रश्न आहेच.

व्यक्ती निष्ठा बदलतात, तसे मतदार पक्ष बदलतात आता. आश्वासनांना भुलून शिक्के मारण्याचे दिवस गेले, आता काम बोलते; शिवाय अनेकांना संधी देऊन व अनुभवूनही फारसे पदरी पडत नाही तेव्हा ‘सारे एकाच माळेचे मणी’ अशी भावना वाढीस लागते आणि त्यातूनच नव्या पर्यायाचा शोध घेतला जातो. अशा स्थितीत प्रस्थापित पक्ष वा व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कुणाचे चांगभले होऊन जाणे स्वाभाविक ठरते. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अकोला जिल्हा परिषदेत झालेला प्रहार जनशक्ती पक्षाचा चंचुप्रवेश याचदृष्टीने प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालणारा म्हणायला हवा.

अकोला जिल्हा परिषदेच्या कुटासा गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास मात देऊन प्रहार जनशक्तीने विजय संपादित केल्याची घटना हलक्यात घेऊन चालणारी नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांना बाजूस सारून ज्या अमोल मिटकरी यांना पक्षाने विधान परिषदेत संधी दिली, त्यांच्याच गटात सदर प्रकार घडल्याने मिटकरी व त्यांच्या पक्षाला हा पराभव जिव्हारी लागणे स्वाभाविक आहे; विशेषत: या ठिकाणी मिटकरी यांनी आपला सर्वाधिक आमदार निधी वापरल्याचा आरोप ओढवून घेतला असतानाही त्यांच्या उमेदवारास पराभव स्वीकारावा लागला, तेव्हा नेमके काय व कुठे चुकते आहे याचा शोध त्यांनी घेणे गरजेचे आहे.

राज्यातील सत्ता समीकरणांच्या महाआघाडी अंतर्गत अकोल्याचे पालकमंत्रिपद बच्चू कडू यांना देण्यात आले तेव्हाच स्थानिक पातळीवर तिघात चौथा वाटेकरी दृष्टिपथात येऊन गेला होता. काँग्रेस व राष्ट्रवादी असो, की शिवसेना; या तीनही पक्षांकडे स्थानिक पातळीवर सर्वमान्य नेतृत्व नाही. त्यात सत्तेत असूनही पालकमंत्रिपद चौथ्याकडेच गेल्यामुळे या पक्षांना राज्यातील सत्तेचा तसा लाभदायी आधार लाभू शकलेला नाही. तिघाडाच नव्हे, राजकीय चौघाडा झाल्याने जिल्ह्यातील शासकीय समित्यांच्या निवड-नियुक्त्या अद्याप होऊ शकलेल्या नाहीत, यामागील कारणही तेच. अशात पोटनिवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत प्रथमच प्रहारचा प्रवेश होणे हे महाआघाडीतीलच प्रस्थापितांना धक्का देणारे आहे.

बच्चू कडू यांची राजकीय वाटचाल ही धडाकेबाज व अभिनव आंदोलनांनी भरलेली आहे. जनतेचे प्रश्न तेवढ्याने सुटतात असेही नाही, मात्र इतरांकडून भ्रमनिरास झालेल्यांना पर्याय म्हणून ते खुणावू लागले असतील तर आश्चर्य वाटू नये. लगतच्या अमरावती जिल्हा परिषदेत पाच जागा व अचलपूर तसेच चांदूरबाजार नगरपालिकेत अस्तित्व राखून असलेल्या प्रहार जनशक्तीने आता अकोल्यातही पक्ष संघटनेचा विस्तार चालविला आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या असून सदस्यता मोहीम राबविली जात आहे. अशात या पक्षाला जि.प. व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत यश लाभल्यामुळे त्यांच्या टार्गेटवर यापुढील अकोला महापालिका निवडणूक असणार आहे.

भलेही निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती त्याच वा उमेदवार तेच असतात, पण नवीन पक्षाचा झेंडा घेऊन ते येतात तेव्हा पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यादृष्टीनेच प्रहारच्या अकोल्यातील चंचुप्रवेशाकडे पाहता येणारे आहे. कुटासा येथे ही ज्योत पेटली म्हणून केवळ तेथील आमदार मिटकरी यांनीच नव्हे, तर पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेनेच याबाबत सतर्क व्हायला हवे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAkola ZPअकोला जिल्हा परिषदPoliticsराजकारण